अलख निरंजन दारात क्षणांच्या थांबुन, भिक्षांदेही बोलावे झोळीत पडावे जे जे, ते गोड मानुनी घ्यावे माथ्यावर वात्सल्याची शीतलशी छाया नाही अन अस्तित्वाची अवनी तलखीने लाही लाही हृदयांच्या गावोगावी मृगजळ शोधाया जावे ते ही न गवसता हासुन ओंजळभर अश्रू प्यावे येणारा फकीर होता, जाणारा फकीर आहे तो आला आणिक गेला कोणाला फिकीर आहे? दिवसांच्या धुळीसवे तू वर्षांच्या क्षितिजी जावे क्षितिजे ओलांडत जाता मागे ना मुळी पहावे मग एका दारी वेड्या बळ सरेल तव पायीचे ते अंगण येता ओझे होईल तुला झोळीचे हा क्षण यजमान खरा हे त्या क्षणीच ध्यानी यावे त्या दारी भिक्षा मिळता मन अलख निरंजन व्हावे मन अलख निरंजन व्हावे ... अलख निरंजन !!!
|
Ninavi
| |
| Monday, July 17, 2006 - 8:06 pm: |
| 
|
' दारात क्षणांच्या..' वा, एकदम touching कल्पना आहे वैभव. बरेच दिवसांनी आलात. सुंदर आहे कविता. झाड, ' हात जोडणंही तूच ठरवावंस..?' यात तक्रारीचा सूर नाही ना? तुझ्या कविता नेहेमीच थोडं बोलून बर्याच विचारात पाडतात. मीनू, मृद्गंधा, सोनल, नीरू.. छान गं.
|
Sarang23
| |
| Monday, July 17, 2006 - 11:05 pm: |
| 
|
वा! वैभवा... जीएंची आठवण झाली!!!
|
Sarang23
| |
| Monday, July 17, 2006 - 11:25 pm: |
| 
|
भाग्य तुझ्या वागण्याला नसे चाल रीत चुकती प्रेषित तुझ्यामुळे ज्याचा त्याचा भाग ज्याचा त्याचा वाटा संपताच साठा खेळ थांबे! कुणी नसे सान कुणी नसे थोर सगळ्यांचा भार ठरलेला वेळ जाहलेली सुटला सय्यम बनलो माध्यम पापासाठी कितीतरी वेळ झुंजवीला काळ शेवटचा आळ साहवेना ठरलेली चूक तिचा नको रोष नशिबास दोष कशासाठी? म्हणून सांगतो नसे ही अहंता साधुची महंता सांगू नये सारंग
|
Sadda
| |
| Tuesday, July 18, 2006 - 1:20 am: |
| 
|
हाय मंडळी..तुमच्या येवढ्या सुंदर कवीतांमधे माझी हि १ कविता देत आहे आवडते का पहा 
|
Meenu
| |
| Tuesday, July 18, 2006 - 2:03 am: |
| 
|
वैभव अलख निरंजन या शब्दाला काही specific अर्थ आहे का ..?. मला माहीत नाही म्हणुन विचारते .. श्रद्धा छान
|
Mruda
| |
| Tuesday, July 18, 2006 - 2:06 am: |
| 
|
वैभव.. खुप दिवसांनी आलास... पावसा सारखा तूही गायबच झाला होतास की.... नेहमीप्रमाणे सुंदर लिहील आहेस.... सत्य आहे पण तयात कुठे तक्रार नही.... समर्थांच्या "कृपाळुपणे अल्प धारिष्ट्य पाहे" ची आठवण झाली...
|
दिवसांच्या धुळीसवे तू वर्षांच्या क्षितिजी जावे क्षितिजे ओलांडत जाता मागे ना मुळी पहावे >>>>.वैभव मला ह्या ओळी जास्त आवडल्या. आणि आज मी तुझी कविता कुनितरी अठवण काढतय मरठि blogs वर सोनल ह्या id ने तेच्या blog वर टाकलेली वाचली, शिवाय काल एका तीथल्याच प्रसाद म्हणुन id च्या blog वर वाचली दोन्ही ठिकाणी तुझे नाव नाहिये.. पहिल्याच पानावर आहे.. बघ.!!!
|
लोपा ... माहितीबद्दल धन्यवाद ... मला त्याची लिंक मेल करशील का ? this is quite discouraging
|
सारंगा खास ... चर्चा होईलच नेहेमीप्रमाणे .. मीनू मेल करतो
|
वैभव मस्तच रे.. सारंग कवितेचे चौथे आणि पाचवे कडवे.. .. मेल करशील का अर्थ..??
|
Giriraj
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:46 am: |
| 
|
वैभव,खूप दिवसांनी.. 'सत्र' इकडे नव्हती का रे टाकलीस? अलख निरंजन खास! सारंगराव... माया पातळ केली राव! प्रत्येक ओळ ज़बर्दस्त...
|
Misonal
| |
| Tuesday, July 18, 2006 - 6:44 am: |
| 
|
Alakh Niranjan Sunder.. Meenu, Anuwad kelyabaddal aabhar. nirmiti awadali.
|
Manasi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 6:54 am: |
| 
|
बाप रे १५ दिवसानी आले तर कवितान्चा धुन्वाधार पाऊस पडला आहे. फारच मजा आली. मृद्गन्धा तुझ्या सगळ्याच कविता सुन्दर आहेत. मीनु, निनावी, मृदा, लोपा,सारन्ग, नादमय, वैभव सगळ्यानीच छान लिहीले आहे.
|
Vaibhav, बर्याच दिवसांनी छान कविता टाकलीस.. अल्लख निरंजन. पण मला दुसर्या आणि तिसर्या कडव्याच्या मानाने पहिले कडवे जरा गुळगुळीत आणि पसरट वाटले. -बापू
|
mrudagandhaa kavitaa khup aavadali, malaa pratikriyelaa tujhyaa itake chaan shabd naahii saapadat!!! sarang kavitetlaa kaahi bhaag kalalaa naahi.
|
Ninavi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 2:37 pm: |
| 
|
सारंगा, मस्तच रे. मृद्गंधा, keep it up .
|
Yog
| |
| Tuesday, July 18, 2006 - 2:47 pm: |
| 
|
Vaibhav, अलख निरंजन कविता सुन्दर आहे..
|
ते अंगण येता ओझे होईल तुला झोळीचे >>> वैभव, सहीच!! मोहरते मातीतून अत्तर अन नीळा मनमोर नाचू लागतो>>>> सही कल्पना!
|