Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 29, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » १५ ऑगस्ट नी सारेगामपा च्या निमीत्ताने » Archive through August 29, 2007 « Previous Next »

Deepanjali
Tuesday, August 28, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मला फक्त इतकच कळतं की any government represents the country it operates in and decisions taken by the government are reflection of majority of the people in it's country.

ज्या देशाच्या सरकारचे आचार विचार भारतविरोधी आहेत त्या देशातल्या लोकांशी कुठल्याही प्रकारचे सम्बंध ठेवण्याची काय आवश्यकता आहे?
<<<<परत तेच !
पाकिस्तान शी भारताचे राजकीय संबंध कसे आहेत हे तुम्ही किंवा इतर कोणी सांगायची गरज नाही .
पण एखाद्या स्पर्धे मधे पाकिस्तान किंवा इतर कोणत्या देशाला invite करायला तो देश मित्र च कशाला हवा ?
एखाद्या देशाला स्पर्धेला बोलावले किंवा त्या स्पर्धकांचे कौतुक केले म्हणाजे त्यांच्या देशा विषयी अपल्याला प्रेम वाटते किंवा आपण त्यांच्याशी घनिष्ट संबंध ठेवणार आहोत असे थोडीच आहे ??
गेले कित्येक दशके भारत पाकिस्तान क्रिकेट सामने किंवा हॉकी सामने होतात त्या वेळी काय त्या देशा विषयी आपल्याला फ़ार प्रेम असते म्हणून खेळतो का आपण त्यांच्याशी ?
ती केवळ एक स्पर्धा आहे आणि स्पर्धे सारखे treat करा .
एक वेळ भारत पाक क्रिकेट सामन्यात एखादा देश हरल्या नंतर जनता हिंसाचार करेल पण तिथे कोणी objection घेत नाही उलट भारत पाक सामना कधी होतोय याची लोक वाट पहातात .
मग सारेगमप सारख्या सौम्य संगीताच्या स्पर्धे ला तुमचे objection का ?



Divya
Tuesday, August 28, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रिकेटचे सामने organize एकटा भारत करत नाही. हि स्पर्धा भारतातच आनी एथल्याच लोकांनी organize केली आहे, यात पाकिस्तानचा काही ही सहभाग नाही. आपल्याच देशात येउन पाकिस्तानी स्पर्धकांचा ते पाकिस्तानी म्हणुन उदोउदो जास्त होतोय त्यावर objection असावे.
पाकिस्तान के महाबली अमानत अली.... कशाला म्हणाय्चे मग?
फ़िरोज खान पाकिस्तानात गेला होता तेंव्हा त्याने हिंदुस्तान बद्दल चांगले उदगार काढले म्हणुन त्याच्यावर तिथले पब्लिक भडकले होते.
अमानत अलि ने त्यांए देशभक्तीचे गीत आपल्या platform वर कशाला म्हणायचे. एकतर हि फ़क्त संगीत स्पर्धाच होती तर 15 augast चा तो शो कशाला करायचा होता मग? त्यात दोन्ही देश आले मग राजकारण आले आनि त्यात खुन्नस हि आली.


Deepanjali
Tuesday, August 28, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजलि
डोके फ़िरल्यासारखे भडक बोलताय)))) आता हे तुझ काय तरि एडताक. यात मि काय भडक बोललो हे पाकडे
स्फ़ोट घडवतायत हे खोटे. का मुसल्मान पकिस्तान धार्जिणे आहेत हे खोटे. उलट तुच त्या मुसरत कि (मुशरफ़) प्रेमाने आंधळी. झालि आहेस.
आता हे सगळ अस आपली माणस मरत असताना या पाकड्यांची गाणी एकत बसण(आवडिने) हे कुणालाच न पटण्यासारखे आहे.

<<<अता कशाला डोके फ़िरल्या सारखे बोलणे म्हणतात हे पण समजत नाही का , बर परत सांगते .
मला तुम्ही पाकिस्तान प्रेमी , मुस्सरत ची अंध प्रेमी , भारत द्वेष्टी म्हणताय , किंवा ऊठ सूठ सगळ्याच मुसलमानांवर जे गंभीर आरोप कुठलाही पुरावा नसताना करताय , असले लिखाण तुम्ही डोकं ठिकाणावर ठेवुन लिहिलेय असे मला तरी वाटत नाही !
तेंव्हा इथून पुढे वाद घालायचा तर logic वापरून घाला उगीच भडक आणि विनोदी लिहायचं म्हणून वाट्टेल ते लिहू नका , त्या साठी विनोदाचा BB आहे गुलमोहरावर .


Antara
Tuesday, August 28, 2007 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो पण झी हे चानल स्वत्: ला भारतीय म्हणवते का, ते तर साउथ अशियन म्हणत असणार आणि भारत पाक श्रीलन्का, बान्गला देश सगळ्याना टर्गेट करणार. त्या दृष्टिने त्यांचे जे चाल्लय ते बरोबर च की. ते फ़क्त बिजनेस करतायत. करमणुकिचा धन्दा. आणि तुम्ही लोक या एक साध्या टिव्ही शो ला कसले अस्मिता देशप्रेम धर्मयुद्ध वगैरे बनवुन बसलाय.
करमणुक म्हणून पहा. तुमच्यासारखे बहुसंख्य लोकाना नाही आवडले TRP आपोआप कमी होईल च
बहुसन्ख्य लोकानी पाहिले अन पाक गायक पुढे जरी आले तर याचा अर्थ लगेच असा नाहि की त्याना पाक बद्दल प्रेम आहे. किन्वा जरी भारतीय गायक जिन्कला याचा पण अर्थ असा काढायला जाउ नका की शेवटी देशाशे एकनिष्ठ राहिले लोक वगैरे :-) त्याना त्या वेळी त्या गायकाचे गाणे आवडले बस्स. येवधे जर लोक डीप थिन्किन्ग करत असते तर अजुन काय हवे होते हो



Deepanjali
Tuesday, August 28, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याच देशात येउन पाकिस्तानी स्पर्धकांचा ते पाकिस्तानी म्हणुन उदोउदो जास्त होतोय त्यावर objection असावे.
पाकिस्तान के महाबली अमानत अली.... कशाला म्हणाय्चे मग?
फ़िरोज खान पाकिस्तानात गेला होता तेंव्हा त्याने हिंदुस्तान बद्दल चांगले उदगार काढले म्हणुन त्याच्यावर तिथले पब्लिक भडकले होते.
अमानत अलि ने त्यांए देशभक्तीचे गीत आपल्या platform वर कशाला म्हणायचे. एकतर हि फ़क्त संगीत स्पर्धाच होती तर 15 augast चा तो शो कशाला करायचा होता मग? त्यात दोन्ही देश आले मग राजकारण आले आनि त्यात खुन्नस हि आली.

<<<<<<ते पाकिस्तानी आहेत म्हणून कोणी त्यांचा उदो उदो करत नाहीये , ते खरोखरच सुरेख गातात म्हणून appreciate करणे आणि उदो उदो करणे यात फ़रक आहे .
बाकी तू आधी माझी पोस्ट वाचली असशील तर माझे पण हेच मत होते कि स्वातंत्र्यदिन ही sensitive theme झी सारख्या international channel ने घ्यायलाच नको होती , ज्यामुळे वाद होतील .
पण शेवटी ते commercial channel आहे , केवळ TRP साठी ते वाट्टेल ते करतील यात काही नवल नाहीये .
बाकी झी हे फ़क्त भारतीय channel आहे असं कोणी सांगितलय , ते international channel आहे .
त्यामुळे मला तरी वाटते कि प्रत्येक स्पर्धक आपल्या अपल्या देशाचीच गाणे गातील हे स्वाभाविक च आहे .
आणि क्रिकेट organize करण्यात पाकिस्तान चा संबंध कसा नाही , त्यांच्या देशात जाउन आपण किती तरी वेळा खेळलो आहोत आणि त्यांनाही invite केले आहे , अगदी आपण संयुक्त पण WC पण केला होता organize, ते चालते का तुम्हाला ?
:-)


Maanus
Tuesday, August 28, 2007 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



.. .. .. ..

Tiu
Tuesday, August 28, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली
<<<<परत तेच !
>>>

तुमचंही परत तेच...

