सूचना: आरंभ या जानेवारी २०१८ पासून सुरु झालेल्या ई-मासिकातील फेब्रुवारी अंकातील माझा हा अभिनव प्रयोग - माध्यमांतर खास येथे मायबोलीच्या वाचकांसाठी देत आहे! टीव्ही एपिसोड लिखित स्वरूपात म्हणजे माध्यमांतर! दृकश्राव्य माध्यम ते छापील माध्यम!
आरंभ येथून डाउनलोड करता येईल: https://play.google.com/store/apps/details?id=com.marathi.magazine.aarambh
प्रस्तावना: एपिक चॅनलवरील महाभारतावर अभिनव प्रयोग केलेल्या "धर्मक्षेत्र" च्या पहिल्या एपिसोडबद्दल मी ह्या महिन्यात लिहित आहे ज्यात द्रौपदीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. "एपिक ऑन" हे मोबाईल ऍप खास सबस्त्राईब करून मी काही एपिसोड अभ्यासून ते खास "आरंभ" च्या वाचकांसाठी "अध्यात्म" या सदरात (माध्यम रूपांतर करून) देत आहे. अर्थात हे माध्यम रूपांतर वाचकांना नीट समजण्यासाठी थोडे स्वैर आहे याची नोंद घ्यावी. ज्यांनी "धर्मक्षेत्र"चे हे एपिसोड पाहिले असतील किंवा नसतीलही आणि ज्यांनी महाभारत वाचले किंवा पाहिले असेल किंवा नसेल; अशा सगळ्या वाचकांना काहीतरी वेगळे पण माहितीपूर्ण वाचल्याचे नक्की समाधान या अभिनव सदरातून मिळेल, हे मात्र नक्की!)
एपिसोड सुरु:
(कुरुक्षेत्रावरचे युद्ध संपून आता चित्रगुप्तच्या दरबारात पाप पुण्याचा हिशेब करण्याची वेळ आली आहे. महाभारतातील सगळे पात्र आता मृत्यू पावले आहेत, असे येथे गृहीत धरले गेले आहे.)
चित्रगुप्त येतात...
त्यांना सगळे अभिवादन करून बसतात मात्र कर्ण पांडवांजवळ बसायला नाही म्हणतो आणि त्याचा परम मित्र दुर्योधनाजवळ बसायची परवानगी मागतो आणि त्याचे जवळ जाऊन बसतो. सध्या दरबारात फक्त द्रौपदी आणि कृष्ण यांची अनुपस्थिती असते.
मग त्या धर्मेक्षेत्राच्या कोर्टात गांधारी आणि कुंती येतात. गांधारी व्देषभावना मनात ठेऊन, कोर्टात (दरबारात) द्रौपदीला आणण्याची चित्रगुप्त याला विनंती करते.
एका झाडाखाली द्रौपदी उभी असते, तिला कृष्ण "धर्मक्षेत्र"च्या दरबारात चलण्याची विनंती करतो.
दोघे तेथे येतात...
पहिला आरोप तिच्यावर लागतो की पांडवांशी विवाह करणे हे द्रौपदीचे षडयंत्र होते, तिच्या वडिलांचा बदला पूर्ण करण्यासाठी!
मग स्वयंवरात काय घडले याविषयी चर्चा सुरू होते.
गांधारी द्रौपदीवर आरोप करते की स्वयंवरात तिची नजर सर्वप्रथम कुणावर गेली? पांडवांवर तर नक्की नाही.
द्रौपदी खरे सांगते की कर्ण.
चित्रगुप्त: "मग कर्णाच्या गळयात माळ का नाही घातली?"
द्रौपदी: "कारण तो सूतपुत्र होता!"
गांधारी: "चूक आहे. तू कौरव पांडवांचे शतृत्व आणखी वाढावे यासाठी असे केलेस आणि तुझा जन्मच मुळात तुझ्या वडिलांचा एक बदला घेण्याच्या दृष्टीने झाला. (द्रुपद आणि द्रोण यांची दुष्मनी सर्वश्रृत आहे आणि सगळ्यांना माहीत आहे) तिची इच्छा होती की भाऊ (दृष्टद्युम्न) सोबत वडिलांना मदत करावी. तिला युद्ध घडवायचे होते. म्हणून तिने कर्णाला मुद्दाम नाकारले!"
