Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 15, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » काव्यधारा » झुळुक » Archive through March 15, 2006 « Previous Next »

Ninavi
Tuesday, March 14, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दांमधल्या रिक्त जागा
वाचण्यातच रात्र सरली
आणि मग मजकूर वाचायची
गरजच नाही उरली..


Jaaaswand
Tuesday, March 14, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त गं निनावे :-)

तुझ्या धाकधुकीला नेहेमीच
चांदण्यांचा छंद आहे
श्वास तुझे जपून ठेव त्यांना
कस्तुरीचा गंध आहे

जास्वन्द...


Shyamli
Tuesday, March 14, 2006 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीनावी काय सुन्दर लिहितेस ग!

Ninavi
Tuesday, March 14, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसचं.. कसचं..
नाही, नाही, सगळेच चांगले लिहीत असतात तेव्हाच असं सुचत जातं.

आणिहे काय श्यामली, चारोळीला उत्तर चारोळीच हवी. नुसतं कौतूक नाही.

माझी पत्रं कोरी नाहीत..
मायना लाजेने पुसट झालाय
मजकूर..
त्याची आपल्यात कधी गरजच नव्हती..
आणि खरं सांग,
पाकीट उघडताक्षणीच
तुला आला होता ना गंध
' फक्त तुझीच' फुलतानांचा..


Shyamli
Tuesday, March 14, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी फक्त तुझीच असं
मनाताच म्हणत होते
तुझ्या गीतांमधे मात्र
दुसरेच सुर होते

श्यामली!!!


Shyamli
Tuesday, March 14, 2006 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरीही......
कधीकधी सुर निघतात
माझ्याही ओळखीचे
त्यालाच म्हणते मी
गाणे माझ्यासाठीचे

श्यामली!!!


Jaaaswand
Tuesday, March 14, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह निनावी..वाह..
खरच मजा आली..मस्त लिहिलयेस..
हे एवढे काही जमत नाही बुवा आपल्याला पण काहीतरी लिहितोय
बघा हं

माझ्या पत्रात मजकुराचा
कसलाच कधी नेम नसतो
तुझ्या पत्रात " तुझीच " नंतर
पुसलेला एक थेंब असतो

श्यामले..खास तिकडच्या वाळूच्या Touch मधलं काही येऊ दे :-)


Mavla
Tuesday, March 14, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पत्र कोरिच होती...
शब्द डोळ्यात, तु पत्रात वाचत होती,
नाहीच कळली तुला कविता
जी मेघदुतात साचत होती,
तु कोरडीच राहिलीस तिथे
जिथे मी अश्रुन्नी फुले वेचली होती.



Shyamli
Tuesday, March 14, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहीत असत मला की तु
फक्त "तुझीच"ला गोंजारणार
हळुच माझ्या शब्दांवर
हळवे ओठ उमटणार

श्यामली!!!



आधिच तेच तेच होतय का?


Manuswini
Tuesday, March 14, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवस संपता संपत नाही रात्र ही जागुन जाई
तुझ्याविना आता मला काहिच सुचत नाही
एकची प्रश्ण पडे मजला तुला ही होते कधी असे काही
की मी एकटी वेडी तुझी आस लावून वाट पाही

-वेडी


Manuswini
Tuesday, March 14, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक एक क्षण एक एक दिवस मी मोजत होते,
अश्रुंना ही मी अशीच समजावत होते
हा दिवस गेला उद्या ही जाईल
तरीही दिवस संपता संपत न्हवते


फिरुनी येतो तोच दिवस, रोज तोच ध्य्यास
आज ही असाच जाईल संपेल एक दिवस
कशी समजावु अश्रुना रोज किती दिवस
आता तेच थांबता थांबत न्हवते
-वेडी


Nilyakulkarni
Tuesday, March 14, 2006 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला आता जमवायला हव
अश्रुंना आवरायला
पावलं माझी वळनार नाहीत..
सखे तुला सावरायला.....


Nilyakulkarni
Tuesday, March 14, 2006 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"प्रिय , .... " लिहीताना हात
थरथरलेला दिसतोय...
तुझीच " च्या आधीचा " फ़क्त ..."
चिंब भिजलेला वाटतोय


Adityaranade
Wednesday, March 15, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवसा असे विचारी विचारी कोंडाळे
त्या रात्री मात्र मी, माझी आतली, पोकळी कवटाळे
पटल स्म्रुतींचे सरते, मागे पुढे सारे वळते
त्या तिथे दिशाहीन रानी, शून्य मला उलगडते

घालावी कुणी खूर्-मांडी, अन नाक मुठीत धरावे
न कळे मला, तरीही कसे हे, गूढ उमजून जावे

कधी कधी रात्र अशी मिळावी
मनाचा पारवा नागवा करुनि जावी


Nilyakulkarni
Wednesday, March 15, 2006 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेडे शब्द भाबडे प्रश्न...
सार सार तेच आहे
ती काळजी ती ओढ..
घालमेल ही तीच आहे



Jo_s
Wednesday, March 15, 2006 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उन्हाची आग, पावसाचा पूर
हिवाळाही अती थंड
हे का निसर्गाचं बंड?


Jo_s
Wednesday, March 15, 2006 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण जाणे
काय तुझ्या मनात
पत्र तुझच, मजकूर तुझाच
मी, फक्त पत्त्यातल्या नावात


Manuswini
Wednesday, March 15, 2006 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवस नी दिवस मी झुरुन जाई
तरीही आस मनी उरुन राही
कधीतरी तुला मी आठवते का रे? ..
का खोटी ही आस तुटे जसा जसा दिवस सरे


Shyamli
Wednesday, March 15, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा मनु....काय ग?

Manuswini
Wednesday, March 15, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय श्यामली काय ग मी तुझीच वाट पहात होते खरे ग login ही केले

तुला काय intution झाले का ग?

आज दुर कुठे कुणी तारा अश्या छेडल्या

असे आहे आज :-) gmail वर ये ना


Shyamli
Wednesday, March 15, 2006 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा एकट वाटल की
आधार शोधतो जीव
अश्यावेळी तरी तुला
येत नाही का रे माझी कीव

श्यामली!!!


Jaaaswand
Wednesday, March 15, 2006 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राईतली भेट, बकुळीचे फ़ुल
राहून राहून आठवत आहे
तेव्हाचा हुंदका मोती होऊन
रुमाल माझा भिजवत आहे

जास्वन्द...


Devdattag
Wednesday, March 15, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तुमच्या चारोळ्यांवरून मी इथे टाकलेली जूनी कविता आठवलि..

गौर नार देखणि
उभी करुनी श्रुन्गार
हाय घरि ना
तिचा अजुनि भर्तार

नजर तिचि स्थिर
नयन पाणिदार
उडे ध्यानी ना
पदर तिचा हिरवागार

कातरवेळ जाहली
सय एकमेव साथिदार
दाटे कंठ कधिचा
नयनि अश्रु अनिवार

रण सम्पले कधिचे
इकडुन वेळ जाहली फ़ार
कुजबुजती कानी कोणी
होता शूर फ़ार सरदार


Chingutai
Wednesday, March 15, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थरथरत्या पापणीने
चिंब भिजविले शब्द
आणि अर्थ त्या मजकूराचा
डोळ्यात तरळू लागला


Jo_s
Wednesday, March 15, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कीव परक्याची करतात
आपल्या माणसाची काळजी करतात
म्हणूनतर एकटं असो वा समुहात
आपल्या माणसाना नेहमीच स्मरतात





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators