१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
मराठी हिंदीतील भरपूर वाचन (न
मराठी हिंदीतील भरपूर वाचन (न रानातला), आणि (ण बाणातला) सवय हे महत्वाचे आहे.
तुम्ही न ला न म्हणणे व ण ला ण
तुम्ही न ला न म्हणणे व ण ला ण म्हणणे याचे समर्थन करत आहात काय?
समर्थन ? किं कारणम् ? कण कण
समर्थन ? किं कारणम् ?
कण कण मे भगवान
<< मला कुणी सांगेल का? न
<< मला कुणी सांगेल का? न रानातला कधी वापरायचा व बाणातला कधी? >>
किती सोप्पं आहे. रान लिहीताना न आणि बाण लिहीताना ण.
खान की खाण ?
खान की खाण ?
जोक्स अपार्ट, खरेच थंडी फार
जोक्स अपार्ट, खरेच थंडी फार आहे, माझा चहा गरमच होत नाहीये गॅसवरून ग्लासमध्ये घेईघेईपर्यंत थंडतोय, आणि मी गरम समूजन फुंकर मारायला जातोय तर गंडतोय ..
----- तुम्ही माझ्या गावाला म्हणजे कॅनडात या, तोन्डावाडे निघालेली थुन्की जमिनीवर पडेपर्यन्त बर्फ होतो असे म्हणतात. अर्थात येताना शारुकला तेथेच सोडा.
जानेवारी, फेब्रुवारी अजुन जायचा आहे.
खान की खाण ?
खान की खाण ?
बस करा ताप मानाचे कौतुक. .
बस करा ताप मानाचे कौतुक. . इथे या माझ्याकडे ... अंटार्क्टिका ला... आयीस्ड टी पाजतो सगळयांना...
नमो मोदी आणि णमो अरिहंताणं !
नमो मोदी आणि णमो अरिहंताणं !
आयीस्ड टी पाजतो
आयीस्ड टी पाजतो सगळयांना
----- सगळ्याना चहा पजण्याचे औन्दार्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.... हृदय (खिसा) फार मोठे आहे. आयीस्ड टी नको पण छान उकळता चहा पळेल.
धागा लवकरच हजार
धागा लवकरच हजार गाठणार...
न्यू इयर सेलिब्रशन ला इथेच जमणार पब्लिक असे दिसतंय... जिवाभावाचा कट्टा आहे हा....
हजारी गाढायच्या उद्देशानेच
हजारी गाढायच्या उद्देशानेच आपण सर्वान्नी कामाला लागायला हवे...
धागा हजारी गाढायला आला आतातरी
धागा हजारी गाढायला आला आतातरी मुळविषया कडे वळू या सगळेजन.
मुळ विषय आहे आधुनिकता की उथळपणा ?
३१ डिसेंबरच्या रात्री सगळे
३१ डिसेंबरच्या रात्री सगळे आधुनिक आणि उथळ लोक्स काय काय करणार आहे ते लिहा पाहू....
मसाला दूध पिऊन लवकर झोपणाऱ्या संस्कारी लोकांनी दुसरे दिवशी लिहीले तरी चालेल.
रुन्म लॉजिक.. बशीतला चहा - ती
रुन्म लॉजिक..
बशीतला चहा - ती चहा
कपातला चहा - तो चहा
मगातला चहा - ते चहा....
स्कुटर चालवणारी मुलगी असेल तर - ती स्कुटर
स्कुटर चालवणारा मुलगा असेल तर - तो स्कुटर..
रच्याकने मागे कुठेतरी प्रस्तुत लॉजिक कर्त्याने 'माझे लॉजिक खुप चांगले आहे' असं लिहिल्याच स्मरतं..बहुतेक त्यात लोल लिहयचं रहिलं होतं (लोल लॉजिक)
लोल लॉजिक = लोजिक
लोल लॉजिक = लोजिक
सुरेख तुम्ही तुमचा प्रतीसाद
सुरेख तुम्ही तुमचा प्रतीसाद का गायब केला .तो वाचुन मी धाग्याला अनुसरुन विचार करत होते. विषय अगदीच न लिहि
णासारखा नाही .धागाकर्ती चा प्रश्नांचे निराकारण व्हायला हवं. धागा सिरिअसली विचार करण्यासारखा आहे.
