Submitted by सुधाकर .. on 14 September, 2012 - 06:05
डोळ्यांनी डोळ्यांशीच बोलावे
मनाचे गुज मुक्यानेच खोलावे.
नाते नभाशी आपसूक जुळावे
पापणीने पावसा पापणीत तोलावे.
कधी वर्दळीच्या सोडून वाटा
स्वत:स शोधत एकाकीच चालावे
कधी तू मला अन मी तूला ही,
केवळ एका स्पर्शानेच आकळावे.
असो कोणताही ऋतू परंतू,
नाते हे मनामनात दरवळावे
पुर्व प्रकाशन -----
---- http://chandrabilor.blogspot.in
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच रे ऑर्फी !!
छानच रे ऑर्फी !!
धन्यवाद
धन्यवाद
आवडली..
आवडली..
थँक्स भारतीजी.
थँक्स भारतीजी.
सुर्रेखच.......
सुर्रेखच.......