अलीकडे काही धागे वाचताना जाणवले की निषेध व्यक्त करण्यासाठी कोणताही चांगला प्ल्याटफॉर्म (पक्षी धागा) इथे उपलब्ध नाही. इथे जो जातीय-धार्मिक परिसंवाद चालतो त्यात तुम्ही अमुकतमूक घटनेचा निषेध केलेला नाही दिसले तर तुम्हाला अमुकतमूक गोष्टींवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही हे वाचण्यात येते. तरी ही कुचम्बणा टाळण्यासाठी हा धागा उपयोगी ठरेल अशी आशा आहे. एकदा इथे निषेध नोंदवला म्हणजे कुठेही जोमाने उखाळ्या-पाखळ्या काढायला सोपे जाईल सर्वांना.
धागा निषेधाचा, आपल्या सर्वांचा
27 नोव्हेंबर 2001 ला पहिल्यांदा Voice of Russia ची हिंदी सेवा ऐकण्यासाठी संध्याकाळी साडेसहाच्या काही मिनिटं आधीच कार्यक्रमपत्रिकेवर लिहिल्याप्रमाणे त्या लघुलहरींवर नभोवाणी संचाची (रेडिओ) सुई नेऊन ठेवली होती. ठीक साडेसहा वाजता या नभोवाणी केंद्राची signature tune वाजू लागली आणि पाठोपाठ उद्घोषणाही ऐकू आली - ‘ये रेडिओ रुस है, हम मॉस्को से बोल रहें हैं।’ हे ऐकून खूपच प्रफुल्लित झालो. मग तेव्हापासून मी या केंद्राचे कार्यक्रम नियमितपणे ऐकण्यास आणि त्याच्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा क्रमही सुरू झाला, अगदी 2014 मध्ये हे प्रसारण केंद्र बंद होईपर्यंत.
''दांडेकरांच्या राज्यात होळकरांची फौज आल्यावर कस काय व्हायचं?`` असा प्रश्न एकानं थोडं चिंतातूर होउन विचारल्यावर त्याला दुसरा म्हणाला, ''अरे त्यात काय? इथंच सोय झाल्यावर बाहेर धुंडत बसायला नको. साली पन साहेब लोकांची मज्जा !`` 'हित कशाला चांगल्या घरातल्या पोरीबाळी येताहेत. अहो इथं तसल्याच बाया येणारं. एकीकडं हे बी चालू दुसरीकडे नोकरी बी चालू` पोलीस खात्यात महिला पोलीस भरती मोठया प्रमाणात भरती जेव्हा होणार होत्या त्यावेळी उमटणारी ही स्पंदन.
शेतकरी आंदोलन आता थांबवतील, आणि नापसंत कृषी कायदे मागे घेतले म्हणून घरी जाऊन कदाचित दिवाळी साजरी करतील. आणि आपलं रोजचं आयुष्य जगतील.
पण दलित मजदुर ज्यांनी शेतकरी आंदोलनात भाग घेतला होता, भावनिक होऊन शेतमजूर असुनही तिथे त्या शेतकऱ्या सोबत ठिय्या दिला आंदोलनात त्यांना मात्र आंदोलन आटोपून घरी जाणं तेवढ्या आंनदाचं राहणार नाही. रोज परत जातीवादी जगणं तिथं चुकणार नाही जे ग्रामीण, शहरी भागात आहे.
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
इथून मागे कदाचित प्रत्येक दहा दहा वर्षांच्या टप्प्यावर उभे राहून बघितले तर शेतीतल्या अनेक कामांचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेलेले आढळेल. शेतीतल्या अनेक आधुनिक स्वयंचलीत अवजारांनी आधीच्या अवजारांची जागा घेतल्याने, नवनव्या लागवडीच्या पद्धती आल्याने, त्या त्या कामांचे स्वरूप ओघातच बदलून जाते. या नवीन कार्यपद्धतींत नवीन संज्ञा जन्म घेतात आणि त्या यथावकाश रूळतात. यात काही पारंपारीक संज्ञा मागे पडतात. शेतीतल्या अशा नव्या-जुन्या संज्ञांचे संकलन करण्यासाठी हा धागा.
माहिती विचारण्यासाठी / शेअर करण्यासाठी / पडताळून पाहण्यासाठी.
चक्रपुजा- नवरात्रातील एक विधी
होणार होणार म्हणत म्हणत १९वर्षांपासून पेंडिंग असणारी नवरात्रातील चक्रपुजा आमच्या माहेरी २०१४ मध्ये संपन्न झाली आणी सगळे भरुन पावलो. आमच्या माहेरी चक्रपुजेची परम्परा आहे.
कुलदेवता: बिजासनी देवी(सेन्धवा) मुळ स्थानः विन्ध्यवासिनी देवी (मिर्झापुर, उ.प्र.)
शशक - निचरा
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.>>>
कोण ते? नवीन सूनबाई वाटतं .. सुंदर गोड चेहरा आहे..
कुकरशिवाय भात, पाट्यावर चटणी वाटणं, इडली, डोसे, इडिअप्पम्, सांभारे.. सगळं साग्रसंगीत लागतंय इथे.. विजार - लुंगीचा तंगड्या पसरून आराम /योग..
कामाचा ताण .. सततची बंधनं, वैचारिक मागासलेपण यांनी हिची घुसमट..
त्यातच सारखंच तुंबणारं ते खरकटं पाणी ; अस्वस्थतेचं शेवाळे मात्र हिच्या मनावर साचतंय..
गेले खूप दिवस मी मायबोलीवर भरपूर माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारे लेख वाचत आहे. घरापासून दूर माझ्या घराची आणि संस्कृतीची आठवण करून देणारी ही मायबोलीवरची माणसे अगदी कुटुंबसारखी वाटू लागली आहेत. इतके दिवस विचार करत आहे की मे पण काहीतरी लिहावे, ही इच्छा मनात आहे. पण कुठल्या विषयावर लिहावे हा प्रश्नच होता. मला माझ्या कामासाठी खूप लिहावे लागते.. पण ते सगळे इंग्रजीमध्ये आणि ते देखील वैद्न्यानिक भाषेत. त्यामुळे विषय निवडने तसे अवघडच होते! काल माझ्या मैत्रीणिंबरोबर गप्पा मारताना आमच्या लक्षात आले की आमच्यासारख्या मुलींच्या गोष्टी सांगणारी पुस्तके, लेख, सिनेमे तसे कमीच आहेत.
श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो.