कधी कधी माणूस कोणत्याही गोष्टीवर गंभीरपणे विचार करण्यास मजबूर होतो. जर आयुष्यात घडलेल्या घटनांचा विचार केला तर हे चांगलेच ध्यानात येईल. सहजासहजी या घटना ध्यानात येत नाहीत कारण आपल्याला त्या अंगवळणी पडलेल्या असतात.
या जगाची निर्मितीच बर्या वाईटांच्या भेसळीतून झालेली आहे. जगात जर सर्व घटना चांगल्याच किंवा वाईटच घडल्या असत्या तर जीवन निरस वाटले असते.चांगला राम झाला पण त्याबरोबर दुष्ट रावण पण होताच ना! हेच पांडव कौरव, श्रीकृष्ण कंस, देव दानव या बाबतीतही म्हणता येईल. ही निर्मिती चांगल्या वृत्तींना अजून चांगले रूप देण्याच्या प्रवृत्तीतून घडलेली असेल कदाचित. मानवाला यातून सुटका नसते. म्हणून जीवन सुखावह होण्यासाठी मानव सतत प्रयत्नशील असतो. या चांगल्या वाईटांची प्रत्येकांच्या वेगवेगळ्या धारणा असतात.
आपल्याकडे नायक, खलनायकांची निर्मिती करतांना खलनायकाला शेवटी शिक्षा दिली जाते किंवा ठार केले जाते. पण पाश्चात्य देशात मी जेंव्हा कांही काळ मुलांकडे होतो तेंव्हा नातवंडाची पाठय पुस्तके किंवा गोष्टी वाचताना निदर्शनास आले की खलनायक असलेल्या पात्रांना न मारता त्यांच्यात सुधारणा झाल्याचे अढळून येते आणि शेवट हा "सर्वजण गुण्यागोविंदाने राहिले" असा असतो. हे सर्व सांगायचे कारण की लोकावर संस्कार कसे करायचे याचा खूप खूप सर्वांगीण विचार होतो.
या पार्श्वभूमीवर नेहमीच घडणार्या कांही दुर्घटनांचा गोषवारा माझ्या डोळ्यासमोरून सरकल्यामुळे विचार चक्र सुरू झाले. मन विषन्न झाले आणि असे का? या प्रश्नांनी खूप त्रास दिला पण उत्तर गावले नाही. शेवटी मनाने पळपुटा मार्ग शोधला आणि हे आपले काम नाही असा विचार करून मोकळा झालो. हा निर्णय घेण्याआधी खूप वैचांरिक मंथन झाले आणि त्यातून एका कवितेचा जन्म झाला. कवितेत व्यक्त झालेले भाव हे माझे स्वतःचे आहेत जे मी शेअर करतोय.
ही कविता हिंदीत आहे. मी त्यावेळेस पटियाला येथे कार्यरत होतो. तेथे मराठी रचना कोण वाचणार या एकमेव भावनेतून हिंदीत लिहिली. मला पूर्ण जाण आहे माझ्या हिंदी स्टँडर्डची. वाचकांनी सहन करून घ्यावी ही रचना.
सीख ना दो अच्छा बननेकी
संकट मे होगी धरती
हम लोगोंकी कारण होती
अच्छे लोगोंकी आरती
ऋषी मुनी ज्ञानी न पनपते
अज्ञानी बिन यंहा वंहा
पांच पांडवोंके हित मे ही
जन्मे कौरव शतक यंहा
रामकी प्रतिमा यूं न दमकती
अगर न होता रावण
ग्रिष्म न होता कालचक्र मे
मन न लुभाता सावन
महिषासुरने रक्त बहाया
पूजनीय बनी काली माँ
बुराइंया इस जगमे रहते
अच्छों की है शुभ प्रतिमा
संशय ग्रासित राम न होते
अग्नी दिव्य क्यों करे सिता?
अर्जून थे जब संभ्रम डूबे
जगने पायी अमर गीता
क्या अच्छ क्या बुरा विश्वमे?
एक बिना है दूजा आधा
बूरोंको रहना है बुरा ही
विश्व हीत का गणित है साधा
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
छान रचना.
छान रचना.