दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकाली निधन.
दिशा ला आणि वडिलांना लवकर सावरण्याची शक्ती मिळो.

खूपच वाईट बातमी Sad श्रद्धांजली _/\_
विश्वास च बसत नाही फार वाईट झालं

प्रो. जी. डी. अगरवाल यांचे, गंगा प्रदुषणमुक्त व्हावी, निसर्गाचा विनाश करणारे प्रकल्प होऊ नयेत ह्या आणि अशा मागण्यांकरता चालू असलेल्या चार महिन्यांच्या उपोषणानंतर गंगाकिनारी निधन.

https://indianexpress.com/article/india/activist-gd-agarwal-who-was-on-i...


अमृतसर रेल्वे दुर्घटना:

रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोहमार्गावर गोळा झालेल्या लोकांना रेल्वेगाडीने चिरडल्याने किमान 61 जणांचा मृत्यू झाला, तर 72 जण जखमी झाले.

जोडा फाटक येथे लोहमार्गाच्या शेजारील मोकळ्या जागेत रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सुमारे 300 जण या कार्यक्रमासाठी जमले होते.

Atyant durdaiwi ani bhyanak Sad

रुळांवर उभे राहू नये हे प्राथमिक ज्ञान या लोकांना माहीत नव्हते काय?
दुर्दैवी वगैरे आहे पण मुळात आपला नागरिक म्हणून जो स्वसुरक्षेविषयीचाही निष्काळजीपणा, बेपर्वाई सर्व ठिकाणी अनुभवायला येते त्यातूनच घडलेला अपघात आहे

रुळांवर उभे राहू नये हे प्राथमिक ज्ञान या लोकांना माहीत नव्हते काय? >>>>> Varada, same my thoughts. People here may call me heartless n insensitive, but the very first thought in my mind on reading the news was ' 60 idiots less'. रेल्वे ट्रॅकवर उभं राहू नये हे कळण्यासाठी शिक्षित असण्याची गरज नाही. एवढा कॉमन सेन्स नसावा या लोकांना? राज्य सरकारने म्हणे मृतांसाठी 5 लाख प्रत्येकी जाहीर केले आहेत ( ही बातमी खात्रीशीर माहीत नाही). ही बातमी ऐकल्यावर तर आश्चर्य वाटलं. हे काय हुतात्मे?
या धाग्यासाठी ही पोस्ट खूप harsh आहे, पण मिनिटभर वाईट वाटल्यावर चिडच आली. विनाकारण स्वतःचे जीव गमावले.

हेच विचार डोक्यात आले.
रुळावर उभं राहणं जस्टीफाईड नाही.पण या ठिकाणी ते बहुतेक फटाके उडायला लागल्यावर, रावण आपल्यावर कोसळणार या रिफ्लेक्स ऍक्शन ने झाले असावे.
इथे ट्रॅक च्या इतक्या जवळ मैदान, तिथे आगीशी संबंधित इव्हेंट, मैदान आणि ट्रॅक मध्ये कुंपण नसणे, अश्या ठिकाणी कार्यक्रम करायला परवानगी असे बरेच फॅक्टर आहेत.

इथे ट्रॅक च्या इतक्या जवळ मैदान, तिथे आगीशी संबंधित इव्हेंट, मैदान आणि ट्रॅक मध्ये कुंपण नसणे, अश्या ठिकाणी कार्यक्रम करायला परवानगी असे बरेच फॅक्टर आहेत. >>> हो अनु, हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. आणि आपल्याकडे एकुणातच HSE बद्दल इतका टोकाचा negligence आहे की अशा घटना पुनःपुन्हा होत राहणार.

रुळावर उभं राहणं जस्टीफाईड नाही.पण या ठिकाणी ते बहुतेक फटाके उडायला लागल्यावर, रावण आपल्यावर कोसळणार या रिफ्लेक्स ऍक्शन ने झाले असावे.
इथे ट्रॅक च्या इतक्या जवळ मैदान, तिथे आगीशी संबंधित इव्हेंट, मैदान आणि ट्रॅक मध्ये कुंपण नसणे, अश्या ठिकाणी कार्यक्रम करायला परवानगी असे बरेच फॅक्टर आहेत. > + ११११

मी ही बातमी वाचली त्यावरुन ईतकेच कळले की रावणाचे जळते डोकी अंगावर पडतील या भीतीने धावाधाव झाली अन त्यात जे अगदी मागे होते ते रुळावर गेले अन तेव्हाच नेमकी ट्रेन आली.

मोकळी मैदाने आणि सुरक्षिततेचे उपाय पाळल्याशिवाय करावेत कशाला असे उत्सव? या वर्षी एवढा मोठा अपघात झाला तरी पुढच्या वर्षी अनेक ठिकाणी अनेक असुरक्षित व्हेन्यूज वर अशीच रावणदहन होत रहाणार. त्या दहीहंडीच्या अपघाताच्या बातम्या वाचतोच की आपण. तरीही दरवर्षी अजून अजून उंच थर लागतात, authorities परवानगी देतात आणि जीव वर आलेले आधुनिक कृष्ण लोभपोटी चढतातच. दोष कोणाला देणार? बरं नावं ठेवली की हिंदूंच्या सणांवर टीका करता म्हणून रुसायला मोकळे.

पर्वा एका ठिकाणी दुर्गापूजेला गेलो होतो, फोटो काढण्याच्या नादात दोघे जण होमात पडता पडता वाचले. लोक काय वेडेपणा करतात कळत नाही. बघ्यांची गर्दी, त्यात फोटो, त्यातच सेल्फीवाले. जनतेचा एकूण सेन्सच गेलाय.

वरची बातमी ऐकून, खरंच आधी लोकांच्या मूर्खपणाला हसायला आले. नंतर विडिओ पाहिले, जे गेले त्यांचे बधिर झालेले नातेवाईक बघून जीव कळवळला. असे प्रसंग कुणावरही येऊ नये. पण गर्दीच्या ठिकाणी आपण गेलो असताना नियम पाळायची अक्कल एकहीजण दाखवत नाही, सगळे बिनडोकपणे वागतात. त्यात फोटो काढायची, आरती घ्यायची, कुणा साधूचा हात डोक्यावर ठेऊन घ्यायची वगैरे वेळ आली की जे काय चेंगराचेंगरी करतात ते बघून किळस वाटते लोकांची.

Pages