|
Santu
| |
| Monday, September 11, 2006 - 1:37 pm: |
| 
|
गाधीं ना मारुन काय झाले___________ अरे मारल नसत तर काय झाल असत याचा विचार कर सोमनाथ च मंदिर गाधींनी उभारु दिले नसते. काश्मिर सुध्दा आपल्या कडे राहिले नसते. त्यांनी जर बळाचा वापर करण्यास विरोध केला असता. तर जुनागढ, हैद्राबाद (निजाम),या संस्थानाचा प्रश्न काश्मिर सारखा भिजत पडला असता.व मुसल्मान इतके शेफ़ारले असते की भारताची अजुन एखादि फ़ाळणी झालि असती
|
I beg to differ. गांधी असोत वा नसोत फाळनी झालीच असती. उगीच गांधीना यात आनु नका. हा त्यांनी अनुनय सुरु केला हे तेवढेच सत्य आहे. पण वर श्रवण ने लिहिल्यानुसार जे लोक सामाजीक जिवनात असतात त्यांचा चुकांकडेअच जास्त लक्ष जाते. गांधीनी चुका केल्याच पण फाळनी किंवा मुस्लीमाचा प्रश्न (आजचा) ही त्यांची देन नाही.
|
Dinesh77
| |
| Monday, September 11, 2006 - 3:18 pm: |
| 
|
फ़ाळणी ही फ़क्त गांधी आणि गांधींचीच देणगी आहे.
|
Moodi
| |
| Monday, September 11, 2006 - 3:22 pm: |
| 
|
नाही ती जिनांची देन आहे. जीना किती हट्टाला पेटले होते, त्याची कल्पना नसेल कुणाला.
|
फ़ाळणी ही फ़क्त गांधी आणि गांधींचीच देणगी आहे>>>>>>>>> मलाही तसच वाटायच. पण नंतर मी अनेक पुस्तक वाचली. ( स्वातंत्र पुर्व व नंतर च्या ईतिहासावर) मग मला असे वाटले की गांधीना ह्या सर्वात आनने हा जिंनाचा मोठ्या चालीचा भाग होता. गांधीनी जर खिलाफत चळवळ सुरु केली नसती तर चित्र वेगळे दिसले असते.
|
Shravan
| |
| Monday, September 11, 2006 - 8:22 pm: |
| 
|
समान नागरी कायद्याचा आग्रह धरावा. देशहीतापुढे कोणताही धर्म, जात, वंश श्रेष्ठ नाही हे देशातील प्रत्येकाच्या मनावर बिंबवायला सुरुवात करणे. चीनमध्ये मुख्य बौद्ध धर्म आहे. बौद्ध धर्मामध्ये मेल्यावर दफन करण्याची पद्धत आहे. पण ते decompose व्हायला बराच वेळ लागतो व जागेचाही प्रश्न चीनला भेडसावत होता. त्यांनी त्यासाठी वेगळा कायदा केला व जाळण्याची पद्धत सुरु केली. अशा गोष्टींची जाहीरात करावी. चांगल्या राहणीमानासाठी आपण ज्या भागात रहतो तेथील परिस्थितीनुसार बदल करायला हवेत हे सर्वांना कळाले पाहीजे. धर्मापेक्षा ही गोष्ट महत्वाची आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहचला जाइल ही व्यवस्था करावी. (अशा जाहीरातीत देशहीत वगैरे हे शब्द वापरू नयेत कारण काही कट्टर लोकांना देश वगैरे गोष्टी गौण वाटतात). मुस्लिम धर्मातील काही परंपरा त्यांच्याही दृष्टीने कशा घातक आहेत (उदा. तलाक, अनेक विवाह, संततीनियोजनावर बंधने इ.) व भारतीय संविधानात कसा सगळ्यांच्या व्यापक हिताचा विचार केला गेला आहे हे लोकशिक्षणातून हळुहळू सामान्य मुस्लीमांना पटवुन देणे. (इथे सामान्य या शब्दाचा अर्थ धर्माच्या नावाखाली भावना भडकावणारे सोडून असा घ्यावा.. उदा. बहुतांश मौलवी, मुस्लीम राजकारणी ई.) मदरशांमधून मिळणार्या शिक्षणापेक्षा सरकारी शिक्षण त्यांची परिस्थीती कशी बदलवू शकेल हा त्यांना विश्वास देणे. याकामी मुस्लिमांमधील सुधारणावादी, विचारवंत, त्यांच्या संस्था यांची मदत होऊ शकेल. भारतात आपल्या कुंभ मेळाव्यांवर सरकार भरमसाठ खर्च करतेच. मुस्लिमांसाठीही सरकारी अनुदानाने काही मोठे धर्मीक कार्यक्रम आयोजीत करुन त्यामध्ये सुधारणावादी मौलवींना प्रमुख नेमून त्यांच्याकडून जमावाचे वरील बाबींवर प्रबोधन करावे. हे सरकारी अनुदान हज यात्रेच्या मदतीतुन वळवावे. इतर मुस्लीम देशांमध्ये असे हज यात्रेसाठी अनुदान दिले जात नाही हे मुस्लीमांना समजावून सांगावे. (नुकताच अलाहाबाद खंडपीठाने तसा निर्णय दिला आहे). भारतातील मुख्य प्रवाहात आल्याशिवाय त्यांच्या विकासात अडथळेच येतील हे त्यांना पटवुन द्यावे. सर्वात महत्वाचे म्हणजे या सगळ्यामुळे मुस्लिम धर्माचा संकोच होणार नाही हा विश्वास त्यांना द्यावा. हे मुस्लीमांचे लांगुलचालन करणे नव्हे तर त्यांची मानसीकता बदलविण्याच्या दृष्टीने लिहिले आहे. कारण वर कुनीतरी लिहिल्याप्रमाणे मस्लीमांना देशातून काढून देणे वगैरे काही शक्य नाही हे इथल्या सर्वांना कळत असेलच. ते इथेच राहणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण हे सर्व करावे कुणी हा कळीचा मुद्दा आहे. राजकीय पक्षांकडे असे निर्णय राबविण्याची क्षमताच नाही. सेक्यलर वाले असे निर्णय घ्यायला धजावणार नाहीत. आणी B.J.P. वर मुस्लिमांचा विश्वास नाही त्यामुळे त्यांनी असे निर्णय घेतले तर ते अजिबातही स्विकारले जाणार नाहीत. दुर्दैवाने मुस्लीमांना विश्वासात घेऊन असे निर्णय राबवू शकेल असा एकही नेता सध्याच्या घडीला तरी आपल्याकडे नाही.
|
Moodi
| |
| Monday, September 11, 2006 - 8:48 pm: |
| 
|
श्रावण सुरेख लिहीलत. भाजपाचे एक मुस्लीम नेते होते, अब्दुल कलिम खान( चुभुदेघे) नाव त्यांचे. मुंबईतच रहाणारे, सौम्य व्यक्तीमत्वाचे, देशहीताचा विचार करणारे असे होते. पण दुर्दैवाने मुस्लीम समाजाने त्यांना स्वीकारले नाही. असे वाचले होते की ते गेले तेव्हा एकही मुस्लीम नेता( भाजपातले सिकंदर बख्त सारखे सोडले तर) त्यांच्या विधीस आला नाही, त्यांना जागा सुद्धा मिळाली नाही. हे मी पेपरमध्ये वाचलेय, खरे खोटे देव जाणे. मुस्लीम समाज भाजपा, शिवसेना यांना स्वीकारत नाही, अपवाद ग्रामिण भागात, तिथे शिवसेनेत अनेक मुस्लीम आहेत. पण शहरात ते ही मुंबईसारख्या शहरात घडत नाही, कारण मुंबईत परप्रांतीय आणि त्यातही बांगलादेशी आणि पाकी जास्त आहेत. आता मालेगावात एवढे झाले तर तो माथेफिरु तिथे जाऊन दंगल भडकावायचा प्रयत्न करीत होता. तो कोण तर समाजवादीचा. जास्त बोलत नाही. हे असे चाललेय.
