डोळे उघडून जगाच्या नकाशावर नजर टाकली तर कित्येक राष्ट्रं मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध धर्माची आहेत. कम्युनिस्ट देशांनी धर्म काही वर्षे बंदिवासात टाकला होता पण अलिकडे तिकडे धर्म परत जागा होत आहे.
जगात हिंदू राष्ट्र एकच शिल्लक आहे पण त्याला हिंदू राष्ट्र म्हणायचं नाही कारण का तर शेक्यूलिरीझम. भारतात ढळढळीत हिंदू धर्म बहुसंख्यांकांचा आहे तरी नीच लोकांनी निधर्मी राष्ट्र ठरवलं आहे. या हिंदू राष्ट्राचे फाळणीच्या रुपाने लचके तोडून समाधान झाले नाही तर जाणीव पुर्वक धर्मांतरं घडवून हिंदू धर्म संपवण्याचा घाट घातलेला दिसून येतो.
नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे की नाही यावर मला शंका आहे. मावोवादी लोकांच्या तालावर तेथील सरकार चालतं असं मला वाटतं. भारतात होणाऱ्या अतिरेकी हल्ल्याच्या योजना बहुतेक वेळा नेपाळमधून अंमलात आणल्या जातात.
हिंदू धर्मीयांना असे का वाटत नाही की जगात हिंदू धर्म वाढावा आणि एकापेक्षा अधिक हिंदू राष्ट्रं बनावित?
हिंदू कायम बचावात्मक पवित्रा का घेतात. हिंदू धर्मातील आधुनिक लोकांना मंदिरात जाणे, उत्सव साजरे करणं हे मागासपणाचं लक्षण वाटते. आपलेच लोक आपल्या धर्माला रोज नावे ठेवतात. हिंदू धर्मानं अति स्वातंत्र्य दिल्यानं लोकांना धर्म महत्वाचा वाटत नसावा काय?
असे काय आहे हिंदू धर्मात की इतर धर्मियांच्या डोळ्यात हिंदू धर्म सलतो आहे?
हिंदू धर्म संकटात आहे काय?
Submitted by आर्यन वाळुंज on 2 March, 2020 - 10:44
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बेफिकीर यांचा अपमान
बेफिकीर यांचा अपमान करण्याअगोदर लायकी पहा स्वत:ची.
Pages