प्रशासन
मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!
जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.
भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.
एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.
पनवेल मधील मुस्लीम बांधवांचे अभिनंदन
शासनाने आणि माननीय कोर्टाने सर्व धर्मीयांना त्यांच्या सगळ्या प्रार्थना / उत्सवादरम्यान आवाज निंयत्रित करण्याची आणि इतरांना त्रास होणार नाही अशा शांततेत उत्सव साजरा करण्याची विनंती / आवाहन केले होते.
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आमच्या गावातील सर्व मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सदरच्या आवाहनाला प्रतिसाद देत पनेवलमधील सर्व मशिदींवरील बाहेरचे भोंगे (मराठीत स्पीकर्स) उतरवण्याचे मान्य केले आहे.
या अतिशय स्तुत्य निर्णयाबद्दल, पनवेलमधील सर्व मुस्लीम बांधवांचे मनापासुन अभिनंदन आणि धन्यवाद.
तडका - सत्य
तडका - मी पण
तडका - समाजामध्ये
तडका - नशिबाची हंडी
तडका - लोकहो,...
तडका - मुसळधार पाऊस
सरजी,...
---------- सरजी --------
शाळा आणि कॉलेज सह
जगण्यातुनही शिकतो आहोत
जेव्हा-जेव्हा आठवेल तेव्हा
सरजी तुम्हाला घोकतो आहोत
आपली शाळा अन् कॉलेजही
हल्ली मनामध्ये भरतंय
तुमच्या एका-एका आठवणीनं
मन पुन्हा पुन्हा स्फूरतंय
ते दिवस भुतकाळी असले
तरी वर्तमानात भारी आहेत
अन् आमचे भविष्यकाळही
त्यांच्याच तर दारी आहेत
तुमच्या ज्ञानाची पुरचुंडी
अजुनही पुरली आहे
सगळ्यांना वाटत आलो तरी
अजुनही तेवढीच उरली आहे
दिलंत तुम्ही ज्ञान असं
जे वाटल्यानं वाढतं आहे
ओथंबलेल्या माणूसकीनं
माणसांना माणूस जोडतं आहे
ज्याच्या-त्याच्या पध्दतीनं
जो-तो गुरूजी सांगतो आहे
प्रत्येक-प्रत्येक यश संबंध
Pages
