१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
हे ख्रिस्ती नववर्षच
हे ख्रिस्ती नववर्षच आहे.
मराठी नववर्ष दिन, पारशी नववर्ष दिन असं आपण म्हणतोच ना ? आणि शुभेच्छा तर आहेतच.
बघा, धाग्याच्या विषयाला पुष्टी दिली तुम्ही काऊदादा.
आपण जिथे जाऊ तिथल्या
आपण जिथे जाऊ तिथल्या बहुसंख्यांकांच्या मान्यतेचा आदर करणे हे आपल्याला हिंदू संस्कृती शिकवते.
हो का ? मग आता काश्मिरातील
हो का ? मग आता काश्मिरातील बहुसंख्यांचा आदर कधी करणार ?
हिंदु पाडवा , पारसी नव वर्ष वगैरे त्या धर्माचे सण आहेत.
पण ख्रिस्ती नववर्ष हे संपुर्ण विश्वाच्या व्यवहाराचे वर्ष झाले आहे.
अर्थात त्यात ख्रिस्ती हा शब्द वापरलात तर त्यात आनंदच आहे.
ख्रिस्ती नववर्षाच्या सर्वांना
ख्रिस्ती नववर्षाच्या सर्वांना एक दिवस आधीच शुभेच्छा !
आज ज्यांना जायचे त्यांनी
आज ज्यांना जायचे त्यांनी पाहिजे त्या अड्ड्यांवर जा, पण घरी जाताना (म्हणजे जाणार असाल तर) खड्ड्यात पडू नका.
हाफ पँट घालून पाय वर करून बसू
हाफ पँट घालून पाय वर करून बसू नये
इतके देखील समजू नये? - कथा अकलेच्या कांद्याची
काहीच नसण्यापेक्षा हाफ पॅन्ट
काहीच नसण्यापेक्षा हाफ पॅन्ट चांगली. दादांचा तर तो पेटंट ड्रेसकोड होता शिनुमातला.
पाय वर करावेत आणि डोके खाली (शिर्षासन)
काऊ, एका स्त्री आयडीशी पब्लिक
काऊ,
एका स्त्री आयडीशी पब्लिक फोरममध्ये चड्डी घालण्याविषयी बोलणे तुम्हाला शोभते का?
धाग्याच्या मुळ विषयावर या मुळ
धाग्याच्या मुळ विषयावर या मुळ विषय आहे
आधुनिकता की उथळपणा ?
चड्डी घालणे हे आधुनिक
चड्डी घालणे हे आधुनिक असावे.
महाराष्ट्राततरी २०व्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत स्त्रीयांनी चड्डी, लेंगा, सलवार, पँट घालणे आधुनिक पणाचे लक्षण होते.
आणि उथळपणाचेही.
नंतर चड्डी घालूनही ती इतर वस्त्रांनी झाकून ठेवण्याची फॅशन झाली.
आत्ता सगळेच चड्डी, लेंगा, सलवार, पँट घालून राजरोस फिरतात आणि त्याला आधुनिकही समजत नाहीत व उथळही.
कालाय तस्मै नमः!
माझी मैत्रिण ( जळगावची) पुणे
माझी मैत्रिण ( जळगावची) पुणे युनिव्हर्सिटीत एम कॉम करत होती. तिच्या मैत्रिणीन्चा एक गृप, युनि मध्ये थ्री फोर्थ घालुन जॉगिन्ग करत फिरणार्या सराना पाहुन हे गाणे म्हणायचा.
जन्गल जन्गल बात चली है, पता चला है ये
चड्डी पहेनके फूल खिला है, फूल खिला है.:फिदी:
चड्डी हा शब्द वापर्ण्याला
चड्डी हा शब्द वापर्ण्याला बहुसंख्य लोकांचा आक्षेप नाही.
कृप्या बहुमताचा आदर राखावा.
डॉलर मधे सैलरी चालते इंग्लिश
डॉलर मधे सैलरी चालते
इंग्लिश Bossची हुजरेगिरी करतात
पण न्यु ईअरच्या शुभेच्छा देताना मात्र धर्म आठवतो
आणि ते लिहिणार पण इतर धर्माच्या लोकांनी उघडलेल्या फेसबुक सारख्या साईट वर तेव्हा धर्म आठवत नाही
किमान आम्ही किती सेक्युलर,
किमान आम्ही किती सेक्युलर, सर्वधर्मसमभाववाले हे दाखवण्यासाठी स्वत:च्याच धर्माची निंदानालस्ती करण्यापेक्षा त्याचा अभिमान बाळगणे केव्हाही चांगले!
रच्याकने, नवीन कॅलेंडर
रच्याकने,
नवीन कॅलेंडर इयरच्या सर्वांना शुभेच्छा!
सर्वधर्मसमभाव हा ना आधुनिकपणा
सर्वधर्मसमभाव हा ना आधुनिकपणा आहे ना उथळपणा ना पारंपारिकतेचा वाद. हा कालातीत आहे. या सर्वधर्मसमभावाने, सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
बुल्स आय स्युडोधर्मरक्षक
बुल्स आय
स्युडोधर्मरक्षक
>>चड्डी हा शब्द वापर्ण्याला
>>चड्डी हा शब्द वापर्ण्याला बहुसंख्य लोकांचा आक्षेप नाही.
नसेल, पण चड्डी वापरण्यावर आहे त्याचे काय ?
>>पण न्यु ईअरच्या शुभेच्छा देताना मात्र धर्म आठवतो
तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म ?
ते घालून काय काय करतात ते ही
ते घालून काय काय करतात ते ही बघाच
तेव्हा कुठे गेला होता
तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म ? >>
असं बोलू नको महेश, लग्गेच तुला डेक्कनचे आमंत्रण मिळेल.
मस्त चर्चा चालु आहे,
मस्त चर्चा चालु आहे, चालुद्या!
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!
डॉलर ,पौड,येन घेणार्यानाच
डॉलर ,पौड,येन घेणार्यानाच हिंदू धर्मअभिमान जास्त उफाळुन येतो वाटत.
१. या विषयाची आवड असेल तरच
१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
याला पुळका येणे म्हणतात
याला पुळका येणे म्हणतात
डॉलर ,पौड,येन घेणार्यानाच
डॉलर ,पौड,येन घेणार्यानाच हिंदू धर्मअभिमान जास्त उफाळुन येतो वाटत.>>
येऊ नये असा कायदा आहे का?
Guilt mhanu Shakta...
Guilt mhanu Shakta...
येऊ नये असा कायदा आहे का?>>
येऊ नये असा कायदा आहे का?>> कायदा तर नाही पण कारण काय असावे?
परत तेच धर्म आणि देश ,जाउद्या
परत तेच धर्म आणि देश ,जाउद्या ना ,इंग्लिश कॅलेंडर सुरु होत आहे असं म्हणा हवं तर !! आणि उपमा तरी चांगल्या द्या.
बाकी ,"जन्गल जन्गल बात चली है, पता चला है ये" मस्तच . मोगली नक्की कोणत्या धर्माचा होता? त्याने काय फरक पडतो ,मला जाम आवडायची ती सिरियल.
डीविनिता ,सर्वधर्मसमभाव हा ना आधुनिकपणा आहे ना उथळपणा ना पारंपारिकतेचा वाद. हा कालातीत आहे. या सर्वधर्मसमभावाने, सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा + १००
नुसता उफळून नाही धर्मांध
नुसता उफळून नाही
धर्मांध देखील होतात
आणि ही लोक इंग्लिश मधे पण
आणि ही लोक इंग्लिश मधे पण भारतीय पध्दत वापरतात
Pages