त्या देशातल्या लोकांशी कुठल्याही प्रकारचे सम्बंध ठेवण्याची काय आवश्यकता आहे? असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा कला, क्रिडा, राजनैतीक, सामाजिक असे कुठल्याही प्रकारचे सम्बंध असा अर्थ मला अभिप्रेत आहे...
कुठल्याही प्रकारचे सम्बंध म्हणल्यावरही माझं फक्त सारेगमप ला objection आहे असं तुम्हाला का वाटलं?

असो, तुमचा मुद्दा मला पटत नाहिये आणी मी इतकं स्पष्टीकरण दिल्यानंतरही माझा मुद्दा तुम्हाला समजत नाहिये!!!
त्यामुळे आपण व्यर्थ वाद घालतोय!


Santu
Wednesday, August 29, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर बाई दिपांजली
दे तु त्या पाकड्याला मुसरत ला मत.
तुच बाई शहाणी आम्हि सगळे येडेखुळे
आम्हाला आपल वाटते की "आपल्या" माणसांचा उदो उदो व्हावा.
तुला तस वाटत नाहि तर दे त्याला मत.
तुला सगळ जगच तुझ घर वाटतय.
तर आम्ही तुझ्या एवढे "मोठ्या मनाचे" नाहि.
आम्हाला आपली "भारतभुमि" प्रिय.
दे ग बाई दे
तुला एवढ त्या मुसरत पाकड्याला
मत देवु वाटतय तर दे.



Sanghamitra
Wednesday, August 29, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक बीबीवर हेच बोलायचं तर वेगळे बीबी उघडायची गरजच नाही.
आणि तुम्हाला तिथले कलाकार नकोत ना. मग भय्यांना पण इथे खूप विरोध होतोय. महाराष्ट्रात येऊन त्यांनी खूप गोंधळ केलाय. मग अमिताभशी पण असेच वागणार का? जसे आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स आहे तसेच या स्पर्धांत आंतरराज्यीय पॉलिटिक्स ही असते. ते याच्यापेक्षा जास्त डोक्यात जाते.
आणि बरं तुम्ही त्यांना हाकलवू शकणार असाल तर ठीक आहे. मी पण तुमच्यात. नाहीतर गम्मत बघा न सोडून द्या ना. मी वोट्स तर कुणालाच देत नाही ना त्यांना ना आपल्याला.


Deepanjali
Wednesday, August 29, 2007 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु ,
तुमच्या साठी खुष खबर !! :-)
या week च्या results मधे पाकिस्तान चा ' अमानत अली ' आहे topper.


Kedarjoshi
Wednesday, August 29, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण चूक कोण बरोबर काहीही असो.. पण गेली साठ वर्षं ज्या देशाने भारताशी नफरत करण्यात घालवली आहेत, ज्यांच्याशी लढताना, सीमेवर आपल्या जवानाना आणि देशात निरपराध लोकांना रोज मरण येते, त्यांच्या कलाकारांना चाटायची काहीही गरज नाही...

(मग ते चांगले असोत, अप्रतीम असोत नाहीतर देवाचे प्रेषित असोत...) >>>>>

विनय अगदी खर आहे तुमच. निदान त्या हैद्राबाद मधील स्फोटा नंअतर झी ने अस सांगायला पाहीजे होत की त्या स्फोटात पाक चा हात असल्या मुळे अत्यंत खेदाने आम्हाला पाक च्या स्पर्धकांना ला काढावे लागत आहे. ह्यात पोलीटीकल मुव्ह व थोडा करारीपणा दोन्हीही साध्य झाले असते. ऐनीवे.



Savyasachi
Wednesday, August 29, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेहे... केदार, तू म्हणजे फ़ारच विनोदी बुवा :-)
झी किंवा कोणताही चनेल अस सांगणार आणि करणार? आणि तसही कोर्टात अपराध सिद्ध होत नाही तोपर्यंत निरपराधीच. पाकने आपला हात आहे हे नाकारले आहेच.


Tanyabedekar
Wednesday, August 29, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु प्रतिबिंब त्राटक तुम्हाला फारच जास्ती मानसिक शांति देत आहे असे दिसते..

Kedarjoshi
Wednesday, August 29, 2007 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर बाबा मी विनोदी पण वस्तुस्तिथी विनोदी नसते. मी काही दहशतवादी हिंदु नाही (ही फ्रेज कुलकर्न्यांची) पण देश महत्वाचा मग गाणे बजावने म्हणुन या घटनेला मिडीया ने तसे करायला पाहीजे. तेच अमेरिकेने तसे केले असते तर आपनच त्यांची वा वा करत बसलो असतो. नव्हे नोर्थ कोरीयाचा घटनेच्या वेळी केली. पण भारतात अशी भाषा बोलायची म्हणल की लगेच तुम्ही जातीयवादी ठरता.

कोर्टात सिध्द क्धी होनार? आधीच्या घटनांचे काय झालेऽन तुला काय वाटले पाक लगेच हो आम्ही केले म्हणनार. ऑफकोर्स झी तसे करनार नाही कारन आपले पंतप्र्धान ही फक्त निशेध नोंदवतात.

कोनतेही चनेल का करनार?

मग भारत पाक मैत्री तरी ते का करतायेत? निदान तसा आव आनतायत. मी आधीही लिहीले की मिडीया फार मोठा प्रभाव टाकते.

जस्ट विचार कर जर त्यांनी असे केले असते तर जनते मध्ये देशभक्ती जी भावना थोडी फार जागी झाली असती. देशभक्ती नी काहीतरी साध्य होते हे कळले असते व नेहमी बॉम्ब स्फोट झाल्यामुळे जी बोथ्ट भावना झाली आहे तो बोथट पणा दुर होन्यास मदत झाली असती. रोजच्याच दंगली मुळे आपल्याला काहीही वाटत नाही तेव्हा असे करुन आपन अजुनही जिंवत आहोत हे दाखवता आले असते.

परत एकदा मी अमानत वा मुशरत विरोधी नाही तर पाक विरोधी आहे. मलाही त्या दोंघाचा आवाज आवडतो पण आधी देश मग बाकी अन तेही अशा स्फोटाचा वेळी.

I know हे लिखान कदाचीत विनोदी वाटेल पण त्या फाठीमागच्या भावना विनोदी नाहीत.

मी बी बी सुरु केला तो पण त्या झी ने देशभक्ती मध्ये आनली म्हणुन. मग गाने म्हणने म्हणजे देशभक्ती पण वेळ आल्यावर निदान असे करुन देशभक्ती का दाखवीता येत नाही?


Vijaykulkarni
Wednesday, August 29, 2007 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काही दहशतवादी हिंदु नाही (ही फ्रेज कुलकर्न्यांची)

मी असे कधी म्हणालो बरे?


Kedarjoshi
Wednesday, August 29, 2007 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो वैयक्तीक मला नाही. पण दहशतवादी हिंदु ही फ्रेज आपण मागे वापरली आहे. आठवुन पाहा. ते जाउ द्या, मुद्दा कसा वाटला तुम्हाला.

Zakki
Wednesday, August 29, 2007 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो केदार, ते मुद्दा वगैरे बघत नाहीत. ते फक्त 'तांत्रिक' चुका काढतात. आता मी असे कधी म्हणालो ह्या विषयावरच त्यांचा भर आहे, तुमच्या मुख्य मुद्द्यावर नाही.

तर आता तुम्ही बराच वेळ खर्च करून ते जुने लिखाण उकरून काढून दाखवून द्याल कधी तुम्ही वाचले ते. मग ते म्हणतील, पण संदर्भ वेगळा होता, त्या आधी तुम्ही असे म्हणाला होता वगैरे.

म्हणजे काय होते, कठिण प्रश्नांना उत्तरे देण्या ऐवजी कमी महत्वाच्या मुद्द्यांवर वाट्टेल तशी चर्चा करता येते.

ही काही लोकांची युक्ति मी मागेच ओळखली. लालभाई हे याचे महान उदाहरण होते.

तर माझे उत्तर असे की, महात्मा गांधींची शिकवण नि आचरण असे होते की ते मुसलमानांनी काही केले तरी त्यांना आपले धाकटे भाऊ मानून त्यांच्याशी जरा जास्तच प्रेमाने वागावे. तर त्यातले थोडे अजून उरले आहे. बदलत्या काळाप्रमाणे काही बदल करावा लागतो हे मानायलाच तयार नाहीत. पण हिंदू जर असेच श्रद्धेच्या नावाखाली जुन्या चालीरिती पाळत असले तर त्यांना मात्र नावे ठेवायला तयार की तुम्ही अजून शास्त्राची कास का धरत नाही.

असो. तुम्ही आपले करत रहा चर्चा! मी गंमत बघतो.


Vijaykulkarni
Wednesday, August 29, 2007 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण दहशतवादी हिंदु ही फ्रेज आपण मागे वापरली आहे.

त्यात काही चुकिचे आहे असे मला वाटत नाही.
"दहशतवादी हिन्दु" ही फ्रेजच मुळी चुकिची आहे असे वाटते का?

असो विषय पुन्हा तिसरिकडेच

इराक मधल्या लोकाना अमेरिकन सरकार च्या धोरणान्बद्दल प्रचन्ड राग असणे सहजिक आहे. पण सामान्य इराकी माणसाने सामान्य अमेरिकन माणसान्चा द्वेष करणे योग्य आहे का?

दावूद पाकिस्तानात आहे हे अगदी सुर्यप्रकाशासारखे स्पष्ट असूनही एकाही सरकारने पाकिस्तानला "इन्द्राय तक्षकाय च" असे का सन्गितले नाही हे मात्र अनाकलनिय आहे. रॉबिन्हूड असते तर



Kedarjoshi
Thursday, August 30, 2007 - 12:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोनी काय केले याची चर्चा चालु नाहीये. काय कराव याची आहे बहुदा.

(येउन जाऊन ५ सहा वर्षाचे बिजेपी सरकारच का आठवावे तुम्हाला) तरी पण २००० मध्ये फोजा सिमेवर नेऊन उभ्या केल्या होत्या त्यामुळे जगभर युध्द होनार की काय याचा बातम्या येत होत्या हे आपन विसरलात वाटत. तेवढे जरी केले तरी पुरे होईल.

लोक आणि सरकार यात फरक कसा करावा? म्हणजे सरकार म्हणते मी तुमच्यावर बॉम्ब टाकतो, तुम्हाला बेचीराख करतो नी त्याअ देशाचे लोक म्हणतात नाही नाही हे आमच्या सरकारचे मत आहे माझे नाही. ते तुम्हाला मारत आहेत मी नाही.
उद्या भारत पाक युध्द (उदासाठी) झाले तर तुम्ही असे म्हणनार का की मी युध्द करत नाही माझ्या देशाचे सरकार युध्द करत आहे.
हे असे म्हणने म्हणजे जबाबदारी नाकारने होय.
जनता आणि सरकार यात फरक असतो पण जेव्हा युध्द (घोषीत अथवा अघोशीत, उघड वा छुपे) असते तेव्हा तो नसतो. तेव्हा तो एक देश म्हणुनच पाहीला जातो. ( जास्त एक्स्प्लेन करुन सांगायचे तर मी म्हणले माझ्या मित्र डोयल ने ईराक वर आक्रमन केले नाही पण अमेरिकेने केले, डोयल अमेरिकन म्हणुन तो ही त्या आक्र्मनाला जबाबदार) हुश्श.

परत एकदा लिहीतो देश म्हणुन विचार करा पार्टी म्हणुन नाही. ( तसेच एखादा कार्यक्र्म म्हणुन नाही).


Vijaykulkarni
Thursday, August 30, 2007 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरी पण २००० मध्ये फोजा सिमेवर नेऊन उभ्या केल्या होत्या त्यामुळे जगभर युध्द होनार की काय याचा बातम्या येत होत्या हे आपन विसरलात वाटत. तेवढे जरी केले तरी पुरे होईल.
काय उपयोग झाला त्याचा?
आपले हजारो कोटी रुपये गेले आणी शेकडो सैनिक मेले एवढाच ना?

भारत पाक युद्ध झालेच तर दोन्ही
देशातील सम्बन्ध आपोआप तुटतील, मग असे कार्यक्रम होणारच नाहीत.
पण असे युद्ध होणे दोन्ही देशाना परवडणारे नाही. दोन्ही देशातील मध्यम वर्ग इतके ताणू देणार नाहीत.


Thomas Friedman says "tow countries with golden arches do not go to war"


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators