Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 09, 2006

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » QLC » Archive through April 09, 2006 « Previous Next »

Zakki
Saturday, March 04, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला neelu_n ने केलेली, किंवा लिहिलेली कविता फार आवडली.

लिंबूटिंबूला मी भेटलेलो आहे, चंपक. त्याने बघितले आहे की तो half life crisis च असतो. आता मी वृद्ध झाल्यावर मला कसलाही crisis च काय, कुठलाही problem च नाही. त्याच्या घरच्या आंब्याचा रस, नि त्यांचा प्रेमळ पाहुणचार अश्या आयुष्यातल्या सुखकारक ( माझी मुले उत्तम प्रकारे कॉलेज मधून पास झाली, त्यांना खूप पैसे मिळून ते सुखी आहेत, न्यू जर्सी तील ए.वे.ए.ठि. ... , मायबोली, वगैरे वगैरे ) आठवणी काढत मी सुखाने जगतो आहे.


Saanjya
Saturday, March 04, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक posts वाचलि.. सगल्यानि ती अगदि अतड्यानि लिहिली आहेत यात शंका नाही.. पण तरीही.. कुणीतरी फ़क्त "अरे काळजी करु नका.. सगळे हॊइल व्यवस्थित :-)" अस लिहल असत तर मला फ़ार आनंद वाटला असता..

Dhondopant
Saturday, March 04, 2006 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही म्हणणारच होतो.. " अरे शिंच्यानो काळजी करु नका. सगळे होईल व्यवस्थित. "

श्या!!! पण काय हो आता हे आणि नविन काय काढलेनी?... QLC? काय्यत्तरीच काय हो!.. शिंचे मन भरुन तुम्ही लोक जगत नाही याची ही लक्षणे आहेत. हां!! असले QLC वगैरे वाटत असेल तर तुम्ही चार शिवबाचे पोवाडे ऐका..!!.. श्या!! QLC !!.. तुम्ही तीशीतले तरुण आहात की म्हातारे? अरे ऐशी वर्षाचा शेलारमामा पहा जरा!!..

तुमच्यापरीस ते १९७० मधले कारकुन बरे.!!

आयुष्यात करण्यासारख्या कीती गोष्टी आहेत. त्यात आपण वेळ का नाही घालत? ते गाणे आहे ना " तुज कळते परी ना वळते र्‍ह्दयात व्यथा ही जळते " तीच स्थिती आहे. भारतात असा किंवा कुठेही.. धकाधकीचे जीवन हे बहुतेक वेळा असतेच असते. आपल्यापुढे एक नाहीतर दुसरा प्रश्न असतो. त्यात एखाध्या गोष्टीने खचुन नसत जायचे. तुकया सांगुन गेला...

रात्रदीन आम्हा युद्धाचा प्रसग||

धीर सोडायचा नाही.. अरे आजुबाजुस कीती लोक आहेत ज्याना आपल्या आधाराची मानसिक का असेना गरज असते. आपण जर आपलेच हे QLC घेवुन बसलो तर आपण करणार काय? की आपण आळशी आहोत म्हणुन हे सगळे QLC वगैरे वाटते आहे??

वाचा ही वचने विवेकानंदांची...

Then only will India awake when hundereds of large hearted men and women work unto their utmost giving up their all desires of enjoying the luxeries of life for the well being of the countrymen who are gradually sinking into vortex of destitution and ignorance.

I want muscles of iron and nerves of steel underwhich dwells a mind of same material as that of thunderbolt made.

I hold the man traitor who being educated on their expenses pays a least heed at them. "

हे मायबोलीवर येवुन QLC वगैरे discuss करण्यापेक्षा चार जोर बैठका काढुन मनाचे श्लोक म्हणा. कल्याण होईल.!!.. सल्ला रुचायला आणि पचायला थोडा जड आहे पण त्यात आमची काही चुक नाही. स्वारी!!! मनुस्विनीताईनी हा बीबी उघडला आहे. उगीच कट्टाळा येणे हे normal नव्ह.

श्या!!.. आम्हाला तर हे शंभरीत पण नाही होणार... QLC !!.. ही तारुण्याची थट्टा आहे!!






Milindaa
Saturday, March 04, 2006 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, तू हा बीबी चालू करताना मैत्रेयी ने दिलेली लिंक नीट वाचली होतीस का ? तुला QLC म्हणजे काय हे कळले आहे का ? अचानक कंटाळा आला आणि काय करावे हा प्रश्न पडला म्हणजे QLC ?

जास्वंद, तुम्ही डोक्यात फार लवकर घालून घेता बुवा.. मुळात हा विषय खरोखरच आर्चने म्हटल्याप्रमाणे सुख बोचण्याचा व्हायला लागला आहे. वरचे रचना चे पण पोस्ट वाचा. परदेशात येउन कंटाळा आला याला जर तुम्ही QLC म्हणत असाल तर आनंद आहे.

पंत, कोठेही जाउन उगाच काहीही सल्ले देउ नका. विषय काय आणि तुम्ही सांगता काय ? बैठका कसल्या काढताय... तुमचं तरुणपणीच असं झालंय हा मात्र QLC चाच परिणाम दिसतोय मला :-)


Arch
Saturday, March 04, 2006 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग. दि. मां नी लिहिलेल देत आहे.

फ़ुलला पहा सभोती आनंद जीवनाचा
तो आनंद टिपण्याची दृष्टी हवी, वृत्ती हवी


Manuswini
Saturday, March 04, 2006 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक कळत नाही लोंकानी एवढे डोक्यावर का घेतले आहे हे सदर?

मी QLC वाचले मान्य.
आणि एक साधारण प्रतिक्रिआ जाणायला एथे bb उघडला

मी असे काहीच म्हटले नाही की कंटाळा आला म्हणजे QLC just thought की लोकांना असे वाटले तर काय करतात

कमाल आहे एथील लोकांची बाबा


ते धोंडोपंताना ज्यास्त बैठका काढायची गरज आहे.

मी म्हटले ना की रचना well said and there ends ,it does not mean anybody here writing is having QLC issues.

overreact करण्यापेक्षा काय लिहिले आहे ते बघा जरा बघा

एक विंनती - एथे मी कोणालाही दुःखवण्यासाठी लिहिले नाही. उगाच खूपच उहापोह झालेला पाहून शेवटी हे असे लिहावे लागले..

बाकी मला काहेच म्हणायचे नाही.

मिलिंदा तुम्हाला जर वाटत असेल तर उडवा हे post आणी BB

आहे काय आणि नाही काय.
दोन गोष्टी जर्या share करयचा एक प्रयत्न


Saanjya
Saturday, March 04, 2006 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबॊली हा एक स्वर्ग आहे.. संज्या
---------------------------
स्वर्गात चहा मिळत नाही.. मिळते ते फ़क्त अमॄत.. अमॄत पिऊन एखादा देव मेला तरी त्याला परत अमॄत पाजवूनच जिवंत करण्यात येते.. चि. वी. जॊशी.




Ninavi
Saturday, March 04, 2006 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संज्या, हात्तिच्या! चहा हवा म्हणून का इतकी सगळी चर्चा केलीस!!
अरे, दोन चहा सांगा रे! ( मी ही घेईन म्हणते..)


नीलू, कविता झकास आहे. तुझी का? कवितांच्या बीबीवर का टाकत नाही?

Ameyadeshpande
Sunday, March 05, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aho zakki ani ninavi, ti kavita mhanje sandip salil chya namajur album madhla 7va gaaNa ahe ho! sandip khare ni lihileli. massssst gaaylay salil kulkarni ni!
pan ani ekda...Q L C hihihihi :-)


Manuswini
Sunday, March 05, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता माझा अनुभव सांगते कंटाळा आला असेल तर QLC, HLC & WLC असे BB उघडून चर्चा होवु द्या तेवढाच विंरुगळा :-)

ह्या रोगाचा प्रसार केल्याबद्दल क्षमस्व हा :-)


Neelu_n
Sunday, March 05, 2006 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका आणि निनावी ती कविता संदीप खरेची आहे. मी हल्लीच त्याच्या नवीन अल्बम मधे एकली, पुर्वी कंटाळा आला तरी त्या कंटाळ्याला नेमके शब्द मिळत नव्हते, पण आज काल मला ही अस्सा खुपऽ कंटाळा आला की ह्या कवितेच्या ओळी आपोआप गुणगुणल्या जातात:-) कंटाळा उगीचच जरासा कमी झाल्यासारखा वाटतो मग.:-)

अमेय तु एकलय ना ते गाणे, मस्तच गायलय.

