ज्या गावात बालपण, तरूणपणाचा जास्तीत जास्त काळ गेला, त्याच्याशी खास आठवणी निगडीत असतात. काही कारणाने गाव सोडून जावे लागले तरी त्या गावाचे आपल्या जीवनातील स्थान कधीच ढळत नाही. अशी खास गावे जन्मगाव किंवा भावकी / गावकी असलेलीच असतील असे नाही. आमचे गाव दुष्काळी असल्याने मागच्या कुठल्यातरी पिढीत जवळच्या पाण्याशेजारी गावच्या गाव स्थलांतरीत झाले. पुढे शहरातल्या संधी बघून दोन तीन पिढ्यांच्या मागे आम्ही पुण्यात येऊन स्थायिक झालो. पुण्यातही आधी रामवाडीच्या पुढे, मग थोडे सरकत कल्याणीनगर आणि आता मध्यवर्ती ठिकाण ते नवे वास्तव्य वारजेच्या अलिकडे.
पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल.
------------------- अन्यत्र पूर्वप्रकाशित---------------------
शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत
त्र्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !
( विवाहीत पुरूष, बालके व बंदी सोडून).
... भारत भिका सावकार नावाच्या कुणीतरी परवा कधीतरी आत्महत्या केली.
दारूच्या नशेतच त्यानं स्वत:ला संपवलं, असं त्या बातमीत म्हटलं होतं. काय कारण असेल त्याच्या आत्महत्येमागचं?
कर्जबाजारीपणा?... बेकारी?... कौटुंबिक कलह?... की नुसती व्यसनाधीनता?...
... भारत भिका सावकार हा त्या दिवशी आत्महत्या करणारा एकटा नव्हता.
त्याच्या आधीच्या आठवड्यात, विदर्भात एका दिवशी, जवळपास दर तासाला एक आत्महत्या झाली होती...
तरीही, एकाच वर्तमानपत्राच्या डाव्या पानावर, एका न दिसणा-या कोपर्यात, भारत भिका सावकारच्या आत्महत्येची बातमी छापून आली होती...
मडगावच्या एका रेस्टॉरंटमध्ये काम करणारा एक मुलगा. पंधरासोळा वर्षांचा असावा. चार वर्षांपूर्वी गावाकडून आलेला. इथे नोकरीला लागला तेव्हा फक्त टेबल पुसायचं काम करायचा. त्यातही मालकाकडून बोलणी खावी लागायची.
आता एका हातात राईस प्लेट आणि दुसऱ्या हातात दोन कपबशा पकडून सर्व्हिस देतो.
एक्स्पर्ट झालाय.
वर, कमालीचा हसतमुख !
माझ्या टेबलवर आला तेव्हा त्याच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय राहाववलं नाही!
तो मूळचा बिहारचा. मधुबनी का काहीतरी जिल्ह्यातलं एक गाव. तिथे आईवडील, भावंड... मडगावला बाराव्या वर्षी आला. कोंकणी भाषेचा गंध नाही. हिंदीवर जमतंय इथे. बरं चाललंय म्हणाला.
जगणे आणि जिवंत असणे यातला फरक जेव्हा कळतो तेव्हा जगणे अधिक आनंदी होते. हा फरक सूक्ष्म असतो, पण अनेकदा तो समोर आला तरी जाणवत नाही. बऱ्याचदा तो सहजपणे समोर येऊनही, पकडून ठेवायचं सुचत नाही. मग आपलं जगणं म्हणजे केवळ जिवंत असण्यापुरतंच उरतं. जगण्याचा साक्षात्कार व्हावा, केवळ जिवंतपणाच्या सपक जाणिवेतून बाहेर पडून जगण्याचा जिवंत अनुभव घ्यायचा असेल, तर त्याचा जाणीवपूर्वक शोधही घ्यावा लागतो. अनेकदा, अचानक हा अनुभव समोर येतो, आणि ज्याच्या शोधात आपण चाचपडत होतो असे वाटते, तो शोध संपतो.
सह्याद्रीच्या एका उंच कड्याच्या पायथ्याशी वसलेलं कोकणातलं एक टुमदार गाव... हा कडा असा उभा, सरळसोट उभा, की त्याच्या पायाशी उभे राहिल्यावर आपल्याला या निसर्गचक्रातील आपल्या क्षुद्रपणाची आपोआप जाणीव व्हावी, मनावर साचलेली अहंपणाची सारी जळमटे साफ झाल्याचा साक्षात्कार व्हावा...
तर, त्या गावात त्या दिवशी हा अनुभव घेऊन मी तिथल्या शाळेत पोहोचलो. निमित्त खासच होतं.