माझ्या आठवणीतील मायबोली- वावे
मायबोलीवर यायला लागल्यापासून मला काय बदल जाणवले-
तांत्रिक बदल सोडले तर फारसे काही नाही. नवेनवे आयडी आले, काही जुने आयडी आता लिहीत नाहीत, काही लिहितात, काही उडाले. पण एकंदरीत वातावरणात खूप असा बदल नाही जाणवत. मी स्वतः आधी फारसे प्रतिसाद द्यायचे नाही. पहिली सात-आठ वर्षं काहीच लेखनही केलं नव्हतं. आता प्रतिसादही देते, थोडंफार लेखनही करते. हा बदल माझ्यात नक्कीच झालाय. गप्पांच्या मात्र कुठल्याच पानावर मी फारसं कधी लिहिलं नाही. प्रत्यक्ष आयुष्यातही मी ’गप्पा’ अशा खूप कमी जणांशी मारते.
इथली कुठली सोय मला एकदम आवडली-