गर्जा महाराष्ट्र माझा!
आज महाराष्ट्र दिन.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापनदिन.
१ मे १९६० या महाराष्ट्र स्थापना दिनासंबंधीची ही चित्रफीत
जय जय महाराष्ट्र माझा या गीताला नुकतंच राज्यगीत घोषित करण्यात आलं.
आज महाराष्ट्र दिन.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापनदिन.
१ मे १९६० या महाराष्ट्र स्थापना दिनासंबंधीची ही चित्रफीत
जय जय महाराष्ट्र माझा या गीताला नुकतंच राज्यगीत घोषित करण्यात आलं.

सिॲटलमध्ये होणाऱ्या BMM 2026 स्नेहसंमेलनाची तयारी आता जोरात सुरू आहे!
श्रीमती शिल्पा कर्वे यांनी तयार केलेल्या अधिवेशनाच्या बोधचिन्हात भारताबाहेर राहूनही मराठी संस्कृती जपणाऱ्या आपल्या मराठमोळ्या अस्मितेला “म” या मूळाक्षराच्या प्रतीकातून सुंदर अभिव्यक्ती देण्यात आली आहे.
“म” — मराठीतला, मातीतला, माणसातला, मनामनांतला, मायबोलीतला, मौजेतला, मनोरंजनातला, मेजवानीतला आणि मैत्रीतला!
गावं बदलत आहेत.
पूर्वीचं संथ वातावरण राहिलं नाही असं म्हणतात. लोक गावच्या पूर्वीच्या रूपाची चर्चा करतात. सगळे गुण्यागोविंदाने रहायचे असे म्हणतात.
पण खरंच असं आहे का?
सध्या गावागावात विविध पक्षात तरूण भरती होत आहेत. पूर्वी एकच पक्ष असायचा. त्यामुळं एक नेता असे. त्याचं घराणं असे. हे घराणं संस्थानिकाप्रमाणे असायचं. काही गावात पाटील आणि देशमुख असे प्रबळ गट असत. काही गावात तणाव असे. पण निवडणुका वगळता गावचं जीवन एरव्ही शांत असे.
निमित्त झाले आहे परवाच पार पडलेल्या एका कौटुंबिक मेळाव्याचे.
सध्याचा सगळ्यात चर्चिला जाणारा विषय म्हणजे इराण युद्ध, त्यावर सगळ्यांचे बोलणे झाले, मग गाडी वळली गॅस टंचाईकडे. आलेले लोक वेगवेगळ्या शहरातील होते, त्यामुळे तुमच्याकडे काय? आमच्याकडे काय चे बोलणे झाले. बहुतेकाांनी काही प्रॉब्लेम नाही आहे असे सांगितले.
पण पेपर मध्ये तर फोटो बातम्या येत आहेत म्हटले तर हा सगळा ऑपोझीशन चा प्लान आहे, उगाच कोणत्यातरी कोपऱ्यात घडलेल्या गोष्टी ते बोंबलून सांगतात असे एक नातेवाईक म्हणाले.
शुक-सारिका
वरदा बुक्सचे प्रकाशक ह अ भावे यांच्या दरबारी आमची हजेरी अधून मधून असायची. एकदा त्यांना आंतरजालीय वाद व गमतीजमती याबाबत गप्पा मारत माहिती देत होतो. तेवढ्यात त्यांना पुस्तक मागणीचा फोन आला.ग्राहक अधिक माहिती विचारत होता. "शुक म्हणजे पोपट, सारिका म्हणजे मैना. ....."भावे नीरगाठउकलतंत्राने फोड करून फोनवर सांगत होते
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
त्या वेळी जपानमधे एक सम्राट होता. हा सम्राट शक्तिशाली होता आणि त्याला युद्धाची एव्हढी भूक होती कि फावल्या वेळेतही तो कोंबड्यांच्या झुंजी बघत असे. त्यासाठी त्याच्याकडे अनेक जातींचे हिंस्त्र आणि युद्धकुशल कोंबडे होते. त्यांना त्याने राजयोद्ध्यांचा दर्जा दिला होता. त्यांची उत्तम बडदास्त ठेवली जाई.
नुकताच बनारसला गेलो होतो तेव्हा घाटांवरुन फिरत असताना अनेक ठिकाणी श्राध्द विधी व धार्मिक कार्ये चालू होते. ते पहाताना माझे मन माझ्या भूतकाळात गावी गेले. एके ठिकाणी थबकलो. तिथे सव्य अपसव्य चालू होते. जानवे सव्य (डाव्या खांद्यावर) आणि अपसव्य (उजव्या खांद्यावर) हे (यज्ञोपवीत) घालण्याच्या दोन पद्धती आहेत, ज्या धार्मिक विधींनुसार बदलतात; 'सव्य' म्हणजे देवकार्यासाठी डाव्या खांद्यावर, तर 'अपसव्य' म्हणजे पितृकार्यासाठी उजव्या खांद्यावर जानवे घेणे
गेली काही वर्षे कोकणपट्ट्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही प्रवास झाला की शक्य झाल्यास तिथल्या नव्वारी(किंवा थोडी कमीजास्त पण काष्टा असलेली) नेसण्याच्या पद्धती गोळा करण्याचा माझा प्रयत्न असतो.
2010 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सारीज:ट्रॅडिशन अँड बियॉण्ड या रिता कपूर लिखित संदर्भग्रंथात मराठी साड्यांच्या संदर्भात याप्रकारचे किंचित योगदान दिले होते त्यानंतर हे काम मी सुरू केले. याबद्दल पूर्वी मायबोलीवर लिहिले होते. https://www.maayboli.com/node/35903
पहाटे 5 वाजता आल्हाददायक वातावरणात मिट्ट काळोखात, गुलाबी थंडीमध्ये अभ्यंग स्नान करण्यासाठी उठवण्यात येते. घराघरांत केवळ खिडकीच्या कठड्यांवरच्या पणत्यांची गवताच्या पात्यांप्रमाणे लवलवणारी केशरी वात, प्रकाशाचे वेगवेगळे ताल धरून नाचणारी दिव्याची माळ आणि रंगीबेरंगी आकाशकंदील यांचा प्रकाश असतो. मातीमध्ये जागोजागी विखुरलेल्या रत्नांसारखा काळोखात उठून दिसत असतो. एरवी कर्णकर्कश्श वाटणारे आणि छातीत धडकी भरवणारे फटाके आज background music सारखे भासतात. अंधारात चमचमणाऱ्या चांदण्यांमध्ये शुक्राच्या चांदणीची भर पडते. दूर अंतरावरील मशिदीमध्ये चालू झालेली अजान पण या थंडीमध्ये आणि शांततेमध्ये कानावर पडते.