मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
कला
कॅनव्हास पेंटिंग
"मटका!"
..........सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आंबेगाव शे-पाचशे लोकोत्तर पुरुषांचे गाव आहे. तिथल्या लाल मातीत माणसांची एक निराळीच घडण लपलेली आहे. या जडणघडणीमध्ये अनेक पिढ्या होऊन गेल्या पण या मनुष्य वर्गांमध्ये जी उदात्तता दिसून येते ती अन्यत्र कोठेही नाही. हिरवीगर्द झाडी, विशाल सागरतीर, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि आपल्या छोट्याशा वहिवाटीवर हक्क गाजवणारी मराठमोळी मनाची माणसं की त्या मानवी मनाच्या मानगुटीवर बसलेली भूतं! काय कोणास ठाऊक?
Ocean bookmark
ओशिबाना - वन्स अगेन
सध्या सक्तीच्या एकांतवासात (कोविडमुळे आयसोलेशन) असताना केलेली कलाकारी.
यात मुख्यत: वापरलेली
शेवंतीची फुले
पळसाचे फुल
गुलाबी बोगनवेल
अबोलीची फुले
पपईची लहान पाने
गवताची पाती
हे चित्र खास माझ्या लेकीसाठी.
कसं जमलंय नक्की सांगा.
(चित्राला छानसे शीर्षक सुचवा. )
" कथा, कविता, लेख लिहिण्याची उदासीनता!"
....... खरं तर या विषयावर लेख लिहिण्याचा विचार खूप दिवसांपासून मनामध्ये घोळत होता. आज लिहू, उद्या लिहू असं करता करता राहूनच जायचं,! जाम कंटाळा यायचा. अशा प्रक्रियेला 'प्रोक्रास्टीनेशन' म्हणतात.म्हणजे आजचं काम उद्यावर आणि उद्याचं काम परवावर! तसं बघितलं तर प्रत्येक उदयोन्मुख लेखकाच्या मनामध्ये खूप सार्या कल्पना आकार घेत असतात. काही तो कागदावर उतरवतो तर कधी तो विचार मनातच राहून जातो. याला कारण म्हणजे आपल्या मनातील अनामिक भीती! आपले लिखाण इतरांना आवडेल की नाही! त्यांची काय प्रतिक्रिया असेल यावर, काय प्रतिसाद देतील. ही माझी कल्पना बालिश तर नाही ना वाटणार!
"महाकारूणिक बुद्ध!"
माझ्या शब्दांमध्ये नाही इतके सामर्थ्य
की मी गावी 'गौतमाची' महती!
यत्न हा दिशा मिळावी पांथस्थाला;
कळावी जगण्याची गूढ नीती!!
जेव्हा दुःख जाणवले गौतमाला,
मुक्ती मार्गाची लागली चाहूल!
शोधण्यास ते सत्य निघाले;
त्यागिले त्यांनी यशोधरा अन् तान्हा राहुल!!
दुःख-मुक्ती मिळावी संसाराला,
हा एकच होता त्यांचा ध्यास!
दमन व्हावे दु:ख-तृष्णेचे;
दरवळावा शांती अहिंसेचा सुवास!!
गूढ उकलले या मर्मबंधाचे,
बोधिवृक्षाखाली बुद्ध झाले निर्माण!
दिपवून टाकला समस्त संसार;
उजळल्या दाही दिशा झाल्या गतिमान!!
"स्वातीचे जलबिंदू"
पुन्हा बरसल्या स्वातीच्या सरी,
जलबिंदू झाले निर्माण!
किमया त्यांची शिंपल्यामध्ये;
शिरुन झाली मोत्यांची खाण!!
युगानुयुगे हा खेळ जलबिंदूचा,
नाही कळला कधी जीवाला!
निसर्गाचे हे कालचक्र;
घेई गिरकी क्षणाक्षणाला!!
आसमंतात रचला खेळ,
झालो आनंदाच्या लाटांवर स्वार!
मागोवा घेती सुख-दु:खाचा;
अन् उघडती आठवणींचे द्वार!!
नव्हतीच कधी अपेक्षा स्वप्नांची,
तरी का करीतो पाठलाग!
ही तर रीत जगण्याची;
फक्त वेड्या मनाला यावी जाग!!
"शासकीय तंत्रनिकेतनातलं काॅपी प्रकरण आणि अजून बरेच काही...."पर्व ३रे (सांगता)
(वाचकांना हा प्रश्न पडला असेल. कथेचं शीर्षक "शासकीय तंत्रनिकेतनातलं कॉपी प्रकरण" आहे पण कॉपी प्रकरण अजून कुठे आढळलेलं नाही तर या कथेची सांगता कॉपी प्रकरणानेच होणार आहे)
"शासकीय तंत्रनिकेतनातलं काॅपी प्रकरण आणि अजून बरेच काही....": पर्व २ रे
..... 'अविनाश', 'मनोहर', आणि 'राजाराम' हे तिघे कॉलेजच्या वस्तीगृहात राहत होते तर 'पांडे' आणि 'गोट्या' आपल्या घरी! पण त्यांना आज रात्री होस्टेलला थांबायचे होते कारण ते पिऊन टुल्ल झाले होते. होस्टेलचे गेट रात्री १०:४५ ला बंद होत असे अशा वेळेस काय करायचे तर ते सर्वत: सिक्युरिटी गार्ड वर अवलंबून असायचे.'सेक्युरिटी गार्ड' ओळखीचा असला की त्याला दहा- वीस रुपये किंवा गुटखा पुडी देऊन आपल्या मित्रांना आत मध्ये सोडत असे. पण नेमकं त्या दिवशी नाईट ड्युटी वर 'सदाशिव मामा' होते 'सदाशिव मामा' इमानेइतबारे काम करायचे. होस्टेलचे सुरक्षारक्षक म्हणून ते बारा वर्षापासून कार्यरत होते.