Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 04, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » वन्दे मातरम » Archive through September 04, 2006 « Previous Next »

Vijaykulkarni
Friday, September 01, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतिहासापासून बोध घेतला नाही तर भविष्यकाळ सुसह्य होईल असे वाटत नाही.

आणी इतिहासातच रममाण झालो तर भविष्यकाळ घडवायला वेळ उरणार नाही.



Dinesh77
Friday, September 01, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रममाण होणे आणि बोध घेणे यात जमीन अस्मानाचा फ़रक आहे.

Zakki
Friday, September 01, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू भाऊ, ते सगळे ठीक आहे हो, पण मग अजूनहि भारतातच हा शेळपटपणा कसा चालतो? एव्हढे तुम्ही म्हणता तसे शूर वीर असते तर एव्हढे मुसलमानांचे लांगूलचालन उघड उघड चालले असते का?

'जनजागृति' हे मुख्य आहे हो, थोड्या लोकांनी शूरवीरपणा केला तरी त्याचा या राजकारणी लोकांना काही फरक पडत नाही! जेंव्हा सगळे लोक खरे 'जागे' होतील, नि मुसलमानांच्या लांगूलचालनास निवडणूकीत मते देऊन विरोध करतील, तेंव्हाच ते घडेल. नि तसे ते होत नाही!

मारे सांगता तुम्ही, कुणि कुणि प्राण दिले, वगैरे. पण लक्षावधी, नव्हे कोट्यावधी लोक इंग्रजांची गुलामगिरी पत्करून त्यांच्या बाजूने भारतीयांना विरोध करत होते, कित्येक दशके!! ते खोटे आहे का? १ टक्के लोक शिकलेले, 'ज़ागृत' आहेत म्हणजे सगळी जनता जागृत होते का?

मी तुमचे म्हणणे समजतो. पण अजून खूप खूप करायला पाहीजे आहे, नि त्या दऊष्टीने पहाता अधोगतीच दिसते!


Chyayla
Friday, September 01, 2006 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की आणी लिम्बु भो ह्या लोकान्ना भारत माता कि जय पेक्षा सोनिया माता कि जय म्हणायला भुषण वाटत, असले शेळ्पट आणी गद्दारान्ची आपल्या ईतिहासात आणी वर्तमानातही काहि कमी आहे काय? शिवाजि महाराजाना पण विरोध असल्या तत्वान्नीच केला होता जयचन्द म्हणजे यान्चा खरा आदर्श, देशाला तो शापच आहे. पण या लोकान्ना एक लक्षात येत नाही भारत असल्या सापान्ना ठेचुन आणी पुरुन उरला आहे.

भारत माता कि जय!!! वन्दे मातरम!!!


Limbutimbu
Saturday, September 02, 2006 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश७७, तुमचे बरोबर हे, मला सन्दर्भ नीटसा आठवत नव्हता! :-)
भो पन्चम जॉर्ज, अशा काहीतरी वाक्याने सुरु होणारी प्रार्थना पण होती म्हणे त्या काळी, शाळेत!
झक्की, अजुन खुप काही करायला पाहीजे हेही तितकेच खरे, मान्य!
आशा कर्तो की आमच्या हयातीतच काही बदल घडलेले दिसुद्यात! :-)


Limbutimbu
Saturday, September 02, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, अशी लोक आणि बीजेपीमधल्या तत्कालिक फुटकळ घटनान्ची उदाहरणे देणारे यान्च्या पायाखालची वाळु खरतर १९९२ मधेच सरकली हे! हिन्दू एकतेची ताकद काय घडवून आणु शकते ते बघुन त्यान्च्या खुर्च्या तेव्हाच डळमळल्या हेत!
मग घोड अडलय कुठ? तर झक्की म्हणतात त्याप्रमाणे अजुनही पुरेशी सुधारणा नाही! अजुनही फार मोठा समाज निष्क्रीय अवस्थेत हे! आणि बाजीरावाप्रमाणे, बारीक सारीक फान्द्या झाटण्यापेक्षा, काही काळ धीर धरुन एकदम मुळावरच घाव घालणे केव्हाही श्रेयस्कर! :-)
तो काही काळ म्हणजे काही महिने वा वर्षे वा तपेही असु शकतील!
उगाच घाई करायला हिन्दु समाज म्हन्जे काही "हिटलर" नाही हे!
DDD

Samuvai
Monday, September 04, 2006 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'जनजागृति' हे मुख्य आहे हो, थोड्या लोकांनी शूरवीरपणा केला तरी त्याचा या राजकारणी लोकांना काही फरक पडत नाही! जेंव्हा सगळे लोक खरे 'जागे' होतील, नि मुसलमानांच्या लांगूलचालनास निवडणूकीत मते देऊन विरोध करतील, तेंव्हाच ते घडेल. नि तसे ते होत नाही!

झक्की,
आता तुमचीही cat उडी मारुन bag च्या out आली की नाही?
अहो हाच मुद्दा मी वर मांडला होता. पण ज्यांच्या bag मध्ये cat च नाहीये त्यांनी लगेच आमची "दौड" कुठपर्यंत आहे वगैरे सांगून टाकले. असो;
रावणाचे प्राण जसे त्याच्या नाभीत होते तसे ह्या राजकारण्यांचे प्राण त्यांच्या खुर्चीत असतात. ती काढून घ्या. अगदी सगळे प्रश्न सुटतील अस नाही. पण देशद्रोह्यांच सरकारी लांगूलचालन तरी संपेल.

लिंबू, झक्की, दिनेश, केदार,
सुरेख मुद्दे.
एका बाजूला दुसर्या फाळणीसाठी तत्पर राष्ट्रद्रोही आक्रमक होताहेत आणि दुसर्या बाजूला ह्या pseudo secular नेत्यांनी स्वत्:च्या फ़ायद्यासाठी जनतेला सेक्युलारिझम, सहिष्णुता, अहिंसा ह्या तत्वांच्या सोयीस्कर व्याख्यांची भांग पाजून झोपवलय. भरीस भर म्हणून कुठलाही भरीव कार्यक्रम नसलेली समाजवादी आणि साम्यवादी माकडं मागे "हां जी र जी SSS" करायला तत्पर आहेतच.
ही विषवल्ली (जनतेसमोर सत्य आणून) संपवावी लागेल.


Soultrip
Monday, September 04, 2006 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडा वेगळा मुद्दा\प्रश्न मांडतोय:
आपले राष्ट्र-गीत (जन, गण, मन) हे टागोरांनी पंचम जॉर्जच्या स्वागता-प्रसंगी लिहिले होते. (नक्की Date मला माहित नाही.)
१. वंदे मातरम बाजुला डावलून 'जन्-गण्-मन' हेच राष्ट्र-गीत आहे, असे केंव्हा ठरले?
२. तसे करताना, 'जन-गण्-मन' मधील काही शब्द (उदा: अधिनायक, भाग्य-विधाता, हे शब्द सरळ्-सरळ पंचम जॉर्ज साठीच आहेत हे दर्शवितात) का नाही बदलले?
३. आता सध्या पण, 'जन-गण्-मन' ची चाल अथवा ढांचा न बदलता ते २-३ आक्षेपार्ह शब्द बदलण्याचा पुढाकार BJP/VHP/Bajarang Dal etc का घेत नाहीत?
४. हो, मान्य आहे की 'जन्-गण्-मन' गाताना आमच्या मनात भारतमाताच असते. पण दोन्-तीन शब्द बदलल्याने नुकसान तर काहीच होणार नाही. अपेक्षीत अर्थ नेमका ध्वनीत होईल.

तुम्हाला काय वाटते?



