Submitted by vilasrao on 9 June, 2015 - 16:46
उद्दाम झाली ही श्रिमंती आमची तक्रार नाही !
जोही दिसे तो एकटा , कोणी कुणाचा यार नाहीं !
काळीज माझे रोज ती चोरून नेते खरे पण
सांगू कशाला? ठेवला मीही पहारेदार नाहीं !
घेतो न शपथा मी कधी ! कोणी तुला तक्रार केली ?
खोटे असावे जे बोलतो मी, यासहीआधार नाहीं !!
आभार कोणाचे कवी हा मानून गेला एवढे
की एवढा सन्मान कवितेलाच दारोदार नाही !
ओसाड झाली माळराने अन फुले सारी गळाली
ही वादळे सांगून गेली का मला 'तू येणार नाही ?
विलास खाडे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
.
.