आषाढ्स्य प्रथम दिवसे
Submitted by नितीनचंद्र on 20 June, 2012 - 04:53
आषाढाचा पहिला दिवस आणि सृजनांना महाकवी कालिदास आणि मेघदुताच स्मरण न झाल्यास नवल. कालिदासाने लिहलेले मेघदुत जसे काव्यप्रकार म्हणुन आपला ठसा उमटवते तसेच ते उत्तम कल्पनाविष्कार म्हणुनही भावते.
कथेवर आधारीत काव्य हा प्रकार भारतीयांना नवीन नाही. रामायण आणि महाभारतासारख्या कथा व त्यावर आधारीत महाकाव्ये हजारो वर्षे भारतीय समाजमनाच्या ह्र्दयात स्थान मिळवुन अबाधीत राहिली आहेत.
रामायण किंवा महाभारतासारख्या काव्यप्रकारात मानवी जीवनाचे सर्व पैलु आहेत म्हणुनच की काय समाजाच्या सर्व स्तरावर ही काव्ये अजरामर आहेत.
गुलमोहर:
शेअर करा