मनुस्विनि, माझ्या कंटाळ्यावरचा हल्लीचा उपाय हा असा आहे:-) तुला कुठे मिळाले तर नक्की एक ते गाणे.


Jaaaswand
Sunday, March 05, 2006 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा..

मला वाटते..माझ्या पहिल्या काही posts मधील ( मला ) अभिप्रेत अर्थ तुमच्यापर्यंत पोचू शकलेला नाही...
मी फ़क्त.. article मधे दिलेल्या काही गोष्टिंवरून शक्यता ( निष्कर्श नाही!! ) बोलून दाखवली....
medical terms मध्ये जसे " अंगावर चट्टा पडला test करून घ्याव्यात " तसा हा प्रकार आहे...
ह्याचा अर्थ असा नव्हे कि महारोग झालाच आहे...

असो.. परदेशात येउन कंटाळा आला आणि त्याला मी QLC म्हणतोय असे अजिबात नाहिये... मी म्हटले आजूबाजूची परिस्थिती ह्यास बहुदा कारणीभूत असेल...

जेव्हा विरंगुळ्याची साधने ( जी आपणच शोधायची असतात.. हे अगदी मान्य पण )
मिळत नाहीत..तेव्हा कदाचित असे ( QLC type ) विचार येऊ शकतात..

बाकी साधने परदेशातच मिळत नाहीत असे नाही...
मला मध्ये भोपाळलाही असाच अनुभव आला होता...

त्याच अनुषंगाने QLC होण्यासाठी " सुखच बोचले पाहिजे " हे मला पटत नाही..

बाकि आर्च तुझ्या स्पष्टीकरणाबद्दल आणि सल्ल्याबद्दल धन्यवाद... :-)

जास्वन्द...


Ameyadeshpande
Sunday, March 05, 2006 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ते गाणं मस्तच आहे आणि सलील नी त्या रूटीनचा अतीव कंटाळा दर्शवण्यासाठी मधेच एक वाक्य गद्य म्हणलयं पट्टी धरून रेघ मारल्यासारखं सरळ. :-)
पण गाण्याबद्दल बोलण्याची जागा चुकत आहे इथे असं मला वाटतयं. :-)


Manuswini
Sunday, March 05, 2006 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जासवद

मी हेच सांगयचा प्रयत्न करत होते
पण लोकांची post वरुन त्यांचा गोंध्ळ झालेला दिसतो
सुख बोचने हे सुद्धा मला जरासे पटले नाही.
कारण ही काही दुःख आहेत असे नाही तर हे असे होते कधी कधी
जवु दे मलाच कंटाळा हे असे लिहुन लिहुन :-)


Saanjya
Monday, March 06, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद, मनुस्विनी, तुम्ही दोघानी सगळ लिहलच आहे..

निनावी, चहा offer केल्याबद्द्ल खरच आभार.. मला वाटले परत माझी त्या 'दिव्याशी' गाठ.. :p ..btw, तु चहा आण्णा चहावाल्याकडून मागवला आहेस की नाना चहावाल्याकडून?? :D

Puru
Monday, March 06, 2006 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Instead QLC, a better BB would have been MLC!

Ninavi
Monday, March 06, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संज्या, मी ( पुणेकर नसल्यामुळे) नानांना ओळखतच नाही.
( झक्की)काका, मला वाचवा(ल ना?)


आणि हो, संजूबाळा, का ss ही काळजी करू नकोस बरं, सगळं काही ठीक होईल!! ( ते एक रहायला नको!)

Yuvrajshekhar
Friday, April 07, 2006 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते की QLC मुम्बई बाहेरच्या लोकान्चा प्रोब्लेम आहे,आमच्यासारख्या मुम्बईकराना कसला आलाय क्रायसिस ईतका वेळच नाहीये कोणाला.सकाळपासून धावपळीलासुरुवात होते आणि रात्री घरी आल्यावर अन्गात त्राणही उरत नाही.मग कसला क्रायसिस आणि काय

Manuswini
Friday, April 07, 2006 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे की मुंबईबाहेरची लोक कामे नाही करत का हो?:-)


Yuvrajshekhar
Sunday, April 09, 2006 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

No that means we don't consider it as a problem,it is a part of life.The Mumbai Spirit.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators