जगणं!!!!!

जगणं!!!!!......................

..................आज जरा उशीरच झाला तीला............खरतर रोजच होतो ओफिस मधुन यायला ........... पण आज जरा जास्तच..८:३० वाजुन गेले होते............. रुम वर अजुन पसारा तसाच पडला होता....थोडी चिड आली पण मग उदास होउन बसुन राहीली...........

आई ला फ़ोन लावला."हेलो,,,,,,,,बोल ग........."आई ने लगेच आवाज ओळखला!!!!!!!!!!.........

..........तिच्या डोळ्यात पाणी होत..."काय ग बोलत का नाहीस,,कामात आहेस का?"ती उठली "नाही ग बोल बोल..."
....................
दिड तास बोलल्यावर तीला जरा शांत वाटले..फ़ोन बाजुला ठेउन दिला ............. रुम आवरता आवरता तास झाला आता,,,भुक लागली होती प्रचंड!!!!!!!! आत्ता समोर भरलेल ताट असायला पहिजे होते मग कुठेच लक्ष गेल नसत......... तीला हसु आलं!!!!!!!!!!!!!.......फ़ोन वर त्या शेजार च्या हॉटेल चा नंबर फ़िरवला तर कोणीच उचलला नाही.......झालं बंद...!!!!!!!
आता काय.............. बेत करुन जेवण बनवले..........
जेवली.............१२:३० बापरे!!!!!!!!!!!!!!.............. सकाळी उठणे होईल का???

सकाळची तयारी करुन तीने गजर लावला...पण झोपच लागत नव्हती
कसे आपण होतो............कुठे होतो.............. तीचे विचार वेळ थांबवुन तीला मागे घेउन गेले!!!!!!!!!!!.......................

--------------
"शाळा,कॉलेज किती भराभर उडुन गेले कधी कळालेच नाही!!!!!!!!!!!!................ किती धमाल करायची मी!!!!!! एकत्र डब्बा.... ते एकमेकींच्या ओढण्या बांधून ठेवणे!!!!!!!!............क्रिकेट खेळणे...........सरांची नक्कल करणे........................लपवालपवी..काहीही चालु असायचे!!! .............. एकदा नोटिस लिहुन कढायला सांगितली होती तर सरांच्या नकळत नोटिस बोर्ड उघडुन चक्क झेरोक्स काढली;;;;;;;
मग घरी येउन आई ने बनवलेला शिरा,उपिट,,,,,,,,,,,,,,,,,, काही असेल ते पोटात जायचे .....किती छान चव!!!!!!!!!!! ................ " तीला अजुन आठवत होती.. डोके दुखे पर्यंत अभ्यास... गादीवर बसलेली जमिनीवर यायचे.......कधी टेकुन...........कधी बसुन..तर कधी चालत चालत!!................... हममम...
"............नोकरी लागली,,,तेव्हा सगळे आनंदी होतात,......,खुश असतात पण मी....मी रडत होते!!!!!!!!!!!..............घरा पासुन लाबं जायची कल्पना सहन न होण्यापलीकडे होती.. ..."

बाबांनी समजावुन सांगीतले तेव्हा तीच्या मनाला समजले जगणं हे असेच असते आपण ही जगुन घ्यावं थोड एकट्याने....
आई ने सामान आणी मनं तयार केलं होत.... त्या पुढे तिच्या फ़क्त सुचना होत्या...."असे करायचे तसे वागायचे..मोठी हो खुप" आई बाबां च्या पाया पडुन निघाले,,,,, कौतुक आणि काळजी ने भरलेले दोघांचे डोळे निरोप देत होते.............................

