अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा तुम्ही मात कशी कराल?

Submitted by कॅपिटलिस्ट-बंड्या on 12 October, 2019 - 09:22

आजकाल अर्थव्यवस्था गाळात चालल्याच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येतायेत. लोक या बद्दल फार काही बोलताना दिसत नाही. टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांवर भारतात आज काल बऱ्यापैकी सरकारचं नियंत्रण असल्यामुळे क्वचित कुठेतरी एखादी बातमी येते. मायबोलीवर समाजाच्या विविध स्तरांवर काम करणारे लोक आहेत. तुमचे या आर्थिक मंदीविषयी काय विचार आहे आणि ह्यातून बाहेर येण्यासाठी सरकारला काय करावे लागेल? आणि महत्वाचे म्हणजे वैयक्तिक रित्या या मंदीतून वाचण्यासाठी तुम्ही काय प्लांनिंग करत आहेत?

बाकी मंदीला काँग्रेस किंवा भाजप जबाबदार आहे ह्या छाप चर्चा होऊ नये अशी माफक अपेक्षा.

Group content visibility: 
Use group defaults

BJP leader and Rajya Sabha MP Subramanian Swamy has said he was in favour of inscribing the image of Goddess Lakshmi on banknotes which could "improve the condition of the Indian currency".
सुब्रमण्यम स्वामींसारख्या अत्यंत बुद्धिमान, विद्वान माणसानी सांगितलंय म्हणजे नक्कीच तथ्य असणार त्यात.

BJP leader and Rajya Sabha MP Subramanian Swamy has said he was in favour of inscribing the image of Goddess Lakshmi on banknotes which could "improve the condition of the Indian currency".
सुब्रमण्यम स्वामींसारख्या अत्यंत बुद्धिमान, विद्वान माणसानी सांगितलंय म्हणजे नक्कीच तथ्य असणार त्यात.

>>गंभीरतेने म्हटलंय की उपहासाने ?<<
कांटेक्स्ट अभावी, हल्ली कोण गंभीरतेने बोलतो कि मस्करीत (उपहासाने) बोलतो याचा थांगपत्ता लागत नाहि. यामुळे वाचणारे गंभीर वाक्यं हसण्यावारी नेतात, आणि उपहासात्मक वाक्यं गंभीरपणे घेतात... Proud

गाय पॉवर चा हा असा अपमान? ह्यावर कोणी शंका कशी घेऊ शकते? ह्या सगळ्यांना पाकिस्तान ला पाठवायला पाहिजे म्हणजे ह्यांना सी ए ए चे महत्व कळेल!

स्वामींचा व्हीडिओ पाहिला, गंभीरपणेच म्हणाले. इंडोनेशियाने गणपतीचा फोटो नोटांवर छापला आणि त्यांचे भले झाले असे सांगणाराही व्हीडिओ आहे त्यांचा.

जीडीपीचं एकक बदललं का? टाइम्स नाउच्या कार्यक्रमात गृहमंत्री तीन मिलियन टन्स आणि पाच मिलिअयन टन्स म्हणाले.

पूर्ण भारतीय बँकिंग क्षेत्राला सकाळ संध्याकाळ गोमूत्र पाजायला पाहिजे.

करोना संकटाला तोंड देण्यासाठी मार्च महिन्यात केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएम केअर्स फंडमध्ये सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे. पीएम केअर्स फंडच्या ऑडिटमध्ये या खात्यात पहिली रक्कम ही दोन लाख २५ हजारांची होती आणि हे पैसे पंतप्रधान मोदींनी दिले होती अशी माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फंडाची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पंतप्रधानांनी स्वत:पासून याची सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त करत सव्वा दोन लाख रुपये दान म्हणून दिले. मात्र मोदींनी अशाप्रकारे दान देण्याची ही पहिलीच वेळ नसून आतापर्यंत मोदींनी समाजकार्यासाठी १०३ कोटी रुपये देणगी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

(serious enquiry )

मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री यांचा पगार किती असतो कुणाला माहीत आहे का?
१२ वर्षे मुख्यमंत्री आणि ६.५ वर्षे प्रधानमंत्री राहून १०३ कोटी रुपये जमावता येतात का?
कसे?
कुणाला माहीत असल्यास नक्की कळवणे.

Serious answer

उद्धव ठाकरे यांना विचारावे लागेल. मुख्यमंत्री नसतानाही ( म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी) त्यांच्याकडे 143 कोटी रुपयांची संपत्ती होती असे पेपरमध्ये वाचले.

Yogesh Pande Adv यांची पोस्ट -
देशाच्या शेअर बाजारात फार मोठा घोटाळा होत असल्याचा संशय सुचेता दलाल यांनी आज ट्विट द्वारे केला आहे. या त्याच पत्रकार आहेत ज्यांनी हर्षद मेहता प्रकरण शोधून काढले होते.
हे सगळं कोणाच्या तरी आशीर्वादाने सुरू असावे यात कोणत्याही प्रकारे दुमत नसावे. उदा. वर्षा पूर्वी १७/- रु किंमत असलेला ओरचिड फार्मा कंपनीच्या शेअरचा दर थेट २४००/- रु होतो , अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअरचे दर वर्षभरात चक्क ४ ते ६ पटीने वाढले. अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांचा कोणताही व्यवसाय नसतांना त्यांच्या शेअर्सच्या दरात मोठी उलाढाल , चढ उतार होत आहे.
SEBI , RBI यांच्या कडून गैरप्रकारास आळा टाकतील अशी काही अपेक्षा ठेवणे हास्यास्पद आहे. काही दिवसांपूर्वी रिर्जव बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी भारताच्या शेअर बाजार फुगा असल्याचे सूचक इशारा दिला मात्र या बद्दल SEBI ने मौन धारण केले , दास यांनीही पुढे या विषयावर वक्तव्य टाळले..!
एकंदरीत ही टोळी देशातील लाखो गुंतवणूकदारांना , बँकांना गोत्यात आणणार हे नक्की !
लहान गुंतवणूकदारांनो सावध रहा , सजग रहा .. भामटे दरोडेखोरांनी कधी कसे लुटले हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही.. (वाटल्यास पोस्टचा screen shot काढून ठेवा ..!!! )
199196459-1764143577121079-8731696246222212928-n

तिला आणि त्या क्षेत्रातल्या बऱ्याच जणांना माहित असणारच. कोंबडं कितीबी झाकलं तरी बांग द्यायचं थोडी बंद होतंय. पण अडाणी आणि तत्सम टोळीचा पाळीव श्वान बहुमताने सत्तेत असल्यावर कोणाची बिशाद आहे का ब्र शब्द काढायची ? आपल्या धन्यावर बालंट कसा बरे येऊ देईल तो चोंग्या ?

भाजप समर्थक आपल्या खर्‍या मालकाच्या मिठाला जागून सुचेता दलालना विचारताहेत की अडाणी ग्रुपचे शेअर्स शॉर्ट करून् तू किती पैसे कमवलेस? इतकंच काय हर्षद मेहता स्कॅम उघडकीस आणल्याबद्दलही त्यांना दोष देताहेत.

दुसरीकडे Indians' funds in Swiss banks climb to Rs 20,700 crore, highest in 13 years.

श्रीमंत लोकांचं भारतातून पलायन करण्याचं प्रमाणही वाढलंय.

बघा , सगळे काळा पैसा वाले मोदींना किती घाबरतात.

Pages