ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन
डॉ. नागेश राजोपाध्ये
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मायबोलीवर ज्योतिष विषयावर अनेक लेख आणि प्रतिसाद वाचले. TV वर पण अनेक परिसंवाद ऐकले. वाद घालून डेड एन्ड आल्यावर सगळे शेवटी हेच म्हणताना दिसतात कि ज्योतिषावर संशोधन व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच तुमच्या मनाचे पूर्ण समाधान होईल असे आणि आम्ही स्वतः केलेले असे असे हे संशोधन आपल्या समोर ठेवत आहे. अतिशय शास्त्रोक्त, हजारो पत्रिका घेऊन कॉम्प्युटरच्या साहाय्याने केलेले हे परीक्षण वैदिक ज्योतिष शास्त्राच्या इतिहासात पहिलेच असेल. अगदी ज्याला आपण दूध का दूध पानी का पानी म्हणतो असे! वास्तविक पहाता हे संशोधन कोणीतरी या पूर्वीच करायला पाहिजे होते. आणि कोणीतरी कशाला ज्योतिषांनीच हे संशोधन खरेतर करायला हवे होते कारण ते या विद्येचा व्यावसायिक वापर करत आले आहेत त्यामुळे ती त्यांची प्राथमिक जबाबदारी होती. पण असो,आपण सरळ मुद्द्यावर येऊया.
मी तुम्हाला आम्ही केलेला प्रयोग थोडक्यात सांगतो - सर्व प्रथम पत्रिकांचे दोन मोठे संच (groups) केले कीजे एकमेकाच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे आहेत. म्हणजे 338 पत्रिका मतिमंद विरुद्ध 338 पत्रिका हुशार लोकांच्या या दोन्ही संचाना ज्योतिष शास्त्रात बुद्धीचे अशुभ फळ मिळण्यासाठी असलेले नियम लावले आणि ते दोन्हीकडे किती लागू पडले याची तुलना केली. अर्थातच ज्योतिष विद्या खरी असेल तर ते नियम मतिमंद पत्रिकांना जास्तीत जास्त लागू पडताना दिसतील आणि त्याउलट हुशार लोकांच्या पत्रिकांना फारसे लागू पडणार नाही. असे झाले तर ते शास्त्र आहे असे मान्य केले पाहिजे नाहीतर नाही. बघा इतका सोपा हा प्रयोग आहे.
आता इथून पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला एक इशारा देतो - जर असे कुठले एक कारण असेल कि ज्यामुळे सर्व सामान्य माणसे ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही या प्रश्नापासून दूर राहिली असतील तर ते म्हणजे आपला (म्हणजे आपल्या सर्वांचाच) मानसिक आळशी पणा. जरा शास्त्रीय concept समोर आली कि ‘कशाला डोक्याला ताण द्यायचा’ असे म्हणून आपण आपली विचार प्रणाली switch off करतो. या एकाच कारणाने सर्वसामान्य माणूस या विषयातले सत्य शोधू शकलेला नाही आणि आयुष्यभर त्याची किंमत पण मोजत आला आहे. पण आपण आज इथे असं नको करायला. हा विषय सोप्यातला सोपा करून सांगायची जबाबदारी माझी, पण त्याच बरोबर त्यासाठी थोडा तल्लख विचार करायची जबाबदारी तुमची. आणि तुम्ही ते केले तर पुढच्या 5 मिनिटांमध्ये हा विषय तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी कायमचाच मिटवून टाकाल आणि लग्न, करिअर, business असे महत्वाचे निर्णय घेताना मनाचा गोंधळ उडणार नाही.
आपण इथे जे करत आहोत त्याला एम्पिरिकल टेस्टिंग (Empirical Testing) म्हणतात. कुठल्याही शास्त्राला ‘शास्त्र’ म्हणून सिद्ध होण्यासाठी ही परीक्षा पास करावी लागते. परदेशामध्ये पाश्चिमात्य ज्योतिष शास्त्राची अशी चाचणी अनेक वेळा घेतली गेली (आणि ते कधीच पास होऊ शकले नाही). आपल्याकडे मात्र वैदिक ज्योतिष शास्त्राची अशी चाचणी घेण्यासंदर्भात कुठल्याच स्तरावर कसलीही चर्चा नाही (मौनम सर्वार्थ साधनम) आणि म्हणूनच आम्ही हा प्रयोग करणे महत्त्वाचे मानले.
आपल्या suspense स्टोरीचा भाग १ (episode 1) म्हणजे आपण ज्योतिषातले प्रत्येक महत्वाचे तत्व किंवा नियम घेणार आणि त्याला तपासून बघणार. तुम्ही ज्योतिषाकडे कधी गेला असाल तर ते पत्रिकेकडे बघत त्यांच्या एका विशिष्ट भाषेत स्वतःशी कम आपल्याशी संवाद करतात बघा! उदाहरणार्थ 'अमुक अमुक ग्रह नीचेचा आहे आणि शिवाय तो शनीच्या युतीत आहे. इतका बिघडल्यावर बरोबर आहे ..त्रास होणारच...' हे जे ग्रहाचे ‘निचेचे असून शनि बरोबर (किंवा पापग्रहा बरोबर) युतीमध्ये असण्याने’ बिघडणे आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या ग्रहाच्या कारकत्वा संबंधात अशुभ फळ मिळणे आहे - ते झाले ज्योतिष शास्त्राचे तत्व. हे अगदी fundamental तत्व आहे म्हणजे प्रत्येक ज्योतिषी ते वापरणारच. आता मतिमंद विरुद्ध हुशार लोकांच्या पत्रिकांचा प्रयोगात जर हे तत्व चेक करायचे असेल तर कुठल्या ग्रहासाठी चेक करायचे हे जर मला तुम्हाला समजावून सांगायचे असते तर परत ‘ कारक ग्रह’ वगैरे शास्त्रीय आणि ज्योतिषीय भाषा वापरावी लागली असती पण सुदैवाने आपल्याकडे कॉम्पुटरजी असल्याने आपण त्याला सांगितले कि बाबा सगळ्या ग्रहांसाठीच चेक कर. कारण बुध, चंद्र बुद्धीचे कारक म्हणून आपण त्यांच्यासाठी चेक करायचो आणि मग कोणीतरी येऊन म्हणणार अहो गुरु पण बुद्धिसाठी महत्वाचा असतो तो तुम्ही टेस्ट केला नाही. आपल्याला कुठलीही शंका ठेवायची नाहीये म्हणून आपण सगळेच ग्रह टेस्ट केले.
