मला गाण्यातील स्वर आणि तालाच्या आधी, त्यातले शब्द भावतात. शब्दांच्या केलेल्या हरकती , खेळ यां कड़े माझे जास्त लक्ष जाते.
अनूप जलोटा यांचे भजन '' हे मैंया मोहि मैं नहीं माखन खायो'' याचे उत्तम उदहारण. सुरुवातीचे हे मैंया मोहि मैं नहीं माखन खायो आणि आता आई ऐकतच नाही अजुन तिला संशय आहे असे लक्षात आल्यावर झालेला बदल हे मैंया मोहि मैंनेही माखन खायो, हा बदल जेंव्हा समजतो तेंव्हा हे शब्दच सुर आणि तालाच्या सुन्दर कव्हर मधला मुद्देमाल आहे हे लक्षात येते.
आज लिहितोय ते मराठी मधील '' मी मज हरपून बसले ग '' या बद्द्ल. गाण्यात ही, पहिली दोन कड़वी शृंगार रसावर आधारित आहेत, गाणे बहुधा राधेला मनात कल्पुन असावे, अतिशय सुंदर गाणे आहे. पहिली दोन कडवी राधा तिच्या आणि कृष्णाच्या शृंगाराबद्दल सांगते आहे तिच्या सखीला, हो सखीलाच कारण तिच्या साठीच तर येतो तो सुरेख ग आणि आशा भोसलेंचा आवाज. या गाण्यांत तर स्वत: श्रीरंग ही या आवाजाला राधेचाच समजला असता आणि नंतर ' लगान' मधल्या ' राधा कॅसे न जले ' मुळे त्याची खात्रिच पटली असेल.
' साखर झोपे मध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ग ' , मी ५वी - ६वीत असल्यापासून प्राजक्ताची फुले माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, म्हणून ' प्राजक्तासम टिपले ग ' याचा याची देहि याची डोळा याची हाती अनुभव आहे,
आणि त्यात भर घातली ती चंद्रशेखर गोखालेंच्या कवितेनं
प्राजक्त झाडावरुन ओघलतो
त्याच्या आवाज होत नाही
याचा अर्थ असा नाही की
त्याला इजा होत नाही ,
असो विषयांतर फार झाले, प्राजक्त आणि गोखले हे सगळे स्वतन्त्र विषय आहेत.
दुस-या कडव्यात राधेला दिव्याची वात आणि गज-यातून मोकळ्या होउन पसरलेल्या मोगा-याच्या कोमेजल्या कळ्या या सारख्याच वाटताहेत. एकीकडे पहाटेच्या मंद वा-याने होणारी वातीची थरथर तर दुसरीकडे तीच थरथर राधेत जागवतो आहे श्रीरंग. राधेच्या या हालचालीनी श्रीरंगाला पण जाग आली आणि त्याने जो स्पर्श केला राधेला, त्या सुख स्वप्नात तिला वाटले की आपण कालिंदी काठी असलेल्या झोक्यावर आहोत काय पण श्रीरंगाचा स्पर्श आहे हे समजल्यावर तिला प्रथम लज्जेची जाणीव झाली पण नंतर त्या लज्जेतुन बाहेर येतांच ती उमलली आणि मग ती त्या झोक्यांवर झुलू लागली.
गाण्या मधल्या तिस-या कडव्या तील' त्या नभ श्यामल मिठीत नकळत बिजलिसम लखलखले ग ' या ओळी भर उन्हाळ्यात पण धुवांधार पावसाची चित्रे उभा करतात. पण या गप्पा चालु असताना बहुधा सासुच्या किंवा कुणाच्या तरी येण्याची चाहुल लागते आणि राधा लगेच आपल्या सखीला या शृंगार जालातुन बाहेर काढताना म्हणते ''दिसला मज तो देवकी नंदन ', संपलंच की सारे शृंगारचा पासून सपशेल फरकत आणि चक्क आता श्रीरंगा वरून राधा एकदम देवकी नंदन पर्यंत येउन पोहोचते.
ज्या श्रीरंगाने राधेला प्राजक्तासम टिपलं , ज्याच्या श्वासांनि ती थरथरली, ज्याच्या स्पर्शानी ती लाजली, उमलली आणि झुलली, त्याच्या मिठीत बिजलीसम लखलखली पण, आता सांगताना मात्र कशी सांगते आहे त्या लखलख प्रकाशांत दिसला तो कोण, तो नभ शयामल श्रीरंग नाही, राधा म्हणते '' दिसला मज तो देवकी नंदन , अन मी डोळे मिटले ग ''
या राधे कृष्णाच्या सुन्दर गीतांने मी या लेखन प्रकारची सुरुवात केली आहे आणि माझ्या क्षमते नुसार पुढे ही विविध गीतां बद्दल ' लिहेन.
हर्षद
पुर्व प्रकाशित - http://harshad-gaaanikha.blogspot.com
तुमचा उपक्रम स्तुत्य आहे.
तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. मैया मोही मधे जलोटांनी शब्दांवर दिलेला जोर नीट जाणवतो.
"मी मज" बद्दल लिहिलेले पूर्णपणे पटले नाहि. तिसरे कडवे हे आधीच्या दोन कडव्यांचा climax आहे. "बिजलीसम लखलखले ग" हि ओळ शब्दशः नाहि. त्यामूळे "दिसला तो" चे तुमचे विवेचन पटले नाही. डोळे मिटून घेण्याचा शेवट हा "ति"च्या त्याच्या वरच्या प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार अशा अर्थाने मला वाटतो. (क्रुष्ण हा प्रेमाचे स्वरुप म्हणून भारतीय साहित्यामधे येत असतो त्यामुळे श्रीरंग, देवकीनंदन हे उल्लेख असावेत.)