|
Samuvai
| |
| Tuesday, September 12, 2006 - 4:49 am: |
| 
|
santu , गाधीं ना मारुन काय झाले___________ अरे मारल नसत तर काय झाल असत याचा विचार कर तुम्ही एकदम "अरे जा रे" वर उतरलात ... असो; तुम्ही वर दिलेल्या उदाहरणांपैकी हैद्राबाद विलीन झाल हे सोडून गांधींना मारुन काय व्हायच राहिलय? १ / ३ काश्मीर हिंदुस्थानात नाहीये. मुस्लिम शेफारायचे काय बाकी आहेत? ह्या ऊलट गांधी वधाने "अनुनय" वाल्यांच्या हातात कोलीत दिल आणि त्यांनी त्याचा उपयोग विशुद्ध राष्ट्रीय विचारांच्या लोकांना आयुष्यातून उठवण्यासाठी केला. फाळणीला विरोध करणे हिंदूच्या हाती नव्हते काय? धर्माविरुद्ध आपले नातेवाईक जरी उभे राहीले तरी डगमगायच नाही हा गीतोपदेश हिंदू का विसरले? आपल्या शत्रूंना वेळीच ओळखून त्याविरुद्ध स्वत:चे रक्षण करण्याईतपत शक्ती जमवण्याला गांधींनी मनाई केली होती काय? आणि समजा केली असली तरी मग गांधींना कृष्णापेक्षा मोठे मानण्याचा नादानपणा कोणाचा? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे केवळ हिंदूंच्या आत्मविस्मृतीत आहेत कोण्या एका माणसाच्या वेडगळ पणात नाहीत.
|
Viveki
| |
| Tuesday, September 12, 2006 - 5:27 am: |
| 
|
चायला, संतू, समई वगैरे वगैरे मंडळींनी इथे आणि वंदेमातरमच्या बीबीवर विरोधकांबद्दल जी personally attacking भाषा वाप्रली आहे तशीच वापरणार असाल तर तुमच्यात आनि लालभाईत फरक काय उरला ? जीएस, एरवी तुम्हाला कोणी v&c मध्ये असभ्य भाषेचा उपयोग केलेला चालत नाही तुम्ही लगेच दटावता. मग आता तुमच्या हिन्दुत्ववादी गटातले लोक गांधींजींबद्दलही वाटेल ते लिहित आहेत तर तुम्ही सोयीस्कर मौन घेतले आहे. परस्पर पाहुण्याच्या काठीने साप मारला जातोय तर आपण गंमत बघावी असा प्रकार नाही ना हा ?( हव तर दिवा घ्या. ) मॉडरेटर्सचे पन कही म्हनने नही का ?
|
Viveki
| |
| Tuesday, September 12, 2006 - 5:40 am: |
| 
|
मी v&c च्या लाथाळित पडत नाही, पन गाम्धीजिंना आधीच मारून टाकायला पाहिजे होते वगैरे वाक्य म्हनजे फारच झाले.
|
Santu
| |
| Tuesday, September 12, 2006 - 6:20 am: |
| 
|
सामुवाई "अरे' मधे जी आपुलकी आहे ती 'तुम्ही" मधे नाही. गांधीना मारुन काय व्हायच राहिलय्__________ अरे अस कस म्हनता येईल गांधी नसल्यामुळे.सरदार पटेलांना free hand मिळाला. म्हणुन तर गोव्या सारख राज्य सुध्दा भारतात सामिल झाल.व नेहरुंची सुध्दा जी मुस्लिम अनुनयाची लुडबुड गांधीच्या पाठिब्यानी चालयची ति पण पटेल असे पर्यंत बंद राहिली. म्हणुन तर नेहरुंचा विरोध असुन सोमनाथ मन्दिर त्यांनी उभारले फ़ाळणी बाबत आपले भवितव्य हिन्दुनी गांधी कडे सोपवले होते गांधी ही फ़ाळणी झाली तर माझ्या देहाची पण फ़ाळणी करा असे म्हणत.पण शेवटि काय झाले.फ़ाळनी हि झाली व ति करणारी विषवल्ली पण इथेच राहिली. आता तेच बिज वटव्रुक्ष होवुन सर्व देशाला वेठिस धरतय हे पाप गांधिचे नव्हे तर आणख़ी कोणाचे. गीतोपदेश हिन्दु विसरले_______ तेच तर मी म्हणतोय गांधी च्या मागे जावुन लोकांनी चुक केली.
|
Soultrip
| |
| Tuesday, September 12, 2006 - 6:32 am: |
| 
|
Malegaon bomb-blast related article: http://o3.indiatimes.com/yossarin/archive/2006/09/08/1532237.aspx
|
दंगली निमित्त मालेगावात जाऊन आलो. धावपळीत गेले ३-४ दिवस... आता जरा आराम आहे...
|
रॉबीनहुड तुम्ही खरच जाउन आलात का?
|
Chyayla
| |
| Tuesday, September 12, 2006 - 7:44 pm: |
| 
|
विवेक, अरे माझा गान्धीविरुद्ध जे म्हटल्या जात आहे त्याला मुळिच समर्थन नाही मी ते स्पष्ट केले आहे, सन्तु तुम्ही पण थोडा विचार करावा असे वाटत. अजाणतेपणी चुक करणे आणी जाणुन बुजुन करणे यात फ़रक आहे. त्याना दोष देणे सोपे आहे, पण खरे दोषी नेहरु जीना आहेत त्याचे काय, आणी तेच फ़ाळणी नन्तरच्या सन्हारासाठी जबाबदार आहेत पन्तप्रधान तर तेच होते ना?, गान्धी त्यान्च्या षडयन्त्राला फ़सले, पुन्हा म्हणतो जे झाले ते झाले. तुमचे हिन्दुत्ववादी गटातले हा काय प्रकार आहे? श्रावण खरच सुरेख लिहिलेस आणी नेमक कुठे घोड अडतय ते व्यवस्थित लिहिलेस, यातुन मार्ग काढणे जिकिरिचे आहे, गान्धी तर आपल्याला प्रात: स्मरणिय आहेत, आणी ते जबर्दस्तीने नव्हे अगदी मनापासुन. माझा दुसरा मुद्दा, आक्रमकता व शस्त्रान्च्या आवश्यकतेला पण कमी लेखुन चालणार नाही हा आहे. अगदीच मिळ्मीळीत किन्वा अगदी जहाल दोन्ही गोष्टीना माझा विरोध आहे व दोघान्चा योग्य आणी आवश्यक तेथे समन्वय होणे आवश्यक आहे असे वाटते यात काय चुक आहे ते सान्गा.
|
लाल भाई नी अशी भाषा वापरलेली नाही. बाकी चालु द्या.
|
चला मुल्ला की दौड मस्जीद तक प्रमाणे भारतातल्या सर्व प्रश्नान्ना गान्धी आणी मुस्लीम जबबदार आहेत यावर मन्डळीन्च एकमत झालेले दिसते. कॉन्ग्रेस ला पर्याय नाही हेच खरे.
