लाहोरवर कब्जा (ले० निनाद बेडेकर, दै० पुढारी, २८ फेब्रु० २०१०)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

“अब्दालीने अफगाणिस्तानमध्ये परत जाताना शिखांचे सुवर्ण मंदिर उद्ध्वस्त केले होते. सरोवर मातीने भरून टाकले होते. ८ मार्च १७५८ला मराठी फौजा सरहिंदला आल्या. मराठे येताहेत हे पाहिल्यावर अब्दालीचा मुलगा लाहोरहून पळाला. जाताना त्याने अनेक गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केले. मराठी फौज मोठ्या दिमाखाने लाहोरात आली. मानाजी पायगुड्यांच्या अधिपत्याखाली मराठी फौजांनी लाहोरचा ताबा घेतला. मराठी विजयाचे डंके लाहोरात झडू लागले. “

http://amrutmanthan.wordpress.com/2010/03/15/लाहोरवर-कब्जा-ले०-निनाद-ब/

- अमृतयात्री

विषय: 
प्रकार: 

छान माहिती. निनाद बेडेकरांनी पुढारीत बरीच माहिती दिली होती याबद्दल. त्यांचे या विषयावरील संकलीत लेख उपल्ब्ध आहेत काय?