"कोण्या लांबच्या नातेवाइका ची रुम ही माझ्या मुळे बोलकी झाली!!!!!!!!!.... दोन खोल्या आणि स्वयंपाक घर आवरता आवरता आख्खा दिवस गेला होता. आई ला नेहमी माझा नीटनीटकेपणा आवडायचा!!!!!!!!!!... भांड्याची सोय नाही झाली म्हणुन शेजार चे हॉटेलच जेवणाची वाट पाहायच!!!. .... रोज रात्री मध्येच जाग यायची... आई हाक मारत आहे "किती वेळ या पोरीला बोलवायचे?????????? ",,बाबा ओरडत आहेत " उठुन परत झोपली वाटत...उठतेस का आता?????... "बंड्याची बडबड"ए आज काय झालं सांगु का?... "सगळ्या रुम मध्ये आवाज घुमायचे मग उठुन पाहिले कि फ़क्त निरव शांतता आणि रिकामी रुम... सुरवाती चे दिवस जरा अवघड गेले.
............ नंतर एकटेपणा सवय लावुन गेला...........आणि सुरु झाला एक बेरंग प्रवास!!!!!!!!!!!!"

.............मग रोज तेच तेच ऑफ़ीस ला जाणं!!!!!!!!....... त्याच रंगरंगोटी केलेल्या ऑफ़िस मधल्या सहकार्‍यांचे निरव चेहरे पाहायचे......कि त्यावर कधीच कामाचा उत्साह नाही,,,,,कधी हास्य इथे फ़िरकत सुद्धा नाही,,,सतत कामाचे ओझे वाहणारे जणु सगळे यंत्र मानवच आहेत,,...........सण माहित नाही कि सहल माहित नाही..........सगळे दिवस फ़क्त कामासाठीच आहेत असा समज असलेला बॉस...............ढिम्म!!!!!!!!.......

................आता तर मीटींग्स मुळे ती पण कामात असे...,,,,,,,,.कधी नविन प्रोजेक्ट्,,,,,,,,,,,,,,कधी जुन्या अपडेट्स्........कधी जेवणाला पण वेळ नसे!!!!!!!!!!!!...............रोजच्या अशा कामाच्या गुंतागुंतित ती तीलाच विसरली होती!!!......................

असेच दिनक्रम चालले होते......आठवडा भर्....महिना भर.....वर्ष भर!!!!!!!!!!!!!!!!...........

वाढदिवसाला आई , बाबा , बंड्या , मावशी सगळे आले होते!!!!....त्या दिवशी ती रुम...."रुम" नसुन "घर" झाली होती.!!!!!!!!!!.......तो दिवस तीचा होता ............ हक्काचा!!!!!
...........त्यादिवशी ती खुपच खुलुन दिसत होती.......

घरचा सहवास!!!! .........हिच तीच्या साठी भेट होती............ अमुल्य भेट्!!!!!!!!!....बाकी सगळे तर होतेच.....फुले ,कपडे , खाद्यपदार्थ सगळ्यांनी घर भरले होते

,,,,,,,,,, पुढे बदली झाली ................कामाच्या वेगातुन सावरुन ती बरीच स्थिर झाली होती!!!!!!!!!!!!! ..........
........................नविन जागा ,,,,,,, नविन वातावरण् ,,,,,,,, नविन काम ,,,,,,,, नविन चेहरे!!!!!!!!!!!....... तीला आवडु लागले....................तीने नव्याने मन लावुन सुरुवात केली...
तशी सुरुवात साधीच झाली...............पण त्या सुरुवातीला एक सोनेरी झालर जोडली होती!!!!!!!..............कारण............कारण............

............कारण तीला ................ "तो" भेटला होता!!!!!!!!!!!............

.........तसा तो सुद्धा तिच्याच ओफिस मधला.......पण तीच्या पेक्षा जरा उच्च पदावर्......म्हणजे तीचा interview घेतलेला हाच ओफिसर!!!!!!!!!.........
दिसायला साधाच........उंचपुरा,,,,,,,टोकदार नाक,,,,,,,,,,,,,मध्यम शरीरकाठी!!!! ......लोभस बोलण!!!

............सुरवातीला ती घाबरुन त्याच्याशी बोलण टाळायची.......उगीच कशाला विषय वाढवायचे!!!!...........मग एकदा कामाच्या निम्मीताने त्याने विचारपुस केली..........ती नुसती त्याला बघतच राहिली!!!!!!!!..........त्याचे बोलणे कानाला खुप छान वाटत होते.......... पण तोंडातुन शब्द फुटत नव्हते!!!!!!!!

............हो नाही करत ती उत्तर देत होती........त्याच्या अशा स्वभावाने सगळ्यांना जिंकल होत्....तीला सुद्धा!!!!!!!!!!!!!
प्रत्येक आठ्वड्या अगोदरच task arrangement तयार!!! .. आणि त्याबरोबर माहीती पत्र ,,,म्हणजे कुठे शंका येणार अशी जागाच नाही.....

संदर्भ सांगणे ,,,माहीती पटवुन देणे.. कामाची जोडणी... सगळे व्यवस्थीत जमत होत,, परत नविन ठिकाणाची ,,कामाच्या स्वरुप समजुन घ्यायला पण वेळ लागत नव्हत........

आठवड्याच्या शेवटचा आढावा [ Meeting ] आणि त्यानंतर Happy Hours चा मेळ होत!!!!!!!! ................... महिन्यातुन एकदोनदा तर सहल हि ठरलेलीच असायची मग त्यात सगळ्यांचे वाढदिवस, सणवार साजरे चालुच!!!!!!! ------------- खरचं त्याची विचार करण्याची पद्धतच निराळी होती. . . .त्याचा एकच मुलमंत्र "आयुष्य जगायचं तर दिलखुलास..............!" . . या पद्धतीमुळे तीची विचारसरणी सुद्धा "वैचारीक" झाली होती..................आणि ती त्याच्यात रमुन जात.................जणू त्याने तिला "जगणं" शिकवलयं!!!!!!!!!

समाप्त............


जुन्या काळात गेले...पुढे वाचायला आवडेल्..जरा घाइ होतेय का?



आता कसं !!! काल वाचले परंतु काय प्रतिक्रिया द्यावी ते सुचत नव्हते. >> काळजी ने भरलेले दोघांचे डोळे निरोप देत होते.............................>>
मला वाटलं संपली कथा. चांगलच लिहीताय. आता हळुहळु लिहीताय तर जरा सविस्तर लिहा. छान.



मस्त आहे



सुरुवात तर छान झालिये ! पहीलीच कथा आहे पण विषय खरच मस्त निवडलायस ! आता पुढच्या भागांमधे वेग हवा बरं का !



पुढील भाग ही आवडला खुप...

बेरंग प्रवास ह शब्द टायटल चा 'जगणं' यास साधर्म्य सांगतोय असे मला वाटले

प्रतिक्षेत अजून पुढिल लिखाणाच्या ....

----------------- गणेशा



पिया, असे वाटते आहे तू माझीच कथा लिहिते आहे. ९० टक्के तरी समांतर स्थिती आहे. पुढे लिहि..



लवकर पुथे जाऊ दे. वाट पाहते.



माफ करा हं!!!
जरा उशीर लागला लिहायला
maay boli block होते म्हनुन



कुठे आहे कथा अरेरे? शिर्षक सोडल्यास काही दिसत नाहीये.



कथा नाहिये दिसत अरेरे



कथा कुठ आहे?



कथा कुठे आहे?
शिर्षक सोडल्यास काही दिसत नाहीये.



सेम पिन्च



आता ok ना



आता ok ना



आता ok ना



आत्ता कस? piapeti, (मराठीत कसं म्हणायचं तुमचं नाव?)
एकदा मला तीन्(च) महिने परदेशी एकटीने रहायचा प्रसंग(??) आला होता. तेव्हा असच काहीसं वाटलं होतं.
तब्येतीत लिहा.
इथे तुमचं अपूर्ण लिखाण अप्रकाशीत अवस्थेत ठेऊन, पूर्ण झाल्यावर प्रकाशित करण्याची सोय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? म्हणजे भागा भागात कथा टाकावी लागत नाही.



कथा छान आहे,पण एक मात्र खटकले..
यात विरामचिन्हान्चा वापर जरा जास्त झालाय.



आयुष्य जगायचं तर दिलखुलास.



पिया, असे वाटते आहे तू माझीच कथा लिहिते आहे. ९० टक्के तरी समांतर स्थिती आहे. पुढे लिहि..