कृष्ण आक्षेप घेतो आणि सांगतो की मीच तिला "अर्जुन हा, तुझी नियती आहे" हे सांगितले होते आणि त्याला स्वयंवरात वरायला सांगितले.
कर्ण प्रश्न विचारायला उभा राहतो तर भीम कर्णावर धावून जातो आणि दोघे एकमेकांना मारण्यास उठतात. चित्रगुप्त त्यांना चूप करतो. भीमाच्या मते कर्णाला द्रौपदीला काही प्रश्न विचारायचा अधिकार नाही.
कर्ण: "द्रौपदी तू माझ्याशी लग्न केले असते तर युद्ध झालेच नसते. तू सांगितले असते की तुला गुरु द्रोण यांचा बदला घ्यायचा आहे तर मी सगळे हारून तुला मदत केली असती. विचार दुर्योधनाला! मी त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. आपण त्याची मदत घेतली असती."
द्रौपदी: "बरोबर आहे. जो माणूस आपल्या मित्राची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला बांधील आहे त्याला माझ्यासाठी वेळ काढायला जमले असते का? त्याचे ऐकून तू माझेशी कसाही व्यवहार केला असता. तू खरे तर माझ्याशी लग्न करायला लायक नाहीस. नव्हता!"
मग कुंती येते आरोप करायला!!
चित्रगुप्त: "कुंती जी, कौरव पांडव यांच्यात नेहमी भांडणे होत होती तर तुम्हाला कधी वाटले होते का की भविष्यात यांच्यात युद्ध होईल?"
कुंती गप्प!!
चित्रगुप्त: "वेगळ्या पद्धतीने विचारतो. तुला तुझ्या सुनेची वागणूक योग्य वाटली का? कौरव पांडव यांच्यातील शत्रुत्व वाढेल असा प्रयत्न तिने केला असे तुम्हाला नाही वाटत? मयसभेत दुर्योधन पाण्यात पडला तेव्हा द्रौपदी त्याला हसून म्हणाली की तुला तुझ्या वडिलांसारखे दिसणे बंद झाले का? आंधळा झालास का? (त्याला तेव्हा सुयोधन असे संबोधले जायचे) आणि पुढचा आरोप म्हणजे मोठ्या व्यक्तींचा तिने अपमान केला आहे. कुंती जी तुम्ही उत्तर द्या!"
कुंती: "हो. ही पांडवांच्या जीवनात आली आणि सगळे पांडव बदलले. खुनशी झाले. शत्रुत्व आणखी वाढले!"
कृष्ण: "चूक आहे तुमचे. कौरवांनी पांडवांना अनेक वेळा जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला, त्रास दिला तेव्हा तुम्ही चूप राहिलात आणि तुम्ही चूप म्हणून पाचही पांडव चूप राहिले. पण द्रौपदी बोलली म्हणून तिला चूक मानले गेले. ती पांडवांना एवढेच म्हणाली की कौरवांनी तुमच्या सोबत एवढे सगळे करून तुम्ही चूप का राहिलात? अन्याय सहन का केला? लहानपणीच भीमाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला तेव्हा त्याला योग्य वेळेस धडा का नाही शिकवला? शिकवला असता तर लक्षागृहात पुन्हा तुम्हा पाचही भावांना मारण्याची हिम्मत त्यांची झाली असती का? कुंती आत्या, लक्षात घ्या! तुमची मुले लहानपणापासून शुर होते आणि त्यांना योग्य दिशा देण्याचे काम फक्त द्रौपदीने केले आणि आज तुम्ही तिचा अपमान केलात?"
मग द्रौपदीचा भूतकाळातील प्रत्येक पांडवांसोबत संवाद दाखवला जातो.
चित्रगुप्त: "सुयोधनाचा द्रौपदीवर पुढचा आरोप आहे की तिने द्युतक्रिडेत झालेल्या अपमानाचे कारण पुढे करून युद्धाला आमंत्रण दिले!"