इश्य! लाजले बाई मी.
इश्य! लाजले बाई मी.
रच्याकने मागे कुठेतरी
रच्याकने मागे कुठेतरी प्रस्तुत लॉजिक कर्त्याने 'माझे लॉजिक खुप चांगले आहे' असं लिहिल्याच स्मरतं..
>>>>>>>
अग्नीपंख,
मी कॉमनसेन्स मध्ये डिप्लोमा आणि लॉजिक मध्ये डिग्री केलीय, स्मार्ट थिंकिंगमध्ये जन्मापासूनच मास्टर आहे, तरी सध्या औट ऑफ द बॉक्स थिंकींग वर पीएचडी चालूय, अध्येमध्ये प्रत्यय येतच राहणार..
सिनि ,सहमत.
सिनि ,सहमत.
सध्या औट ऑफ द बॉक्स थिंकींग
सध्या औट ऑफ द बॉक्स थिंकींग वर पीएचडी चालूय, अध्येमध्ये प्रत्यय येतच राहणार.>>
बॉक्स की माइंड ?
फक्त ६९ प्रतिसाद वाढ गे
फक्त ६९ प्रतिसाद वाढ गे मायबोली !
घ्या. अजून एक प्रतिसाद.
घ्या. अजून एक प्रतिसाद.
आमच्याकडे बरंचसं पब्लिक (जास्त करून गावठी) ती चहा म्हणतं. एका बेस्ट फ्रेंडला जोपर्यंत "तो चहा" म्हणत नाही तोपर्यंत रोज तुलाच चहा करावा लागेल अशी ऑर्डर केली होती. परत कधी ती चहा म्हटलं गेलं नाही.
इब्लिसजी ,लाजण्या सारखे काही
इब्लिसजी ,लाजण्या सारखे काही नाही यात.विचार करण्यासारखे आहे पटेल तुम्हालाही .मी नंतर लिहेन .
ह्यापुढे डोक्याचा भुगा झाला
ह्यापुढे डोक्याचा भुगा झाला आहे ह्या विधानाला पर्याय म्हणून डोक्याचा ५१९१८ झालाय असे विधान वापरावे.
कोकणस्थ माईंड जर आपण ब्रेन या
कोकणस्थ माईंड जर आपण ब्रेन या अर्थाने बोलत असाल तर तसा काही प्रकार अस्तित्वातच नसतो. जिथे आपण शर्टाला खिसा शिवतो त्या डाव्या बाजूच्या आत कुठेतरी माणूस नावाचे यंत्र चालू असते, तो विचारही तिथूनच करतो, ब्रेन फक्त त्याने केलेले विचारांची अंमलबजावणी करायला इतर ईंद्रियांना आदेश देतो.
ऋन्मेष, जवळपास कुठे भूकंप
ऋन्मेष,
जवळपास कुठे भूकंप झाला तर कळवाल का? धरणीमातेने आपल्याला पोटात घ्यावे असे आता मला वाटत आहे.
खिसा शिवतो त्या डाव्या
खिसा शिवतो त्या डाव्या बाजूच्या आत कुठेतरी माणूस नावाचे यंत्र चालू असते, तो विचारही तिथूनच करतो, ब्रेन फक्त त्याने केलेले विचारांची अंमलबजावणी करायला इतर ईंद्रियांना आदेश देतो.>>> हतबुद्ध होणे या वाक्प्रचाराचा अर्थ कळला.
साती आणि इब्लिस!!! है इसका कोइ जवाब!!!
Bhushan dada toooooooo gud
Bhushan dada toooooooo gud
माईंड जर आपण ब्रेन या अर्थाने
माईंड जर आपण ब्रेन या अर्थाने बोलत असाल तर तसा काही प्रकार अस्तित्वातच नसतो >> हे नवीनच आहे. माझ्यामते ब्रेन जास्त प्रॅक्टीकल असतो आणि त्यातुन निघणारया बुध्दी चा सर्वजण वापर करतात.व तो करावा.
....माणूस नावाचे यंत्र चालू असते, तो विचारही तिथूनच करतो, ब्रेन फक्त त्याने केलेले विचारांची अंमलबजावणी करायला इतर ईंद्रियांना आदेश देतो. >> हे पण एकाअर्थी छानच आहे .
परत धागा भरकटला.
Pages