(कृपया या धाग्यावर राजकारण / भावनिकता / उन्माद टाळून केवळ कायद्याच्या दृष्टीने हे कलम समजून घेता यावे या दृष्टीने चर्चा व्हावी ही नम्र विनंती )
३७० वे कलम याबद्दल बरेच बोलले गेले आहे. मात्र त्यात असलेले राजकारण आणि भावनिकता या पलिकडे कायद्याच्या दृष्टीकोणातून आपल्याला ते समजून घ्यायला हवे. हे कलम हंगामी स्वरूपाचे होते. त्यामुळे ते रद्द व्हायला हवे होते यात शंकाच नाही. मात्र आत्ता ते रद्द केले गेले आहे की स्थगित ? स्थगित केले गेले असल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल का अशा शंका उपस्थित होत असल्याने तज्ञांचे म्हणणे जाणून घेणे योग्य होईल. मायबोलीवर देखील घटनेचे अनेक अभ्यासक असतील. त्यांच्याही मतांचे स्वागत आहे.
इथे असीम सरोदे यांचे कायदेविषयक मत दिले आहे. मात्र तो त्यांचा दृष्टीकोण आहे. इतरही कायदेतज्ञांची मते आपण वेळोवेळी समजून घेऊयात.
इथे काश्मीर आणि राज्यघटनाविषयक तज्ञ ए जी नूरानी यांचे कायदेविषयक मत दिले आहे. (मागाहून समाविष्ट केले आहे)
विविध तज्ञांमधील मतभेद
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/experts-di...
अधिक माहिती वेळोवेळी अपडेट केली जाईल.
इतर संदर्भ :
काश्मीरची समस्या नेमकी कशी निर्माण झाली?
Instrument of Accession (Jammu and Kashmir) कोणा कोणात आणि कसा झाला त्याबाबत थोडक्यात.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/photos/news/2361428/satara-indian-army-ajit-pat...
साताऱ्याचा पठ्ठ्या झाला काश्मीरचा जावई; ३७० कलम हटवल्याने जुळलं सूत
सचिन पायलटना काश्मीरचा जावंई
सचिन पायलटना काश्मीरचा जावंई होताना ३७० कलम आडवं आलं नव्हतं.
Pages