आता परीक्षेचा निकाल काय लागला ते बघू - जर हे तत्व खरे असेल तर असे योग आपल्याला मतिमंद पत्रिकांमध्ये जास्तीत जास्त मिळायला पाहिजे होते. पण प्रत्यक्षात दोन्ही संचांमध्ये आम्हाला ते सारख्याच प्रमाणात सापडले. म्हणजे बघा, ज्या ग्रहाच्या नीच असण्याची आणि शनी किंवा मंगळाबरोबर असण्याची आपल्याला भीती वाटत होती ते योग हुशार लोकांच्या पत्रिकेत पण तेवढीच सापडतात जेवढी मतिमंद लोकांच्या. मग हे कसले आले तत्व? नाही पण असे विधान करायची आपण इतकी घाई करायला नको, अजून प्रयोग करू आणि मग म्हणू. आणि ज्योतिषा विषयी पण काही बोलायला नको कारण अजून बाकीची तत्वे टेस्ट करायची बाकी आहेत. आणि ती आम्ही केली. ग्रहाच्या संदर्भात त्याच्या बिघडण्याची जेवढी महत्वाची तत्वे आहेत ती आम्ही सगळी one by one टेस्ट केली ( संदर्भ ३,४,५). म्हणजे ग्रहाचे क्रूर नक्षत्रात असणे (अजून एक डरावना योग) , ग्रह नीच राशीत आणि शिवाय ६,८,१२ व्या स्थानात अशी अनेक तत्वे लावून तुलना केली. आम्हाला यातील एकही तत्व लागू पडण्यात दोन्ही संचात कुठलाही फरक दिसला नाही. जी तत्वे ग्रहांची असतात तीच भावेशांच्या बाबतीत असतात आणि ती आम्ही (परत शंका नको म्हणून) बाराच्या बारा भावेशांना लावून टेस्ट केली. त्यातही कुठलाही फरक दिसला नाही. आणि शेवटी यांची काही तत्वे पत्रिकेतील स्थाना बाबतीत असतात. ती अर्थातच वेगळी असतात जसे कि स्थानात पाप ग्रह असणे, स्थानावर पाप ग्रहाची दृष्टी असणे वगैरे. त्यातही आम्हाला बारापैकी कुठल्याही स्थानात कुठलाही फरक अढळ नाही.
वर सांगितलेली तत्वे अशुभ फळासाठी होती. तशीच ज्योतिषात शुभ फळ मिळण्यासाठी पण प्रमुख तत्वे असतात आणि ती हुशार लोकांच्या पत्रिकेत जास्त आढळायला पाहिजे होती ती पण दोन्ही संचात ग्रह, भावेश आणि स्थानांसाठी सारखीच सापडली. हे एक प्रकारचे Verification होते आणि त्याने आमचे निष्कर्ष जास्तच दृढ झाले कि हि तत्वे वैध नाहीत.
इथे आपल्या सस्पेन्स स्टोरीचा भाग १ समाप्त होत आहे पण जाता जाता मी एक डायलॉग मारणार आहे - सोच लो ठाकूर - हीच ती तत्वे जी लावून तुमची आमची पत्रिका बघितली जाते.
आता सस्पेन्स स्टोरीचा भाग २ - मी पण अनेक वर्षे ज्योतिषी होतो त्यामुळे मला हे माहिती आहे कि अशुभ भाकीत करण्यापूर्वी आपण one by one अशुभ फळ देणारी सगळी तत्वे लावतो आणि त्याचा एकत्रित विचार करून भविष्य सांगतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर सगळे कुयोग मिळून एकूण किती रहाडा घालतात (किती नेगेटिव्हिटी तयार करतात) त्या basis वर भविष्य सांगितले जाते. आपल्या कडे कॉम्पुटरजी असल्याने त्याचे हि सिम्युलेशन केले आणि त्याला सांगितले दोन्ही संचांची तुलना करून सांग. तर दोन्ही कडे सारखीच नेगेटिव्हिटी मिळाली. Verification साठी वर केल्याप्रमाणे शुभ तत्वांची पण तपासणी केली ती हि सारखीच. आता बोला?
म्हणजे सगळी तत्वे एक एक करून तपासली तर ती सिद्ध होत नाहीत, एकत्र लावून बघितली तरी हि होत नाहीत मग त्यांना काय अर्थ आहे? पुढे जाण्या अगोदर आपला डायलॉग परत मारतो - सोच लो ठाकूर - हीच ती तत्वे जी लावून तुमची आमची पत्रिका बघितली जाते.
इथे आम्ही जे सांगतोय ते एकूण प्रयोगाच्या फक्त २५% आहे प्रत्यक्षात खूप काही गोष्टी केल्या. भाकीत सांगताना हमखास वापरली जाणारी अनेक मूलभूत तत्वे, वेगवेगळे ६८ शुभ अशुभतेचे मापदंड, केंद्रातील शुभ ग्रह / पापग्रह, क्रूर नक्षत्रातील ग्रह, मग काय योगकारक ग्रहांची स्थिती वगैरे जेवढे तपासता येईल ते सर्व. सगळंच इथे सांगायला बसलो तर तुम्ही कंटाळून जाल म्हणून सिम्पल सिम्पल आणि वर वर सांगतोय. या प्रयोगाची खासियत म्हणजे आपण ३३८ अधिक ३३८ अशा सगळ्या मिळून ६००+ पत्रिका घेतल्या होत्या की जे संख्याशास्त्राच्या दृष्टीने अनिर्वाय (mandatory) आहे. आत्तापर्यंत या प्रमाणात ज्योतिषशास्त्राचे परीक्षण झालेले आमच्या बघण्यात तरी नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या या चाचण्यांचे निकाल व अनुमान यापूर्वी आपल्यासमोर आलेले नाही. हा प्रयोग कोणीही करू शकतो आणि तो ज्योतिषांनी जरूर करावा.
आता तुम्ही म्हणाल की एक प्रयोग करून एवढे मोठे हजारो वर्षे चालत आलेले शास्त्र खोटे कसे ठरवता? म्हणूनच आम्ही अनेक प्रयोग केले. अविवाहित (350 पत्रिका) विरुद्ध दीर्घकाळ लग्न टिकलेले (350 पत्रिका) यातही आम्हाला हेच रिझल्ट मिळाले. त्यानंतर साठ वर्षांच्या आत कर्करोग झालेले (254 पत्रिका) विरुद्ध कर्करोग कधीही न झालेले (498 पत्रिका), घटस्फोटित (३५० पत्रिका) विरुद्ध दीर्घ विवाहित (३५० पत्रिका), सेलेब्रिटी विरुद्ध सर्वसाधारण लोक असे अनेक प्रयोग केले. आणि त्या सर्व प्रयोगात तीच तत्वे तपासली (आठवा नाहीतर डायलॉग मारावा लागेल). पण त्या सर्व प्रयोगात वर सांगितलेलेच रिझल्ट मिळाले. म्हणूनच आम्ही ठाम पणे सांगू शकतो की या शास्त्रात, त्यांच्या तत्वात, नियमात काहीही तथ्य नाही. हे सर्व माझ्या दहा वर्षांच्या संशोधनाचे सार आहे.
जाते जाते last time - सोच लो ठाकूर, हि तीच तत्वे आहेत जी वापरून तुमची आमची पत्रिका बघितली जाते ...... मग आता तुम्हीच ठरवा, पत्रिका बघून लग्न करायचे का नाही, करिअर कुठल्या विभागात करायचे ते ज्योतिषाला विचारायचे का आपले आपण ठरवायचे. नातेसंबंधीचे निर्णय घेताना second opinion ज्योतिषाकडे जाऊन घ्यायचे का counselor कडे जाऊन घ्यायचे तेही ठरवा. शुभेच्छा !
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Latest Update - येणाऱ्या प्रतिसादांवरून समजते कि या विषयावर अजून बरेच लिहायला पाहिजे होते. शास्त्रीय कल्पना या plane लिखाणापेक्षा audio - visual ने जास्त चांगल्या समजतात म्हणून अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील youtube video जरूर बघा.
Title - Astrology Yes Or No (Marathi) ज्योतिषशास्त्र खरे आहे का नाही?
https://youtu.be/RBKuOeOF79w
संदर्भा खाली ज्योतिष समर्थकांचे ‘अपेक्षित (नेगेटिव्ह) प्रतिसाद आणि त्यावर माझा खुलासा’ हे हि दिलेले आहे त्यात बऱ्याचशा शंकांचे निरसन होईल.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आभार -
श्री. प्रकाश घाटपांडे यांचा या संशोधनामधील एका महत्वाच्या प्रयोगात म्हणजे ‘मतिमंद विरुद्ध हुशार लोकांच्या पत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास’ या प्रयोगात प्रत्यक्ष सहभाग होता. त्यांच्या योगदानाशिवाय हा प्रयोग पूर्ण होऊ शकला नसता.
—--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखकाची ओळख -डॉ. नागेश राजोपाध्ये हे गेले 20 वर्षे ज्योतिषविद्येचा अभ्यास करत आहेत. (सुरवातीला एक ज्योतिषी म्हणून आणि नंतर एक टीकाकार म्हणून). त्यांनी पुणे विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयात Ph.D. केली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरवात ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून केली परंतु नंतर बहुतेक सर्व वेळ IT क्षेत्रात व्यतीत केल्यानंतर ते Accenture मधून Associate Director म्हणून निवृत्त झाले. सध्या आपला सर्व वेळ ते ज्योतिषविद्येच्या empirical परीक्षणाला आणि संशोधनाला देत आहेत.
संपर्क - astrobasedresearch@gmail.com
—-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१. वरील संशोधनाविषयी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सांगायचे असेल तर खालील Youtube विडिओ ची लिंक फॉरवर्ड करा.
Astrology Yes Or No (Marathi) ज्योतिषशास्त्र खरे आहे का नाही?
हिंदी व्हिडिओ लिंक - https://youtu.be/5iVmPUo42aE
२. या संशोधनाचे अधिक तपशील म्हणजे - कुठले नियम तपासले, डेटा कसा घेतला, कुठून घेतला, संख्याशास्त्रीय चाचण्या (statistical tests) कशा केल्या वगैरे तपशील बघायचा असल्यास www.astrologyyesorno.com ला भेट द्या. त्यातील मराठी वेबसाईटवर ‘संशोधन’ या वेब पेज वर सर्व तपशील दिला आहे. किंवा प्रकाशित पेपर बघू शकता
३. An article in The Skeptic, UK, June 2021 by Dr. Nagesh Rajopadhye
When put to the test, the predictive powers of Indian astrology simply don’t hold up
Link - https://www.skeptic.org.uk/2021/06/when-put-to-the-test-the-predictive-p...
४. Empirical testing of few fundamental principles of Vedic astrology through comparative analysis of astrological charts of cancer diseased persons versus persons who never had it
International Journal of Applied Research - 2021; 7(5): 74-85
Link - DOI - https://doi.org/10.22271/allresearch.2021.v7.i5b.8548
५. Comparison of Vedic astrology birth charts of celebrities with ordinary people: An empirical study, International Journal of Jyotish Research, 2021; 6(1): 104-116
(Volume 6, Issue 1, Part B, pages 104-116)
DOI : https://doi.org/10.22271/24564427.2021.v6.i1b.114
६. ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य
आजचा सुधारक, ऑगस्ट, 2021 चळवळ, परीक्षण, विज्ञान, विवेक विचार, शिक्षण, श्रद्धा-अंधश्रद्धा - डॉ. नागेश राजोपाध्ये
https://www.sudharak.in/2021/08/7477/
७. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला पत्रिका न बघता लग्न करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी खरोखर मदत पाहिजे असेल तर लिहा – astrologyyesorno@gmail.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद आणि खुलासा
या विषयावर मी अनेक webinars दिले आहेत, सोशल मीडिया (Quora, reddit, FB etc) वर पण लिहिले आहे. त्या अनुभवावरून ज्योतिष समर्थकां कडून खालील प्रतिसाद येतो असा हमखास अनुभव आहे. सर्व सामान्य वाचक त्याने confuse होऊ नये म्हणून अपेक्षित प्रतिसाद आणि त्यावरील माझा खुलासा खालील प्रमाणे आहे
—---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिक्रिया - हे एवढेच परीक्षण पुरेसे आहे का ? याशिवाय अजून परीक्षण करायला पाहिजे अशी आमच्या कडे तत्वे आहेत.
खुलासा - ज्योतिषविद्येमधील जी प्रमुख तत्वे आम्ही वैध नाहीत हे सिद्ध करून दाखवले आहे, ती इतकी fundamental आहेत कि ती वापरल्याशिवाय कुठलेही भविष्य सांगितले जाऊच शकत नाही. ज्योतिषाच्या कुठल्याही पुस्तकात ती दिलेली असतात आणि त्यांना कुठलाही ज्योतिषी अमान्य करणार नाही. त्यामुळे आजच्या मितीला जे ज्योतिष त्या तत्वांच्या आधारे सांगितले जाते ते तरी निश्चितच अर्थहीन आहे हे सरळसरळ दिसत आहे. ज्योतिषाच्या परीक्षणाचा मुख्य problem म्हणजे प्रत्येकाचे वेगळे नियम आहेत. उदा घटस्फोट घेतला तर एक standard document असे मिळणार नाही कि जे पत्रिकेतील exactly कुठल्या योगांमुळे घटस्फोट होतो याच्या नियमांची यादी देईल. अशी सर्वमान्य यादी असती तर परीक्षण करणे सोपे आहे. पण तशी नसल्यामुळे जगातील लाखो ज्योतिषांच्या लाखो याद्या अवैध सिद्ध करणे हे केवळ अशक्य आहे. त्यापेक्षा मी लेखात म्हणाल्या प्रमाणे खरेतर ज्योतिषांनीच पुढाकार घेऊन असे परीक्षण करायला पाहिजे आहे कारण त्यांच्या भविष्यावर लोक जीवनातील महत्वाचे निर्णय घेत असतात. त्यामुळे कोणाला कुठले नियम वैध आहेत वाटत असेल तर त्याने ते तसे ६००+ पत्रिका घेऊन सिद्ध करून दाखवावे. किंवा असा शास्त्रीय प्रयोग अगोदर झाला असेल तर त्याचा संदर्भ द्यावा. माझ्या बघण्यात जे ज्योतिषाच्या बाजूने संशोधन आले ते फार तर फार १०० पत्रिकांचा आधार घेऊन आणि ते सुद्धा selective data घेऊन केलेले दिसले कि जे अर्थातच शास्त्रीय नाही.
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - ज्योतिष हि प्रोबॅबिलिटी आहे, तुम्ही ती वस्तुनिष्ठ समजून objectively टेस्ट करू शकत नाही.
खुलासा - Creating confusion is one the best defense या उक्ती प्रमाणे probability हा शब्द वापरून ज्योतिषाचे समर्थन होताना हल्ली दिसते जे अर्थहीन आहे. खरेतर Empirical testing मध्ये जे test होते ती probability च टेस्ट होते. त्यामुळेच मतिमंद असण्याचे नियम हुशार लोकांच्या पत्रिकेत आढळले तर केवळ त्याच एका गोष्टीला दाखवून आपण कधीच म्हणत नाही कि ते नियम अवैध आहे. ते काही % विरुद्ध संचात आढळणे ठीक आहे (इथे probability येते कि जी आपण मान्य करतो) पण आपली अपेक्षा हि आहे कि दिलेला नियम मतिमंदसाठी असेल तर तो मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये हुशार लोकांच्या पत्रिकांपेक्षा सिग्निफिकन्टली जास्त % ने लागू पडला पाहिजे. म्हणजेच त्याची मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये आढळून यायची probability हि significantly जास्त असली पाहिजे. ते तसे आहे का नाही हे आपण test करतो. ह्याचा अर्थच असा आहे कि आपण probability च टेस्ट करत आहोत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - ज्योतिषांना हे कधीच पटणार नाही, आपल्या कडच्या लोकांनाही हे पटणार नाही, मग या सगळ्या संशोधनाचा काय उपयोग?
खुलासा - माझ्या मते समाजात ४०-५० % अशी लोक आहेत जे ज्योतिष किंवा त्यांचे कट्टर समर्थक या वर्गात मोडतात. त्यांना आपण सोडून देऊ. त्यांच्या साठी मी हे संशोधन केलेले नाही कारण मी आकाश पातळ एक केले तरी त्यांना हे पटणार नाही याची मला कल्पना आहे. या उपर १० ते १५ % अशी लोक आहेत जे कधीही ज्योतिषावर विश्वास ठेवणार नाहीत. यांना पटवून द्यायचा प्रश्नच येत नाही. उरली ३५-४० % लोक जे confused आहेत. जे आज घाबरून ज्योतिषाच्या मागे जातात, विषाची परीक्षा नको म्हणून ज्योतिषाचे ऐकून काही थोडेफार पाळतात, पण एका बाजूला त्यांना खरेतर ते पटत नसते आणि त्यांना आपले स्वतःचे असे मत अजून बनवायचे आहे. माझे संशोधन हे ह्या लोकांसाठी आहे. लक्षात ठेवा आजची तरुण पिढी हि बरीसचशी या वर्गात मोडते.
यावर पण मी थोडे अजून संशोधन केले. ज्यांचे वय ३०+ आहे त्यांना पटवून देणे कठीणच असते. वेळ वाचवण्यासाठी आजकाल मी तिथे जास्त convince करत बसत नाही. पण त्याउलट जे तरुण आहेत (३० minus) त्यांना पटवून देण्याच्या बाबतीत माझा success rate हा ६०-७०% आहे. त्यांचे विचार by default legacy च्या विरुद्ध असतात. ते खूप technology च्या आधारे विचार करतात, शास्त्रीय कल्पना लवकर समजतात आणि आपले मत बदलायला तयार असतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हि खूपच दिलासा देणारी बाब आहे कारण हीच पिढी आपले भवितव्य आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - अमुक ज्योतिषाने आम्हाला / आमच्या नातेवाईकांना सांगितलेले भविष्य बरोबर ठरलेले आहे, कित्येकांनी website वर लिहूं ठेवललेल खरे झाले आहे मग तुम्ही ज्योतिषशास्त्र खरे नाही असे कसे म्हणता
खुलासा - माझा मुद्दा इथे हाच असेल कि शास्त्रीय परीक्षणाशिवाय आपण एक दोन अनुभवांना किंवा घटनांना त्या विद्येचे proof मानू शकत नाही. मी स्वतः संशोधन करण्या पूर्वी काही महिने असे संशोधन कोणी केले आहे का याचा शोध घेत होतो. मला तरी ज्याला आपण ‘शास्त्रोक्त’ म्हणू असे ज्योतिष विद्येच्या बाजूने असलेले संशोधन किंवा परीक्षण सापडले नाही. जे संशोधन म्हणून प्रसिद्ध झाले आहे त्या खरे तर case studies आहेत. म्हणजे एखादा योग कॅन्सरला कारणीभूत होतो असे कोणाला सिद्ध करायचे असेल तर तो तसा योग असलेल्या ४०-५० पत्रिका घेऊन ते दाखवणार कि बघा असे योग आहेत. हे शास्त्रीय परीक्षण होत नाही. त्यासाठी पत्रिकांचे कॅन्सर असलेले आणि कॅन्सर नसलेले असे दोन गट तयार केले पाहिजे, डेटा प्रत्येक संचात ३००+ घेतला पाहिजे, तुम्ही सांगत असंणारे cancer असण्याचे नियम कॅन्सर नसणाऱ्यांच्या पत्रिकेत कसे नाहीयेत किंवा त्या दोन संचात कसा लक्षणीय फरक आहे हे दाखवले पाहिजे, त्यासाठी स्टॅटिस्टिकसची सिग्निफिकन्स टेस्ट केली पाहिजे आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत कि ज्या केल्याशिवाय आपण त्याला मान्यता देऊ शकत नाही. या मितीला तरी ज्योतिष सिद्ध होईल असे ‘शास्त्रीय’ परीक्षण माझ्या बघण्यात नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
@ अतुलजी, तुमच्याकडे
@ अतुलजी, तुमच्याकडे Innovative thinking छान आहे. हि माझी तुम्हाला compliment आहे कारण हे मी मनापासून म्हणत आहे. तुम्ही प्रयोग छान रचला आहात. तसा प्रयत्न करायला हरकत नाही पण मी स्वतः त्या प्रयोगा बाबत आशावादी नाही. मी एक AI चा छोटा project केला होता त्या basis वर सांगतो. तुम्हाला हि माहीतच असेल कि machine learning साठी मुळात दोन गोष्टींमध्ये काही relation असावे लागते. ते relation तुम्हाला माहित नसेल तर ML तुम्हाला शोधून देईन पण मुळात fundamentally तसे relation असायला पाहिजे. दोन random आणि relation नसलेल्या गोष्टींना जोडून ML ला काम करायला सांगितले तर तो प्रयोग यशस्वी होणार नाही असा माझा कयास असल्याने मी त्यात पुढे जाऊ शकत नाही. हा प्रयोग म्हणजे खूप मोठी commitment असेल त्यामुळे ज्याचा ग्रहांची स्थिती आणि मनुष्य जीवन यांचा एकमेकांशी निश्चित संबंध आहे असा विश्वास असेल त्याने तो जरूर करावा. हे एकप्रकारचे संशोधन असल्याने मी निश्चित सहकार्य देईन. माझ्या साठी आत्ता priority म्हणजे झालेले जे संशोधन (already सिद्ध केलेले) आहे ते लोकां पर्यंत पोचवणे आणि याच धर्तीवर अजून संशोधन करणे. या सगळ्याच front वर अजून खूप काही काम बाकी आहे.
पं. महादेवशास्त्री जोशींचा हा
पं. महादेवशास्त्री जोशींचा हा किस्सा माहिती नव्हता. >>>>> वावे, ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या माझ्या पुस्तकात तो सविस्तर दिला आहे. http://mr.upakram.org/node/806 इथे प्रश्न क्रमांक 6 वाचा. मी तो असंख्य ठिकाणी वेळोवेळी उधृत केलेला आहे.आपण चिकित्सक असल्याने ते पुस्तक वाचले असेलच. कारण वेळोवेळी संबंधित विषयाच्या चर्चेत मी त्याच्या लिंक दिलेल्या आहेत. अगदीच नसेल वाचल तर इथे वाचा http://mr.upakram.org/node/1065
प्र. घा., मी फलज्योतिष
प्र. घा., मी फलज्योतिष चिकित्सक वगैरे नाही. खगोलशास्त्र हा विषय माझ्या आवडीचा आहे. त्यामुळे राहू, केतू, युती, प्रतियुती, वक्रगती वगैरे शब्दांचे अर्थ कळतात, एवढंच. आपल्या जन्मवेळी असलेल्या ग्रहताऱ्यांच्या स्थितीचा आपल्या आयुष्य ावर काहीही परिणाम होत नाही हे मला पूर्णपणे पटतं.
तुम्ही एकदा जेव्हा या लिंका दिल्या होत्या, तेव्हा (सिझेरियन प्रसूती आणि कुंडली या तुमच्या धाग्यावर) तेव्हा मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तिथे मिळेल असं म्हणून दिलेल्या होत्या. तेव्हा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर 'हो' अथवा 'नाही' एवढंच अपेक्षित होतं आणि ते तुमच्याकडून मिळाल्यामुळे मी त्या लिंक्स सविस्तर वाचण्याचे कष्ट घेतले नाहीत. कारण त्या लिंकमधले प्रश्न (फलज्योतिष म्हणजे काय? , पंचांग म्हणजे काय? जन्मनक्षत्र म्हणजे काय? वगैरे) मला ओळखीचे होते आणि त्यांची उत्तरंही ओळखीची होती! वेळोवेळी मी वाचलेल्या विज्ञानविषयक पुस्तकांमध्ये हे विषय चर्चिलेले आहेत.
त्यात हा किस्सा लपलेला होता हे माहिती असतं तर नक्की वाचला असता.
धागा का थांबला
धागा का थांबला
मुहूर्त नाही
मुहूर्त नाही

काही ठरले का?
काही ठरले का?
आमच्याकडे एच आय व्हीचे रुग्ण
आमच्याकडे एच आय व्हीचे रुग्ण येतात , ते आमचे ऐकतात ,टेस्ट करतात, औषध घेतात.
पण क्वचित एखादा पेशंट ऐकत नाही , त्याला त्याचे रिपोर्ट , औषध मान्य नसते , त्याला आम्ही ऑपटेड आउट म्हणतो , म्हणजे तो स्वखुशीने हे नाकारत आहे.
पण त्याच्या घरातील दुसरा कुणी रुग्ण समजा औषध घेत असेल , तर आम्ही त्या ऑपटेड आउटवाल्याचीही चौकशी करतो , तो सध्या बरा आहे का , तो अजून काही इतर उपचार करतो का इ इ , कधीतरी एखादा परत येतो देखील.
तसे भविष्य ज्योतिष नाकारणार्या लोकांकडेही ज्योतिषयांनी सहानुभूतीने पाहिले पाहिजे , त्याची काँग्रेसी , लिबरल , इ बोलून हेटाळणी करण्या ऐवजी ज्योतिष , हिंदुत्व इ नाकारणारा असा कोणता ग्रह त्याच्या पत्रिकेत आहे , याचाही अभ्यास त्यांनी करायला हवा , कारण या लोकांचीही संख्या भारतात व परदेशात मिळून प्रचंड मोठी आहे. ह्यांचेही फॉलो अप ठेवायला हवे,एखादा दोन वर्षाने तुम्हाला मानूही लागेल.
Opted out
मशीन लर्निंग बाबत अजून थोडा
मशीन लर्निंग बाबत अजून थोडा रतीब घालतो...
Correlation does not imply causation
कदाचित हेच ते जे मला आठवत नव्हते. फिजिक्स शिकवताना चर्चा इकडे गेली असावी. उबो यांनी दिलेल्या लिंक मधले उदाहरण बोलके आहे. एका वर्षात विविध महिन्यात आईस्क्रीमची झालेली विक्री आणि त्याच वर्षात शार्कने केलेले हल्ले यांचा आलेख जुळतोय. दोन्हींचा अजिबात संबंध नाही पण आलेख तर जुळतोय. हाच Pattern काही वर्षे दिसला तर त्यानंतरच्या वर्षी लोक आईस्क्रीमच्या विक्रीवरून समुद्रात जाणे कितपत धोकादायक हे ठरवतील. दोन असंबद्ध गोष्टी आहेत मान्य पण Pattern तर जुळतोय हे सुद्धा नाकारता येत नाही.
वर @मानव यांनी संदर्भ दिलेल्या याच विषयाच्या दुसऱ्या एका धाग्यावर रोचक व माहितीपूर्ण प्रतिसाद दिसले.
प्राचीन काळी पृथ्वीभोवती सर्व ग्रह तारे फिरत आहेत असा समज होता. त्यामुळे तसे pattern त्यांनी नोंद करून ठेवले आहेत. आणि म्हणून आपसूकच आपल्या चंद्राला महत्व आले आहे (पृथ्वीच्या सगळ्यात जवळून फिरणारा लाडका बाब्या). त्यामुळे चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, रवी, राहू, केतू असे नऊ ग्रह त्याकाळात मानण्यात आले. त्यातही राहू, केतू म्हणजे "हा खेळ सावल्यांचा" आहे हे माहित नसल्याने ते "अदृश्य ग्रह" आहेत (जे फक्त ग्रहणालाच दिसतात) अशी समजूत होती. पुढे प्रजापती, वरुण, कुबेर (Uranus, Neptune, Pluto) हे सुद्धा घेण्यात आले. अशा रीतीने ते बारा ग्रह झाले. मग त्यांनी सूर्य पृथ्वीभोवती ज्या वर्तुळावर फिरतोय (त्याकाळातल्या समजुतीनुसार) त्या ३६० डिग्रीचे त्यांनी बारा भाग करून प्रत्येक भागाला राशी म्हटले. हे अख्खे राशींचे चक्र पृथ्वीभोवती फिरतेय अशी कल्पना केली. त्यानुसार "तुमच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजा वर असलेली रास हि तुमची लग्न राशी. आणि त्याच वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती तुमची जन्म राशी" असे मानले.
हे सगळे लक्षात घेऊन Patterns या संदर्भात जरी विचार केला तर बारा घरांत बारा ग्रह यांचे विविध Permutations किती होतील? गणिताने काढल्यास सत्तेचाळीस कोटींहून जास्त शक्यता निर्माण होतात असे लक्षात येते (चुकत असेल तर प्लीज करेक्ट करा). ते सुद्धा प्रत्येक राशीत एकच ग्रह आहे असे मानले तर. अन्यथा हा आकडा अजून जास्त आहे. शिवाय नक्षत्रे. म्हणजे तर अजून जास्त. इतक्या मोठ्या संख्येने शक्यता असतील तेंव्हा त्यातले Patterns शोधण्यासाठी किती कुंडल्या हव्यात याची फक्त कल्पनाच करावी. शिवाय बोकलत यांचे म्हणणे ऐकून आकाशगंगा आणि इतर गोष्टी सुद्धा विचारात घ्यायचे म्हटले तर ब्रह्मांड आठवेल!
तात्पर्य: जे Patterns आजवर भविष्यवेत्त्याना सापडलेत त्याबाबत धाग्यात विवेचन आहेच. त्याला छेद देणाऱ्या कित्येक कुंडल्या त्यांना सापडल्या. पण ग्रहांच्या एकूण उपलब्ध शक्यतांमधून नवीन Patterns शोधण्यासाठी प्रचंड प्रमाणात अचूक कुंडल्या लागतील. त्यामुळे आताच्या घटकेला हे केवळ अ श क्य.
हा लेख थोड्या थोड्या
हा लेख थोड्या थोड्या दिवसांनी 'बदलून' असा दिसतो. मूळ लेखात काही मजकूर जोडला असेल , तर आधी वाचलेल्यांना कसे कळेल?
प्रतिसाद तर नवे येईनात , मग
प्रतिसाद तर नवे येईनात , मग लेख वर कसा येणार ?
म्हणून वर तारांगण फिरले , नक्षत्र बदलले की इथेही दोनचार शब्द बदलतात .
अतुल, त्यात हाताच्या आणि
अतुल, त्यात हाताच्या आणि पायांच्या बोटांची चक्रे, हस्त आणि पाद रेषा, ओठांचे ठसे, मस्तक रेषा, केसांचे क्रॉस सेक्शन, रक्तगट, डोळ्यांचा स्कॅन इत्यादि ऍड केले की अजून भरमसाठ पर्म्युटेशन्स होतील.
पण हे सगळं मुळात जन्मतः आपण कसे असू, वागू, काय करू, केव्हा मरु हे ठरलेले असते या विश्वासावर वसलेले आहे.
आईस्क्रीम विक्री असो की अजून काही आणि त्यावरून एखादा संबंध, ग्रहांच्या निरीक्षणातून भरती ओहोटी, इ. सारख्या प्रत्येक जिवावर वेगळा प्रभाव न करणाऱ्या बाबी आहेत. त्यांची उदाहरणे देऊन ग्रह प्रत्येक जीवाचे (हो मानवाचीच कशाला, लोक विषाणूच्याही कुंडल्या मांडतात आणि त्यावरून भाकिते सांगतात) वेगवेगळे आयुष्य ठरवतात अथवा दर्शवतात यात तथ्य असू शकते मानणे सूता वरून स्वर्ग गाठणे वाटते. विशेषतः लेखकाने त्यावरील प्रयोग मांडले असता. आणि मग त्यात आपण कुंडल्या अचूक नसतील (जन्मवेळ चुकली असेल) अशी शंका घेतो.
मुळात जन्मवेळ म्हणजे नक्की कोणती यावर एकमत आहे का किंवा त्याची अचूकपणे नोंदणी करता येईल अशी व्याख्या आहे का? पूर्वी (ज्योतिष्य शास्त्र अस्तित्वात आले तो काळ) वेळ मोजण्याचे अचूक साधन नव्हते, त्यावेळी ज्योतिष्यी प्रसुती वेळी जातीने हजर असतील आणि टाहो ऐकला (किंवा सुईणीला सांगून ठेवले केव्हा इशारा द्यायचा) तेव्हा लगेच कुंडली मांडत असतील असे मानले, तरी काही कोटींच्या संख्येत असणाऱ्या शक्यतांमध्ये असा कितीसा अभ्यास झाला असेल ज्यावरुन ज्योतिष्य शास्त्र मांडल्या गेले याची कल्पना करू शकता.
तो एक कन्सेप्ट आहे त्याची पडताळणी एवढ्या शकत्यांमध्ये आधीच झालेली असणे शक्य नाही. तेव्हा हा कन्सेप्ट निरीक्षणावरुन आधारित नसून कसल्या श्रद्धेवर (उदा. देवाने आपले प्रत्येकाचे आयुष्य ठरवून दिले आहे ) आधारित आहे असे वाटते.
प्रिडीकटिव्ह ऍनॅलिटिक्स जे सध्या काही क्षेत्रात वापरात आहे ते पुढे नक्कीच प्रचंड व्यापक प्रमाणात चांगले टूल म्हणुन उदयास येईल, कारण ते अशा कुठल्या श्रद्धेवर आधारित नसून नवनविन फॅक्टर्स, इव्हेंट्स, इत्यादि अपडेट करत राहून केलेले प्रेडिक्शन असेल. आज त्यावरून केलेली भाकिते ही पुढील काही वर्षांनी पूर्णत: वेगळी किंवा विरुध्दही असू शकतील (त्रुटी, चूकांमुळे नव्हे तर बदलत्या परीस्थितींमुळे, आणि त्या त्या वेळी दोन्ही बरोबरही असू शकतील.)
त्याची तुलना ज्योतिष्यशास्त्राशी कशी होईल?
मानव, अतुलजींचा मुद्दा
मानव, अतुलजींचा मुद्दा Correlation does not imply causation या मुद्द्यावरच गुंफलेला आहे. त्यांच म्हणण अस की कार्यकारणभाव आहे कि नाही? असल्यास काय असू शकतो हे शोधणे ही पुर्ण निराळी गोष्ट आहे. आम्ही फक्त कोरिलेशन वा निरिक्षणांमधली संगती सांगतो कार्यकारण भाव शोधणे हे अन्य तज्ञांचे काम त्यांच्या परीने त्यानी करावे. अतुलजी माझे हे आकलन बरोबर आहे का?
प्रकाशजी ते कळले, पण मुळात
प्रकाशजी ते कळले, पण मुळात कोरिलेशन आहे हेच अजून सिद्ध झाले नाही. कोरिलेशन आहे अथवा असू शकते यासाठी इतर काही कोरिलेशन असणारी उदाहरणे जी गृहीत धरली जात आहेत ती फारच वेगळी आणि ढोबळ आहेत. ज्योतिष्य शास्त्रात एकेका व्यक्तीवर पडणारा वेगवेगळा प्रभाव आहे त्यासाठी आइस्क्रीम विक्री आणि शार्क हल्ला किंवा बिअर विक्री आणि डायपर विक्री यांचे कोरिलेशन जोडणे खूप बादरायण आहे. आणि मुळात ज्योतिष्यशास्त्र हे कोरिलेशनवर आधारित आहे असेही वाटत नाही (का? ते वरच्या पोस्ट मध्ये दिलेय) त्यात कोरिलेशन शोधा असे अतुल, व राज यांचे म्हणणे आहे.
त्यावर वरचा पोस्ट प्रपंच.
@भरत, मूळ लेखात तरी काही खास
@भरत, मूळ लेखात तरी काही खास मोठा बदल केलेला नाही आणि करणार पण नाही. जरूर पडली तर दुसरा नवीन भाग लिहीन पण मूळ लेखात आत्तातरी काही मोठा मजकूर वाढवण्याचा मानस नाही. अनेक वाचक सर्व प्रतिसाद आणि चर्चा वाचत नाहीत म्हणून लेखाखालील ‘अपेक्षित प्रतिसाद आणि खुलासा’ या मध्ये काही बदल करत असतो, ते मुद्दे चर्च मध्ये आलेच आहेत. धन्यवाद!
@मानव तुमच्या विचारांशी मी
@मानव तुमच्या विचारांशी मी पूर्ण सहमत आहे. मी वर लिहिल्याप्रमाणे मुळात ग्रहांचा संबंध माणसाच्या जीवनाशी आहे हे fundamentally तुमच्या माझ्यासारख्या विचारांचा वर्ग मानत नसल्याने machine learning चा प्रयोग आपल्यासाठी तरी नाहीये. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी तो प्रयोग करावा.
पण मला येथे एक नवीनच भीती वाटती आहे. AI, Machin Learning असे जार्गन वापरून ज्योतिषाचा एक नवा अवतार येईल का अशी ती भीती आहे. जर अशा प्रयोगाचे कर्ते प्रामाणिक असतील तर त्यांना त्यांच्या टेस्टिंग मध्येच त्याच्या सत्यासत्याची कल्पना येईल आणि ते पुढे जाणार नाहीत. पण त्याउलट अप्रामाणिक कर्त्यांना मात्र प्रयोग फसला तरी याचे भांडवल करून, ते जार्गन वापरून आणि इतर traditional ज्योतिषांना मागे टाकून आपला व्यवसाय करायची संधी मिळणार आहे. या नवीन अवताराला थोपवणे एक जिकिरीचे काम असेल कारण AI / ML म्हणल्यावर लोक त्याच्या मागे जाणारच. आत्तासुद्धा काही APPs लोकांनी लाँच केली आहेत आणि त्यांचा Business बरा चालला आहे. या वर मी एक नवीन धागा काढेन मग चर्चा करू.
खरं आहे. नवीनच छद्मविज्ञान
खरं आहे. नवीनच छद्मविज्ञान सुरू होईल कदाचित.
>> काही कोटींच्या संख्येत
>> काही कोटींच्या संख्येत असणाऱ्या शक्यतांमध्ये असा कितीसा अभ्यास झाला असेल ज्यावरुन ज्योतिष्य शास्त्र मांडल्या गेले
एकूण लोकसंख्येच्या फार कमी प्रमाणात ठोस उदाहरणे (Sample set) आणि बहुतांशी श्रद्धा यावर ते मांडले गेले असावे आहे याबाबत सहमत आहे. पण एक रोचक निरीक्षण यानिमित्ताने इथे नोंदवावे वाटते ते असे कि ज्या काळात पृथ्वी स्थिर आणि सगळे ग्रहतारे तिच्या भोवती फिरतात असे Geocentric Model ग्राह्य मानले होते त्या मॉडेल नुसार जेंव्हा पृथ्वीसापेक्ष इतर ग्रहांच्या कक्षाचे पॅटर्न्स काहीसे असे दिसतात:
यामध्ये, पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची वारंवारता अधिक असेल काय(?) जेणेकरून एकूण शक्यता कमी होतील.
>> मानव, अतुलजींचा मुद्दा Correlation does not imply causation या मुद्द्यावरच गुंफलेला आहे. त्यांच म्हणण अस की कार्यकारणभाव आहे कि नाही? असल्यास काय असू शकतो हे शोधणे ही पुर्ण निराळी गोष्ट आहे. आम्ही फक्त कोरिलेशन वा निरिक्षणांमधली संगती सांगतो
>> प्रकाशजी ते कळले, पण मुळात कोरिलेशन आहे हेच अजून सिद्ध झाले नाही.
दोन्ही मुद्द्यांशी सहमत आहे. इतक्या प्रचंड संख्येच्या शक्यतांमधून पॅटर्न मिळण्यासाठी लागणारा खात्रीशीर डेटा मिळवणे हेच मुळात जवळपास अशक्य कोटीतले आव्हान आहे, आजच्या घडीला तरी. आणि समजा जरी मिळाला तरी त्यात पॅटर्न्स मिळतील याबाबत आपण (माझ्यासहित) फार आशावादी नाही. हे सगळे खरे असले, तरी समजा त्यातूनही हे सगळे प्रयोग कुणी केलेच आणि त्यातून एखाद्या आयुष्यरेखेशी (जसे कि, विशिष्ट आयुर्मान किंवा कमाई दर्शवणाऱ्या) मिळताजुळता पॅटर्न मिळालाच, कोरिलेशन सापडलेच तर त्याचे काय करायचे?
असा प्रश्न आहे. केवळ त्या दोन गोष्टींमध्ये कार्यकारणभाव नाही म्हणून दुर्लक्ष करायचे कि "आइस्क्रीम विक्री वाढली म्हणजे शार्क हल्ल्याची शक्यता जास्त आहे" ह्या न्यायाने ते ग्राह्य धरायचे?
पण.... इथे एक मोठा पण आहे. पण, याच विचारधारेने (पॅटर्न शोधण्याच्या) पुढे जाऊन निष्कर्ष काढण्यात एक फार मोठी चूक होत आहे असे लक्षात आले. एक फार मोठे गृहीतक मानले आहे कि जे अनेक वास्तव उदाहरणातून चुकीचे आढळते. त्यामुळे हा मशीन लर्निंग अप्रोच सुद्धा चुकीचा ठरेल असे वाटते. कसे ते पुढे सांगतोच. त्या आधी...
>> ज्योतिष्य शास्त्रात एकेका व्यक्तीवर पडणारा वेगवेगळा प्रभाव आहे त्यासाठी आइस्क्रीम विक्री आणि शार्क हल्ला किंवा बिअर विक्री आणि डायपर विक्री यांचे कोरिलेशन जोडणे खूप बादरायण आहे....... त्यात कोरिलेशन शोधा असे अतुल, व राज यांचे म्हणणे आहे.
जन्माच्या वेळेची व्याख्या नक्की नाही. पण समजा ती नक्की केली आणि ती जी काय आहे (कोणताही ठोकताळा डिफाईन करा), त्यानुसार "एका तारखेला एका वेळी जन्म झाला असेल तर त्या व्यक्तींचे भविष्य ठराविक असते" असे मानले गेले आहे. आणि त्यामध्ये जन्मठिकाणाचा सुद्धा अंतर्भाव आहे. आणि हेच गृहीतक चुकीचे वाटते. कारण कित्येक जुळी आपण पाहतो ज्यांची जन्म/वेळ/ठिकाण एकच असूनही वेगवेगळी नशिबं घेऊन जन्माला येतात. त्यांची कर्तृत्व, आयुर्मर्यादा, क्षमता, कौशल्य इत्यादी सुद्धा भिन्न भिन्न असतात. बरं, जुळी नसतील पण जन्मवेळ एकच पण ठिकाण वेगवेगळे असल्याने असा जास्त फरक पडेल असे वाटत नाही. एकमेकांपासून लाखो करोडो किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रहांच्या पॅटर्न्सच्या तुलनेत काही किलोमीटर अंतराचा फरक फार फार नगण्य. त्यामुळे एकाच वेळी जन्माला येणाऱ्या व्यक्तींचे नशीब सुद्धा जवळपास सारखेच असायला हवे पण तसेही घडताना दिसत नाही. त्यामुळे मशीन लर्निंगच्या प्रयोगा मागचे गृहीतकच या मुद्द्यावर गैरलागू ठरेल.
