नुकतच लग्न झालेल , नवीन घर आणि जॉब , तारेवरच्या या कसरतीत माझ्याकडून जवळ पास एक आठवडा माझ्या लाडूबाई बहिणीशी एक आठवडा बोलणं होवूच शकल नाही....
मॅडम आमच्या वरती जाम चिडल्या , अन त्या रागतच एक दोन मेसेज आले , त्यातलाच हा एक.....
कधी कधी असे का होते ना,
व्यक्तीला expectation पेक्षा मोठे व्हावे लागते
परके तर आपले नसतातच ,
मग आपले का परके असल्यासारखे behave करू लागतात
काही प्रॉब्लेम असेल तर ते सांगणे पण टाळतात
आपली आठवण काढणारे जीवंत आहेत हे विसरून जातात
आपल्याच रक्ताच्या माणसांना ही नकळत विसरून जातात
आपलीच माणसे असे का वागतात ???
मग मी ही तिला असाच रीप्लाय दिला.हा माझा रीप्लाय....
कधी कधी काय होत न,
माणसे तीच असतात ,पण वेगळी असते ती परिस्थिति
प्रेमही आहे तसच असत, पण वेळेची चालू असते मारामारी
प्रॉब्लेम्स म्हटलं तर असतातही अन नसतातही
कॉल नसेलही होत नेहमी नेहमी
पण आठवणीच्या हिंदोळ्यावरती असतातच न बोलाचाली
काही नाती बनलेलीच नसतात , दूर होण्यासाठी
असे क्षण असतात , परीक्षा घेण्यासाठी
चुका तर मोठेही करून जातात......
आपल्यावरचे प्रेम अजमावण्यासाठी
आमची ही काव्यमय भांडणे शेअर करविसी वाटली , म्हणून हा खटाटोप
मस्त आहे काव्यमय भांडण. पण
मस्त आहे काव्यमय भांडण.
पण बहिणीशी (किंबहुना कोणाशीही) काव्यमय भांडायला आमाला काय जमूचा नाय.
मस्तय ! असं जोडीदारासोबत
मस्तय ! असं जोडीदारासोबत झालंतर कसलं रोमँटीक वाटेल ना

पण ते भांडण संपायला हव ही अट आहेच
+१
+१
धन्स मामी, रिया ,विजय देशमुख.
धन्स मामी, रिया ,विजय देशमुख.
मस्तयं (ह्या जन्मात तरी
मस्तयं
(ह्या जन्मात तरी काव्य लिहीणे जमनार नाही.. त्यात भांडाय्चं म्ह्णजे अवघड)
(No subject)