|
Limbutimbu
| |
| Wednesday, September 13, 2006 - 4:13 am: |
| 
|
>>>> कॉन्ग्रेस ला पर्याय नाही हेच खरे. कॉन्ग्रेसला पर्याय हे! तो म्हणजे "हिन्दु एकजुटीचा"! जातीन्विरहीत किन्वा जातीन्सहीत! १९९२ मधे त्याचेच दर्शन झाले तेव्हा हिन्दुत्ववादी पक्षान्खेरीज बाकी सगळे कॉन्ग्रेसी, कम्युनीस्ट, डावे-उजवे, दक्षिणी भाषीक पक्ष वगैरे सगळे हतबुद्ध झाले आणि त्यान्नी हिन्दु कार्डाला, हिन्दु एकजुटीला विरोध करण्यासाठी हिन्दुधर्मान्तर्गत जातीपातीन्मधे आरक्षणाच्या निमित्ताने चूड लावुन दिली, वर तेवढ्याने पुरले नाही म्हणुन "ब्राह्मण द्वेष" जोपासण्यास व पसरविण्यास सुरुवात केली! आणि आज खर तर मुस्लिम अतिरेक्यान्पेक्षा अधिक धोकादायक "ब्राह्मण देव्ष्टे अतिरेकी" बनविण्याचे कारखाने राजरोसपणे सरकारी अशिर्वादाने सुरू आहेत त्या कडे डोळेझाक करुन चालणार नाही! सहज जाता जाता काल परवाची बातमी आठवली ती सान्गतो म्हणजे कळेल की सरकारी आशिर्वादाने उच्चपदावर बसलेले ठोम्बे कसे विषपेरणीचे काम करतात. पुणे विद्यापिठाचे नविन कुलगुरु ओबीसीन्च्या सभेत भाषण करताना म्हणले की "गुरुकुल पद्धतीने" बहुजन समाजाला शिक्षणापासुन वन्चित ठेवल हे, त्यान्ची हेळसाण्ड होते वगैरे वगैरे आणि खाजगी शिकवण्या क्लासेस अशा पद्धतीने मागिल दाराने गुरुकुल पद्धती कुणी आणत असेल तर......! जमल तर भाषण मुळातून वाचा आणि अशी मुक्ताफळे उधळणारा पुणे विद्यापीठावर कुलगुरू म्हणुन कुणाच्या आशिर्वादाने नेमला जातो याचाही विचार करा! पुर्वीची परिस्थिती: पुर्वी गुरुकुल मधे रुशीमुनीन्च्या आश्रमात किन्वा गुरुजीन्च्या घरी त्यान्ची कामे करीत जी विद्या ब्राह्मण व क्षत्रिय सम्पादीत त्यातल्या एकाही विद्येचे सोयरसुतकही आजच्या निरिश्वरवादी व्यक्तीन्ना नाही, किम्बहुना तिथे शिकवले जात असलेले वेदप्रामाण्य नाकारण्याचेच ज्यान्चे धोरण हे ते उदाहरण देताना मात्र या शिक्षणाचा उल्लेख करुन नक्राश्रु गाळतात! हे सान्गायची गरज नाही की ब्राह्मण किन्वा क्षत्रिय (महाराष्ट्रापुरते शहाण्णव कुळी मराठा) गाव गाड्यातील "बारा बलुत्यान्च्या" उपजिविकेच्या क्षेत्रात ढवळाढवळ करीत नव्हते, किन्वा ते शिकत असलेली विद्या आणि तमाम "अन्य" समाजाची उपजिविकेची साधने यान्चा काडीचाही सम्बन्ध नव्हता! सुतार सुतार काम करीत असे, चाम्भार चाम्भार काम, शेतकरी शेतीचे, माळी भाजिपाला व बागायतीचे, शिम्पी वस्त्रान्चे, लोहार धातुकाम, गवन्डी बान्धकाम... या वाटण्यान्मधे ब्राह्मण किन्वा क्षत्रीय कुठ होते? इन्ग्रज आल्यानन्तर ह्या रचना त्यान्नी पहिल्यान्दा मोडकळीस आणल्या आणि ज्या गान्धीन्च्या नावाने आजचे कॉन्ग्रेसी गळे काढतात त्याच गान्धीची स्वयम्पुर्ण ग्राम या सन्कल्पनेची दखलही न घेता पुर्ण पणे वासलात कुणी कोणत्या स्वार्थाने लावली याचा विचार केला तर बरे! सद्ध्याची परिस्थिती: द्यानप्रबोधिनी किन्वा तत्सम शाळात गुरुकुल पद्धतीचे वर्ग घेतले जातात, या शाळा अनुदान प्राप्त हेत, पण एखाद्या, तेही पुणे विद्यापीठाचा कुलगुरुच जॉइन झाल्यानन्तरच्या लगेचच्या जाहीर कार्यक्रमात "गुरुकुल" पद्धतीलाच जेव्हा विरोध करतो तेव्हा ओघानेच अशा शाळान्च्या गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणक्रमास मिळणारे अनुदान व त्यान्चे भवितव्य हे प्रश्ण निर्माण होतात! या व्यतिरिक्त ब्राह्मणान्नी द्यान अडकवुन ठेवले ठेवले म्हणत गळे काढणारे ब्राह्मणान्च्या त्या "भिक्षुकी" च्या द्यानास मात्र नाकेच मुरडीत असतात व "भटान्ची पुटपुटणी" असे सम्बोधित असतात म्हणजेच ही लोक दोन्ही तोन्डानी बोलत असतात ना? आणि मग आधुनिक शिक्षणाचा विचार जेव्हा येतो तेव्हा गेल्या पन्धरा वीस वर्षात कोटी कोटी रुपयान्ची माया जमवित परप्रान्तिय पैशेवाल्यान्च्या सोइ साठी पन्चतारान्कीत अत्यन्त महागडी डॉक्टरी इन्जिनिअरिन्ग ची दुकाने कोणी थाटली? कुठे ही दुकाने आणि कुठे शे सव्वाशे वर्षान्पुर्वी पदरमोड करुन ब्राह्मणान्नी उभारलेल्या व आजही कार्यरत असलेल्या शिक्षणसन्शा? याचा विचार न करता "सोफ्ट टारगेट" म्हणुन कुणी ब्राह्मणान्ना टारगेट करीत असेल तर ते "ब्राह्मणी वन्श उच्छेदाचे" घातक कारस्थान सर्वदूर चाललेले आहे असेच समजावे लागत हे!
|
Limbutimbu
| |
| Wednesday, September 13, 2006 - 4:27 am: |
| 
|
वरील पोस्ट या बीबीच्या विषयाशी सुसन्गत नाही असे वाटेल पण तसे नाही हे! इस्लामी दहशतवादावरचा उतारा शोधण्या आधी हिन्दुन्ची सद्याची मानसिकता कशी ऑपरेट होते, कोण ऑपरेट करते, ते जाणुन घेवुन त्यावर योग्य उपाय योजना केल्याशिवाय परधर्मिय व परकीय धोक्यान्ना तोन्ड देणे अवघड असेल! किम्बहुना सद्ध्या तरी अशी परिस्थिती मुद्दामहून निर्माण केली जात हे की हिन्दू एकी, हिन्दू बळ, हिन्दू राष्ट्र ही केवळ बामणान्ची गरज हे किन्वा कारस्थान हेत! त्यात बहुजन समाजाने सामिल होवु नये असा प्रचार केला जातो हे! अशा प्रचारामागचे बोलविते धनी आपापल्या राजकीय स्वार्थान्च्या गरजेप्रमाणे बहुजन समाजास तसेच मराठा समाजास वापरुन घेत आहेत आणि या सत्यावरचा बुरखा फाडण्याचे महा अवघड काम मुठभर ब्राह्मण आणि अन्य समाजातील काही जागरुकान्वर हे! आणि म्हणुन मी म्हणतो की इस्लामी अतिरेक्यान्पेक्षा अधिक धोकादायक पद्धतीने "ये तो बस एक झान्की है, शनिवारवाडा बाकी है" असे म्हणणारे आणि "ब्राह्मणी स्त्रीयान्ची" मनोकामना ठेवणारे, आणि "सावरकरादी तमाम ब्राह्मणी" नेत्यान्वर गलीच्छ भाषेत शिवराळपणे पोलिसान्च्या, वृत्तपत्रकारान्च्या उपस्थितीत जाहीर सभान्मध्ये निन्दा करणार्या "अतिरेक्यान्चा" बन्दोबस्त करणे हे प्रथम कर्तव्य ठरते! विचार करुन बघा! मी दाखले मिळतील तसे देत जाईन!
|
Hya BB chya mul prashnache uttar mala ase vatate. Upchaar mhanaje ek Chaanakya...ek asa Chaanakya jo gharatil bhed ani gharabaheril raajkaaran donhinna neet jaanun ghevun shatrucha naash ani deshacha vikaas karnyas awashyak ti pawale uchalu shakel. (But i think unfortunately wud that b an imaginary person?) Uttar detanna punha prashnch sodun jatoy
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|