Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
कविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 28, 200620 06-28-06  12:54 am
Archive through June 29, 200620 06-29-06  8:13 am
Archive through July 01, 200620 07-01-06  3:21 am
Archive through July 06, 200620 07-06-06  1:14 am
Archive through July 09, 200620 07-09-06  2:32 am
Archive through July 11, 200620 07-11-06  3:23 am
Archive through July 12, 200620 07-12-06  8:09 am
Archive through July 13, 200617 07-13-06  5:15 am
Archive through July 14, 200619 07-14-06  8:23 am
Archive through July 17, 200620 07-17-06  9:51 am
Archive through July 18, 200619 07-18-06  9:52 pm
Archive through July 19, 200620 07-19-06  8:55 am
Archive through July 19, 200618 07-19-06  11:03 am
Archive through July 20, 200620 07-20-06  3:34 am
Archive through July 20, 200620 07-20-06  4:25 pm
Archive through July 21, 200620 07-21-06  4:05 pm
Archive through July 24, 200620 07-24-06  10:59 pm

Kandapohe
Monday, July 24, 2006 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडते कान्दा-पोहे नक्कीच खाऊ घालीन! >>
बापू, धन्यवाद!! कांद्या ऐवजी दडपे मिळतील का? ते जास्त आवडतात मला.


Prasad_shir
Tuesday, July 25, 2006 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घारुअण्णा, KP , बापू, Saconchat , आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार!

Saconchat, TRP म्हणजे Television Rating Points कुठलं चॅनल कोण किती वेळ बघत आहे याचा एक सर्व्हे होत असतो यावरून हे TRP मिळतात म्हणे. आणि प्रत्येक चनलचं जाहिरातीचं उत्पन्न या TRP वर आधारित असतं. त्यामुळे अर्थातच जास्तित जास्त 'मसालेदार' गोष्टी दाखवून TRP आणि पर्यायाने उत्पन्न वाढवणं यासाठी सगळ्या चॅनेल्स मधे मारामारी सुरू असते.

बापू,

तुमचे सर्व विचार पटण्यासारखेच आहेत. मात्र वाहिन्यांनी सकारात्मक व्हावं यासाठी आपण खरंचच काही करू शकू असं मला वाटत नाही. त्यांच्या दृष्टीनी घसरलेल्या चोळ्या, बहकलेली चुंबनं आणि अडकलेले प्रिन्स सगळ्यांची किंमत एकच असते. जितकी जास्त सनसनाटी गोष्ट तितकं चांगलं... तुमच्या माझ्या सारखे 'मौनी' फारफारतर चॅनल बदलतील किंवा TV बंद करतील... पण आपण बहुमतात आहोत असं मला वाटत नाही! जोवर TV ची खुळ्यासारखी पूजा करणारी अपार जनता आपल्या आजूबाजूला आहे तोवर हा सर्व मूर्खांचा बाजार असाच चालू रहाणार...


Zaad
Tuesday, July 25, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, बापू, अमेय, निनावी, विकास... सगळ्यांनी खूपच सही लिहिलंय.


Dineshvs
Tuesday, July 25, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे माझ्यासारखे विचार करणारे खुप जण आहेत, हे बघुन मला बरे वाटले.
आणि हा TRP कृत्रिमरित्या वाढवला जातो, हे तर ऊघड सत्य आहे. जर तुम्हाला सांखिकी नमुन्यातल्या प्रत्येकाचा पत्ता मिळाला, वा तुम्हालाच तो नमुना निवडता आला, तर यात काय कठीण आहे ?


Ashwini
Tuesday, July 25, 2006 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, सुरेख कविता. सगळ्या अजून वाचल्या नाहीत. पण निनावी, वैभव नेहमीप्रमाणेच सुंदर.

प्रसाद, बर्‍याच दिवसांनी? किंवा मी तुझी कविता बर्‍याच दिवसांनी वाचली असं म्हणणं योग्य ठरेल. खूप दिवसात तुझी गझल वाचली नाही.


Chinnu
Tuesday, July 25, 2006 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विकास छान रे.
निनावी, कागदी राजकुमार आणि आधीची ती चुरगाळलेली चादर निराशेचा सुर दावते. काय झाले ग बाई?
बापु डोळे फार सही. प्रसाद खुप छान.
अमेय उच्च लिहिलस, अगदी आतुन वगेरे उमाळे आलेले दिसत आहेत!
केप्या पुण्याला सांभाळुन जा, उगीच पडलास कुठल्या खड्ड्यात तर तु काय प्रिंस आहेस लगेच धावाधाव करायला! कुठे भोकं पडली तर दिवे घेउन टाक रे. :-)


Zaad
Wednesday, July 26, 2006 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून मला तरी मी
कुठे समजलोय?
आणि तुला जो समजलोय ना
तो तर केवळ एक थेंब आहे समुद्राचा.
जाताना तेवढाच फक्त जपून ने
पापणीत.
पुढे कधी आटलोच तर
तुझ्याकडून मागून घेईन...


Devdattag
Wednesday, July 26, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ताच सगळ्या कविता वाचल्या..
बापू, प्रसाद, निनावि, मीनु, झाड सुंदर कविता आहेत..

कोसळली उल्का
पडला खड्डा
दुंभगली धरती
लोकांची आरती
गोष्टी वेल्हाळ

आगीचा लोळ
हल्लकल्लोळ
पसरट विवर
मनाचा सावर
क्षणैक काळ

संपली गाणी
खारट पाणी
अनेक शब्द
तरिही स्तब्ध
उजाड भाळ


Meenu
Wednesday, July 26, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा चांगलं लिहीलं आहेस रे ..

Meenu
Wednesday, July 26, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपकार

नव्हता एकदा स्वेटर तेव्हा,
थंडी मुळी वाजली नाही ...
लाचारी चेहर्‍यावर मुळीसुद्धा दिसली नाही
जगण्याची जिद्द मी बघितली असली नाही ..
नव्हता रेनकोट तेव्हा,
अंग जणु भिजत घातलं ...
कुणाच्या रेनकोटनं ना कधी मोहात पाडलं
परीस्थितीनच असं मोहाला गाडलं ...
नव्हत मनपसंत खायला तेव्हा,
तोंडाला पाणी सुटलं नाही
कुणी दिलं तरी चव घ्यावं असं वाटलं नाही
हे कुणाकडुनही कधी शिकावं लागलं नाही ..
नाही दिलास अन्न, वस्त्र, निवारा
त्याची ही आठवण नाही कडु ...
स्वाभीमानाची देणगी दिलीस,
त्याचे उपकार कसे फेडु ...?


Chinnu
Wednesday, July 26, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु classic one! खुप खुप सुंदर..
देवा तुला काय बक्षिस हवे ते घेवुन टाक. मला तर जाम आवडल्या त्या इवल्या इवल्या पाच ओळी!



Pkarandikar50
Wednesday, July 26, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Meenu,

अगदी खरय. स्वभिमानापेक्षा जास्त मोलाचा कोणता गुण असू शकतो, किंवा देणगी?

-बापू.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators