कांदे पोहे

Submitted by अमृताक्षर on 12 March, 2021 - 03:49

नमस्कार मायबोलीकरांनो,
इथे प्रत्येक शंकेची उत्तरे आणि विषयाबद्दल इतर पैलू समजतात म्हणून हा विषय इथे मांडते..असा दुसरा धागा असेल तर लिंक द्यावी.
माझ्या मामे बहिणीला 1 वर्षा पासून लग्नासाठी मुलगा शोधणे चालू आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे केस चांगले दाट काळेभोर आणि कमरेपेक्षा खाली आहेत. दिसायला काही प्रोब्लेम नाही. घरची सगळी काम तिला येतात कारण 10 वी पासून सगळ तीच करते. एकदम शांत आणि सालस पोरगी आहे. तीच engg झालंय 2 वर्षा आधी. गावाकडे राहते त्यामुळे अजुन नोकरी करत नाही पण लग्नानंतर करण्याची तयारी आहे.
पण काही कारणाने तीच लग्न जमत नाही कधी यांना आवडत नाही कधी त्यांना आवडत नाही.
आता पुढच्या महिन्यात मला पण मुले पाहायला चालू होईल या एकंदरीत प्रकरणाची थोडी भीती वाटते. मी माझ्या मामे बहिणीशी या विषयावर बोलली तर तिने सांगितलेल्या काही शंका इथे टाकते ते सगळे प्रश्न माझ्या सुद्धा मनात आहेतच.
1) ती शांत असल्यामुळे कधी कुठल्या पाहून गेलेल्या मुलाला जास्त बोलली नाही फोनवर..मेसेज कॉल्स जास्त झाले नाही तर समोरच्या मुलाला misunderstanding झाली की ही मुलगी interested नाही हीच जबरदस्ती लग्न करताय.
म्हणून पुढच्या वेळी ती थोडी बोलती झाली मेसेज वगैरे केले तर त्या मुलाला वाटल ही खुपचं forward आहे. खूप बोलते.
2) biodata आला तेव्हा जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न तिने स्वतः केला नाही कारण तिला वाटल घरचे बघतीलच बरोबर. तर तो मुलगा ऑलरेडी लिव्ह इन मधे राहतो हे लग्न जुळण्याच्या फायनल स्टेज ला माहीत झालं.
म्हणून मग हिने पुढच्या वेळी जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर समोरच्या ला ही जास्त बोल्ड आणि डाऊट घेणारी वगैरे वाटली आणि नकार आला.
3) एक मुलगा चांगला होता. पाहायला लवकरच येणार होता त्यांचं चॅटिंग वगैरे चालायचं चांगली मैत्री झाली आणि दिवसरात्र बोलणं चालू झालं. रोज काय करताय updates, फोटो पाठवणे वगैरे चालू राहिलं. पण नंतर त्याने पाहायला यायला पण नकार दिला कारण त्याला वाटल की ही मला इतकं रात्री वगैरे बोलते स्वतःचे फोटो
(नॉर्मल फोटो ) वगैरे पाठवते तर ही बाकीच्यांना पण असच बोलत असेल
म्हणून मग next टाईम ही समोरच्या मुलाला बोललीच नाही तो जेवढं बोलेल तेवढंच..फोटो वगैरे तर अजिबात पाठवले नाही तर त्या मुलाला वाटले ही खूप boring आहे नाहीतर हिला दुसरं कुणी आवडत असेल.
4) विवाह मधली अमृता राव सारखं राहील तरी चालत नाही आणि मै हू ना वाली अमृता राव सारखं राहील तरी चालत नाही
ती खुपचं कन्फ्युज आहे आता की कस आणि काय वागावं. प्रत्येक जण prtek गोष्टीचा काही तरी अर्थ काढत बसतो. लग्न जुळण तिला खुपचं अवघड वाटायला लागलाय म्हणे आता..
तिच्यावरून मला माझी भीती वाटते कारण मी एकतर extrovert आहे. एक्स्प्रेस होणे बोलणे हा माझा स्वभाव आहे. आणि कायम घराबाहेरच राहिल्यामुळे घरची काम वगैरे खूप काही येत नाही दिसायला सुद्धा तिच्या इतकी सुंदर नाही. एकदम विवाह मधली अमृता राव वगैरे मला बनता येणार नाही. एक दोन पाहण्यात लग्न जमून जाव आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला आहे अस accept करणाऱ्या मुलाशी इतकीच माफक अपेक्षा आहे.
पुढच्या महिन्यापासून हा अवघड कांदे पोहे कार्यक्रम आमच्याकडे पण सुरू होणार आहे. आणि माझ्या मामे बहिणीच ऐकून मी खरचं खूप भांबावून गेली आहे.
कुणाला काही चांगले वाईट अनुभव असतील तर इथे शेअर करा.
शिवाय या कार्यक्रमा bddl काही अजुन advices tips suggestions असतील तरी द्या..प्रामाणिकपणे..
धन्यवाद..!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बस्ता या चित्रपटात दाखवलं आहे असं, जुन्या काळात ज्योती सुभाष यांचं लग्न ठरल्यावर सासरच्या बायका त्यांना असं वागवतात.

Pages