Laalbhai
Monday, September 04, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन चालूच आहे का? हे पहा आणि थंड व्हा. :-)



Laalbhai
Monday, September 04, 2006 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी.. एकटे लढताय.. बरे वाटतेल. सध्या घाईत आहे. वेळ मिळेल तसा मदतीला येतच राहीन.

ह्या दंभ मिरवणार्‍या लोकांना काही सुनावून उपयोग नाही हो. राष्ट्रभक्तीच्या नाव पुढे करायचे आणि निव्वळ स्वार्थ साध्यायचा, असे यांचे धंदे आहेत.

देशभक्तीचा फ़ुका उदो उदो करणार्या संघाची केरळातली लोकं भ्रष्ट्राचारात खोलवर अडकली आहेत.

आजचा लोकसत्ताचा अग्रलेख वाचलाच असेल.

पण निर्लज्ज पणे सत्तेसाठी विस्तवाशी खेळायची सवयच आहे यांची. पण येत्या एक दोन निवडणूकातच यांची pre-1989 परिस्थिती (संसदेत फक्त २ जागा) ओढावणार आहे, हे नक्की.

धार्मिक भावना किंवा खोट्या देशभक्ती च्या भावना चेकाळवून सत्ता एक वेळ मिळवता येते. पण ती टिकवण्याची लायकी लागते. ती यांच्याकडे नाही.


Limbutimbu
Monday, September 04, 2006 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला येक शन्का हे!
या बीबीचा विषय नाहीहे, पर हिथच विचारुन घेतो! :-)
लोकसत्तेचा कुमार केतकर तर हिथ वरल्या कन्च्या आयडीन लिहित नाही ना?
DDDDDDD

Samuvai
Monday, September 04, 2006 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू,
LOL पण नसेल. त्यानेही अजून BJP साठी २ जागा वगैरे भविष्यवाणी वर्तवण्याच धाडस दाखवलेल नाहीये वा सोनियांन्ना उघड उघड "माता" ही म्हंटलेले नाहीये. तुम्हाला संशय असलेले लोक "सवाई" केतकर दिसतायत :-)


Limbutimbu
Monday, September 04, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> "सवाई" केतकर दिसतायत DDD

Vijaykulkarni
Monday, September 04, 2006 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु आणी सामुवै,
अरे बाळान्नो, भगवद्गीतेत ( तुम्ही वाचलेली नसेलच ) प्रत्यक्श क्रुष्णाने सान्गून ( सन्केतीक भाषेत ) ठेवलेले आहे

"बहु"नी मे व्यतीतानी
जन्मानी तव "चार जून:"

गीता ४-५

राजीवजी आणी "बहू" सोनियाजी यान्ची प्रथम भेट चार जून रोजी झाली हा काय फक्त योगायोग?



Samuvai
Monday, September 04, 2006 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे छे.
ह्या उलट परकियांपुढे लोटांगणे घालताना भगवत गीतेचीही तोडफोड करण्यास पुढे मागे न पहाणारे, औरंग्याचा उदो उदो करणारे, वंदे मातरम ला विरोध करणारे "कुत्रे" (देवद्रोही अवघे कुत्ते, त्यांसी मारोन घालावे परते, देवदास पावतील फत्ते, यदर्थी संदेहो नाही - समर्थ रामदास - तुम्ही वाचले नसतीलच) नीट ओळखता यावे ह्या साठी भगवंतानेच तिला पाठवली आहे.


Moodi
Monday, September 04, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी अशी वडाची साल पिंपळाला लावु नका हो.

गीतेचा संबंध कुठेही काय लावताय?

त्याचा अर्थ आहे की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की " तू आणि मी बरेच जन्म घेतलेले आहेत, परंतू फरक हाच आहे की मला ते सर्व आठवतायत, पण तुला आठवणार नाही. "


Vijaykulkarni
Monday, September 04, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा
इतके विनोदी पोस्ट सुद्धा गाम्भिर्याने घेउ नका रे बाबानो


Chyayla
Monday, September 04, 2006 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी.. एकटे लढताय... हा.. हा.. हा..(आतली खबर) कुलकर्णी एकटे रडताय, मी पण येतो रडायला..., सध्या वेळ नाही.. मुद्दे शोधायचा प्रयत्न करत आहे आमचा भिन्ग खराब झाला हाय लोकसत्ता वाचत येत नाय, आणी हे असले फ़ुसके बार वैगेरे नका काढु हो. ह्या टायमाला हफ़्ता मिळायचो नाय तुमाला या साठि का तुम्हाला पाळुन ठेवले आहे, उगिचच स्वताचि फ़जिती करुन घेताय...XXXX(बाकी सभ्य भाषेत लिहिण्यासारखे नाही)

ह्या दोघान्मुळे या "BB" वर खुप मनोरन्जन होत आहे हे मात्र तितकेच खरे चालु द्या
... Next


Kedarjoshi
Monday, September 04, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"बहु"नी मे व्यतीतानी
जन्मानी तव "चार जून
LOL.

कुलकर्णी त्या वाक्याचा अर्थ लागलेला आहे.
दोन पंडीत आपाआपसात भांडत होते की अर्जुनाचा जन्म कधी झाला. मग त्यांचे एक मत झाले की चार जुन ला.
बाकी चालुद्या.


Zakki
Monday, September 04, 2006 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की आणी लिम्बु भो ह्या लोकान्ना भारत माता कि जय पेक्षा सोनिया माता कि जय म्हणायला भुषण वाटत, असले शेळ्पट आणी गद्दारान्ची आपल्या ईतिहासात आणी वर्तमानातही काहि कमी आहे काय?

अहो च्यायला, माझे नाव यात का गोवता? मला सोनिया काळी का गोरी? नक्की कोणाची बायको, राजिव का संजिव? ती कुठल्या पक्षाची आहे (सध्या), ती मुसलमानांच्या बाजूने की विरोधी? वगैरे काऽहीहि माहित नाही. माहित करून घेण्याची इच्छा पण नाही. तिचे नाव मी कुठेच लिहिले नाही. तर तिची जय होवो वा न होवो, मला काऽहीहि देणेघेणे नाही.

शिवाजि महाराजाना पण विरोध असल्या तत्वान्नीच केला होता जयचन्द म्हणजे यान्चा खरा आदर्श, देशाला तो शापच आहे. पण या लोकान्ना एक लक्षात येत नाही भारत असल्या सापान्ना ठेचुन आणी पुरुन उरला आहे.

मी इथे येणार्‍यांत सर्वात वयोवृद्ध असेन, पण इतका मोठा नाही की श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी त्यांना विरोध करत होतो! नि जयचंद ला मी आदर्श कशाला ठेवू? त्याच्या नावाव्यतिरिक्त मला काऽही पण माहीति नाही!

आणि अहो असल्या सापांना तुम्ही कधी ठेचणार? पुढल्या शतकात? हेच तर माझे मत आहे की तुम्ही ठेचाल, कुणा सर्पांना, पण तेव्हढी जनजागृति व्हायला कमालीच्या बाहेर उशीर होतो आहे!


तुमची काळरेषेमधे गुंतागुंत होत आहे. मी शिवाजीच्या वेळी नव्हतो. नि असे सर्वमान्य आहे की राजिव व सोनिया यांच्या हजारो वर्षे पूर्वीच गीता सांगीतली होती. गीता म्हणजे तुम्हाला Nostradamus वाटते का, भविष्य सांगणारी? तसे चार जूनला अजूनहि काही काही झाले. त्याचा गीतेशि विनोदाने सुद्धा संबंध नाही! तुम्ही गीता वगैरे चे नाव काढू नका, ती समजणे, त्यावर विनोद करणे, हे सुद्धा ऐर्‍या गैर्‍याचे काम नव्हे.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators