नमस्कार मायबोलीकर मंडळी!
आशा!
आशा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो प्रसन्न, हसरा चेहरा, आणि मनात चालू होतं 'सलोना सा सजन है', ' अभी ना जाओ छो़डकर', 'बिते ना बिते ना रैना', किंवा 'झुमका गिरा रे' नाहीतर 'पांडुरंग कांती', 'बुगडी माझी' आणि 'विकत घेतला श्याम'!
आशाने इतक्या विविध प्रकारची, भाषांतली, संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली अनेकविध ढंगी गाणी गायली आहेत की स्तिमित वगैरे होणे सोडा, आपल्याही चेहर्यावर फक्त हसुच येतं.

स्वरसेतूची पहिली रचना "सावळा विठोबा" ला सर्वांचे खूप प्रेम मिळाले.
विठुरायाच्या वारीसोबत स्वरसेतूची सुरुवात झाली.
यावर्षीची आषाढी वारी आम्ही भरून पावलो.
याच भावनेतून स्फुरलेलं स्वरसेतूचं दुसरं गीत...." भरून पावली वारी माझी "
https://www.youtube.com/watch?v=uTeVPZyrAV4
https://www.youtube.com/watch?v=Gk7PLm2I3To
नमस्कार,
मी दरवर्षी पालख्यांचं दर्शन घ्यायला एफ सी रोडवर जाते. माऊलींची पालखी, त्याच्या पुढे मागे चालणार्या दिंड्या, त्यातले भोळे भाबडे वारकरी, कोणी डोक्यावर तुळस घेतलेली असते तर विठ्ठल रखुमाई ची मुर्ती घेतलेली असते. हातात टाळ, मुखी विठुरायाचं नाव आणि एका लयीत पडणारी पावलं हे सगळं दृश्य पुढे अनेक दिवस डोळ्यांपुढे दिसत राहातं.
दरवर्षी पुण्यात येणारा पालखी सोहळा बघुन गेल्या वर्षी काही ओळी लिहिल्या
आता तुम्हाला हा खेळ माहिती झाला आहे, तेव्हा नव्याने त्याबद्दल लिहीत नाही.
मला पटकन आठवलेली गाणी लिहून सुरुवात करून देते.
आशा भोसले वयाच्या ९२ व्या वर्षी गेल्या. कसं वाटतं ना हे ऐकायला?
"देखिए, जाने अनजाने मुझसे एक बदतमीज़ी हो गई है। मैं कोई गीतकार तो नहीं हूं। लेकिन मैंने इस गाने का मुखड़ा लिख दिया है।"
विजय आनंद उर्फ गोल्डीचे ते विधान ऐकून गीतकार राजेंद्र कृष्णजी हळूच हसले आणि त्याच्याकडे एकटक बघत राहिले...
..............
१९७३ सालची गोष्ट. दिग्दर्शक विजय आनंद उर्फ गोल्डी यांनी संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांना सांगितले होते, "हे गाणं मला असं असायला हवंय, की जे बघताना, ऐकताना असे वाटेल की जणु काही पत्रं (letters) बोलत आहेत."
“परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला” हे नाट्यगीत निव्वळ एक गीत म्हणून न उरता, मराठी रंगभूमीच्या इतिहासात एका खोल, अस्वस्थ आणि विचारप्रवर्तक अनुभवाच्या रूपात ठामपणे पाय रोवून उभे आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार वीर वामनराव जोशी यांनी १९२७ साली लिहिलेल्या रणदुंदुभि या नाटकातील हे नाट्यगीत. त्या काळातील समाजमन, पारतंत्र्याची वेदना आणि मानवी विवशतेची जाणीव, असहाय्यतेची भावना अतिशय तीव्रपणे व्यक्त करणारे, मराठी नाट्यसंगीताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेले हे अजरामर गाणे.
*संगीत मैफिलीचा सेल्फी पॉईंट*
(कदाचित, एक टर्निंग पॉईंट …)
माझा मित्र विनायक रानडे…
हा माणूस म्हणजे भन्नाट कल्पनांच्या खजिन्याचा मालक. त्याच्या डोक्यात कल्पना जन्म घेतात, त्या मोठ्या होतात आणि क्षणात एखाद्या आनंदी धबधब्यासारख्या बाहेरही पडतात. आमच्या नाशिकमध्ये दरवर्षी होणाऱ्या अष्टौप्रहर स्वरहोत्र या संगीत महोत्सवात तो भन्नाट कल्पनेची एखादी नवी खिडकी अशी काही उघडतो की त्यातून काहीतरी नवीन फंडा शिकायला मिळतो … यंदाच्या वर्षी त्याने उघडलेली खिडकी होती—
*“संगीत मैफिलीचा सेल्फी पॉईंट.”*
हुस्ना
काही काही गाणी अशी असतात की ती ऐकण्याची आपल्याला काही काळासाठी तरी चटक लागते. 'हुस्ना' हे गाणं ऐकण्याची मला गेले अनेक दिवस चटक लागली आहे असं म्हणायला हरकत नाही! 