(Btw, राज यांचा प्रतिसाद त्या दुसऱ्या धाग्यावर आहे, इथे तोच संदर्भ आहे का? राज यांनी तो प्रतिसाद बऱ्याच आधी (काही महिने?) लिहिला आहे बहुतेक. तो मी परवा वाचला. योगायोगाने त्यांनीसुद्धा मशीन लर्निंगचा अप्रोच चर्चिला आहे)
>> AI, Machin Learning असे जार्गन वापरून ज्योतिषाचा एक नवा अवतार येईल का अशी ती भीती आहे.
सहमत आहे. पण विज्ञानातल्या जार्गन वापरून "टेक्नो" पिढीला भुरळ पडेल असे अनेक प्रयोग सध्या सुरु आहेत. केवळ ज्योतिषापुरतेच ते मर्यादित नाही. तो वेगळा व मोठा विषय आहे. त्याची व्याप्ती धाग्याच्या चर्चेपलीकडे जाईल.
पण चौथ्या मितीत डोकावून पुढे काय वाटा आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करणे हे विविध प्रकारे सुरूच राहील व त्यात गैर काही आहे असे वाटत नाही. फक्त प्राचीन काळात हा प्रयत्न Belief System च्या आधारे केला गेला. त्या काळात Belief System प्रबळ होती (इतकी कि, ह्र्दय हेच सर्व शरीराचे नियंत्रण करते (मेंदू नव्हे) अशीसुद्धा श्रद्धा अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये अस्तित्वात होती)
तुम्ही cosmic bit flip बद्दल
तुम्ही cosmic bit flip बद्दल ऐकलंय का? कॉस्मिक रेजने एकाचा शून्य किंवा शून्याचा एक झाला की सगळी गणितं पर्यायाने आडाखे ( ज्योतिष किंवा AI) फाफलतात. आपला पृथ्वीवरचा वेळ घालवायला सगळी एंटरटेनमेंट आहे झालं. इतके बोलून मी माझे समारोपाचे १० शब्द संपवते.
उदरनिर्वाह, दुःख, वेदना,
उदरनिर्वाह, दुःख, वेदना, मृत्यु आणि आहे ते गमावण्याची किंवा नाही ते मिळवण्याची चिंता किंवा भीती मनातून घालवण्याचं धैर्य जोवर प्राप्त होत नाही तोवर मानवी मनाची असुरक्षितता जाणं फार कठीण आहे. आणि जोवर मन असुरक्षित आहे तोवर ते ज्योतिष, देव-धर्म, गुरू, नेते इत्यादिंमध्ये बाह्य आधार शोधतच रहाणार. धैर्यवान मनोधारणेसाठी बालपणापासुनच तसे संस्कार किंवा वरिलप्रमाणे प्रबोधनं व्हायला हवीत.
उदरनिर्वाह, दुःख, वेदना,
उदरनिर्वाह, दुःख, वेदना, मृत्यु आणि आहे ते गमावण्याची किंवा नाही ते मिळवण्याची चिंता किंवा भीती मनातून घालवण्याचं धैर्य जोवर प्राप्त होत नाही तोवर मानवी मनाची असुरक्षितता जाणं फार कठीण आहे. आणि जोवर मन असुरक्षित आहे तोवर ते ज्योतिष, देव-धर्म, गुरू, नेते इत्यादिंमध्ये बाह्य आधार शोधतच रहाणार <<<<< +२००
उदरनिर्वाह, दुःख, वेदना,
उदरनिर्वाह, दुःख, वेदना, मृत्यु आणि आहे ते गमावण्याची किंवा नाही ते मिळवण्याची चिंता किंवा भीती मनातून घालवण्याचं धैर्य जोवर प्राप्त होत नाही तोवर मानवी मनाची असुरक्षितता जाणं फार कठीण आहे. आणि जोवर मन असुरक्षित आहे तोवर ते ज्योतिष, देव-धर्म, गुरू, नेते इत्यादिंमध्ये बाह्य आधार शोधतच रहाणार >>>> +1
विकास, +१ मनोधैर्य वाढणे हे
विकास, +१ मनोधैर्य वाढणे हे जरूरीचे आहेच पण रोजच्या जीवनातली अनिश्चितता जितकी कमी असेल तितके मनोधैर्य वाढण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.
अनिश्चितता कमी जास्त करणं
अनिश्चितता कमी जास्त करणं आपल्या हातात असेलच असं नाही. अनिश्चितता हा जीवनाचा भाग आहे हे स्विकारण्याची आपली मानसिक जडणघडण झाली तर मन निश्चिततेसाठी बाह्य आधाराचा शोध घेणार नाही. त्या जडणघडणीलाच मनोधैर्य म्हणता येईल.
जिथे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे
जिथे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, एकूण गरीबी आहे अशा ठिकाणी या अंधश्रद्धा अधिक फोफावलेल्या दिसतात कारण अनिश्चितता जास्त असते. जेव्हा एका सुसंस्कृत, सुशिक्षित, संपन्न आणि न्यायाधिष्ठीत (just) समाजात आपण वावरतो तेव्हा काही अनिश्चितता नक्कीच कमी होतात.
जिज्ञासा +१
जिज्ञासा +१
अनिश्चितता सगळ्यांनाच वाटत
अनिश्चितता सगळ्यांनाच वाटत असते.
श्रीमंतांच्या अंधश्रद्धाही श्रीमंत असतात.
शिक्षणाचा कितपत संबंध आहे मला माहिती नाही. पण पीएचडी झालेले अंधश्रद्धाळूही बघितलेले आहेत.
+१ वावे.
विकास + १.
+१ वावे.
आपलं काम होण्यास कोंबड अथवा बकरी चढवणं या ऐवजी साधे नवस सोळा सोमवार अथवा पारायणे यात अंधश्रद्धा कमी झाली वाटले तरी त्या व्यक्तीची अनिश्चितता कमी झालीय असे म्हणता येणार नाही. शिक्षण + विकास आर्थिक स्थैर्य देईल, सोयी सुविधा देईल पण त्या बरोबरच नव्या अनिश्चितता घेऊन येईल. दुःख, वेदना हे तर असतीलच. अंधश्रद्धांचे स्वरूप बदलेल, (एक प्रकारे तेही चांगले आहे) पण जातील त्या प्रबोधनानेच.
मलाही जितका जास्त पैसा तितकी
वावे, + 1 जितका जास्त पैसा तितकी जास्त अनिश्चितता व अंधश्रद्धा बघितलीये त्यात शिक्षणाचा काही संबंध नाही. आणि जनजातीमध्ये श्रद्धा (आपल्या मते अंधश्रद्धा) त्यांना बळ देते असंही बघितलंय.
वावे + १
वावे + १
मी व्यक्तीच्या स्तरावर म्हणत
मी व्यक्तीच्या स्तरावर म्हणत नाहीये समाजाच्या स्तरावर म्हणते आहे. जोपर्यंत सगळ्या समाजात हे बदल घडून येत नाहीत तोपर्यंत त्या समाजात राहणाऱ्या व्यक्तीला अनिश्चितता भेडसावत राहणार हे निश्चित.
Pages