वंदे मातरम

’जनगणमन ’,रविंद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर

Submitted by दामोदरसुत on 26 January, 2012 - 07:29

आज प्रजासत्ताक दिन! तो प्रजासत्ताक झाला स्वातंत्र्यप्राप्तीमुळे! स्वातंत्र्य मिळाले ते सशस्त्र क्रांतिकारक, जहाल, मवाळ, समाजसुधारक अशा सर्वांच्या प्रयत्नांमुळे! या प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत होण्याचे भाग्य ज्या काव्याच्या वाट्याला आले त्या ’जनगणमन ’ ची शताब्दी नुकतीच धूमधडाक्यात साजरी झाली. त्याचवेळी ’वंदेमातरम’ या गीताचीही आठवण झाली; आणि जाणवले की ’जनगणमन’ चे भाग्य त्याच्या रचनाकाराच्या भाग्याशी तर ’वंदेमातरम’चे विधिलिखित क्रांतिकारकांच्या विधिलिखिताशी जोडले गेले आहे.
आणी म्हणून आठवण झाली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले रविन्द्रनाथांचे अभिनंदन !

गुलमोहर: 
Subscribe to RSS - वंदे मातरम