Submitted by Mandar Katre on 17 June, 2016 - 00:59
महाभारत घडून गेल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या वृद्धावस्थेत नारद त्यांना भेटायला आले होते . त्याचे सविस्तर वर्णन बहुधा भागवतात आहे. त्यावेळी श्रीकृष्ण व नारद यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली . त्यामध्ये कृष्णाने आपले मुलगे आपले ऐकत नसल्याबद्दल व बहुधा pradyumn या कृष्णपुत्राच्या उच्छृंखल पणा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती . त्यावर नारदानी आता आपले अवतारकार्य संपत आलेले असून पृथ्वीवरील मानवासारखे आपण पुत्रादिकांची चिंता करणे सोडून निजधामी गमन करण्याची तयारी करावी असा उपदेश केला . हा बहुधा कलियुगाच्या प्रारंभीचा काल असावा .
या सर्व प्रकाराबाबत मराठी वेबसाईट वर अथवा साहित्यात कुठे उल्लेख /चर्चा झालेली आहे का ? माबोकरांपैकी कोणास याबाबत काही माहिती असल्यास जरूर चर्चा करावी . केवळ जिज्ञासेपोटी हा प्रश्न विचारला आहे.
धन्यवाद
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*
*
कथेमध्ये श्रीकृष्ण यांचा
कथेमध्ये श्रीकृष्ण यांचा मुलगा बहुधा सांब हा त्याच्या भावंडाबरोबर ऋषिमुनिंची टिंगल करतो.ते रागावुन शाप देतात आणि त्यामुळे यादव वंशिय आपापसात हाणामारी करून नष्ट होतात। व श्रीकृष्ण पारध्याच्या बाणाचा बळी ठरतो. अशी कथा आहे.
सविस्तर कथा कुठे मिळेल?
सविस्तर कथा कुठे मिळेल?
दुसर्या पिढीनंतर कृष्ण
दुसर्या पिढीनंतर कृष्ण निर्वंश झाला
सविस्तर कथा कुठे
सविस्तर कथा कुठे मिळेल?
<<
कात्रे तुम्ही शिवाजी सावंत यांची 'युगंधर' कादंबरी वाचा,
त्यामध्ये वर विजय टी यांनी उल्लेख केलेली कथा सविस्तर पणे लिहिली आहे.