मग चित्रगुप्तच्या दरबारात वाद विवाद होतात की द्रौपदीला द्युतक्रिडेत दुःशासन ओढत आणतो तेव्हा द्रौपदी कुलवधू असते की दासी? आणि तिला द्युतात पणाला लावण्याबाबत जबाबदार कोण? आणि द्रौपदीचा त्या युक्तिवादात विजय होतो.
ती म्हणते की जर युधिष्ठिर स्वत:ला द्यूतात हारून चुकला होता तेव्हा त्याला द्रौपदीवर अधिकार नव्हता आणि म्हणून तिला पणाला लावायचा त्याला अधिकार नव्हताच.
म्हणून तिला द्युतक्रिडेत ओढत आणले तेव्हा ती दासी नव्हती तर कुलवधू होती आणि दुर्योधनाचा युक्तीवाद ती खोडून काढते की ती त्यावेळेस दासी होती आणि सभेत दासीचा नाही तर कुलवधूचा अपमान झाला हे ती सिद्ध करते.
मग गांधारी आणि कुंती यांचा द्रौपदीवरून वाद होतो कारण गांधारीला द्रौपदीचा द्युतक्रिडेतला अपमान साधारण अपमान वाटतो मग कृष्ण दोघींना खडसावतो आणि "दुर्योधन द्युतक्रिडेत द्रौपदीला मांडीवर बसण्यास सांगतो" या द्रौपदीच्या अपमानाची आठवण करून देतो. नंतर गांधारीला खडसावतो की तुझी मुले तुझे काहीही ऐकत नसत. मग गांधारीचा कृष्ण थोडासा अपमान करतो तेव्हा दुर्योधन चिडतो मग कृष्ण सांगतो की तुझ्या आईचा थोडासा अपमान सहन करत नाहीस आणि द्रौपदीचा (जी तुझ्या मोठ्या भावाची पत्नी आहे म्हणजे आईसमान आहे) इतका मोठा अपमान तू भर सभेत केलास आणि जर का तो अपमान मनात धरून त्याला युद्धाचे कारण द्रौपदीने बनवले तर त्यात गैर काय?
मग गांधारी कबूल करते की ती पुत्रप्रेमात आंधळी झाली होती आणि तिची मुले तिचे ऐकत नसत.
मग चित्रगुप्त द्रौपदीचा फैसला सुनावतात:
"महत्त्वाकांक्षी असणे चांगले फक्त ती अतिरेकी नको. तुम्ही (म्हणजे द्रौपदी) येणाऱ्या पिढ्यांसाठी एक उदाहरण बनून राहाल.
अशा प्रकारे द्रौपदी एपिसोड संपतो...
माध्यमांतर हा प्रयोग कसा वाटला ते जरूर सांगा आणि प्रतिक्रिया द्या!
(समाप्त)
माझ्या ब्लॉग ला जरूर भेट द्या:[ वाचनस्तु]
https://vachanastu.blogspot.in/
२७ फेब्रुवारीला माझ्या वाढदिवशी माझी वलय ही कादंबरी ईसाहित्य वर प्रकाशित झाली आहे. काही सत्य घटनांचा आधार घेऊन लिहिलेली सिने टीव्ही क्षेत्रावर आधारित ही एक मनोरंजक, खळबळजनक आणि थरारक (काल्पनिक) कादंबरी आहे आणि ती येथून डाउनलोड करता येईल:
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/valay_nimish_sonar.pdf
धन्यवाद! - निमिष सोनार, पुणे
Sorry,
Sorry,
बात जमी नही कुछ,
वर लिहिले आहे ते एका एपिसोड चे त्रोटक रिपोरटिंग वाट्ते आहे, कालच्या एपिसोड मध्ये काय झाले ते गप्पा मारताना कोणालातरी सांगावे तसे वाटते.
1) तुम्हाला वाचकांना या सिरीयल ची फक्त ओळख करून द्यायची असेल तर महाभारत/ द्रौपदी बद्दल जनरल माहिती असणारा परिच्छेद, नंतर द्रौपदी वर केलेल्या एका आरोपांची डिटेल मीमांसा आणि मग अजून आरोप/प्रश्न अशी मांडणी करता आली असती.
2) जर पूर्ण एपिसोड ची गोष्ट सांगायची असेल तर थोडी लिबर्टी घेऊन एक पूर्ण गोष्ट या स्वरूपात मांडली जायला हवी. गोष्टीचा फ्लो काय ठेवायचा, आणि कोणते मुद्दे आणायचे ते एपिसोड च्या कथनका प्रमाणे ठरेल.
पण बरेच डिटेलिंग करायला लागेल.
अर्थात हा माझा व्ह्यू झाला, त्या सदरचा काय उद्देश आहे ते माहीत नाही, त्यामुळे तो पूर्ण चुकीचा सुद्धा असू शकतो
ओके
ओके
धर्मक्षेत्र ही सर्व सीरीअल
धर्मक्षेत्र ही सर्व सीरीअल भारतातल्या नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे अतिशय छान आहे. ह्यातला केशव फार फार गोड मॅन आहे व कपडेपट पण समर्पक आहे. दुर्योध न अभिमन्यू पण फार छान दिसतात. दागिने छान आहेत. कुठेही अति नाही. मुख्य म्हणजे सर्व संवाद लेखन व हिंदीची पातळी फार जबरदस्त उच्च आहे कुठे ही डंबिंग डाउन केलेली नाही.
केशव आपला राधा बावरीतल्या राधेचा खरा पति आहे. त्याने चांगली अॅक्टिंग केली आहे.
शकुनी ला जेव्हा चित्रगुप्ताच्या कोर्टात उभे करतात तेव्हाचे सुरुवातीचे क्षण अगदी हॉरिबल आहेत. त्याचे १०० भाउ
ध्रुतराष्टृ ने बंदी केलेले असतात. ह्यांना रोज एक तांदु ळाचा दाणा मिळतो. पण हे भाउ ठरवून आपल्यावाटचे अन्न
श कुनीला देतात. एक तरी जिवंत राहावा ह्यासाठी. व ते सर्व मरून जातात. मला बघवेना ते. त्याच्या बाबांचे का
नातेवाइकांचे दहन केल्यावर जी हाडे मिळतात त्यापासून फासे बनवलेले आहेत म्हणून ते नेहमी शकुनीचे ऐकतात.
तो एक पाताळयंत्री माणूस आहे अशी आपली समजूत असते ती दूर होते. ल्हानगा अभिमन्यू येतो तेव्हा पण असेच हार्ट स्टॉपिन्ग मोमेन्ट. कोव् ळे पोर ते.. जीव अगदी हलून जातो. अश्वत्थामाचे कन्फेशन पण छान आहे. द्रोणाचा भाग खरेतर सर्व च बिंज वॉच करणेबल आहे. वरचे लेखन त्या हिंदीला जस्टिस करत नाही. सिम्बा प्लस वन.
ओके
ओके
एपिक वरील धर्मक्षेत्र हे
एपिक वरील धर्मक्षेत्र हे संपुर्ण काल्पनिक मालिका आहे. प्रत्येक पात्राचे म्हणणे काय असेल याद्रुष्टीने विचार करुन मालिका लिहिली गेली आहे. या मालिकेची तुलना राधेय, मृत्युंजय, ययाती, इ. कादंबर्याबरोबर होउ शकेल. फँटसी प्रकारातून प्रत्येकाचे विचार मांडले गेले. एक वेगळा प्रयोग म्हणून निश्चित कौतुकासपात्र आहे.
न्युज चॅनेलवर सगळे एकदम बोलत
न्युज चॅनेलवर सगळे एकदम बोलत असतात आणि वागळे किंवा तत्सम जी जी करुन प्रश्न विचारत असतो तश्या टाइपचा टॉक वाटला.
<<,कुंती जी...>>.
<<वेगळ्या पद्धतीने विचारतो. >>>> इथे तर अग्दीच आयबीएन फील
आणी कृष्णाच्या तोंडी <<चूप राहिलात. चूप बसलात.>>>> भाषा खटकतेय.
त्रोटक आहे. अगदीच हा असं करतो. तो तसं बोलतो टाईप सांगितलंय.
सस्मित, मूळ प्रोग्राम मध्ये
सस्मित, मूळ प्रोग्राम मध्ये असेच आहे.