Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 17, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » सारेगमप आणि इतर shows मधले performances . » Archive through October 17, 2007 « Previous Next »

Ajai
Monday, October 15, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा BB वाचुन final episode पाहिला. अगदिच सुमार वाटले performances . बहुतेक सगळे लिप्-सिन्क वाटत होते. खासकरुन क्लोज्-अप मधे. विशाल शेखर चा performance live होता. that too not close to vishal's rock permonances for Pentagram. search for pentagram at youtube and you will agree with me.

Princess
Monday, October 15, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजाचा बेस्ट परफॉर्मन्स म्हणजे मेरी जिंदगी एक प्यास... खतरनाक गायला. तसे त्याचे सगळेच परफॉर्मन्स मला आवडलेत पण मेरी जिंदगी म्हणजे एकदम जबरदस्त.

Zakasrao
Monday, October 15, 2007 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक सगळे लिप्-सिन्क वाटत होते.>>>>>
अरे हो. मी विसरलोच की हे.
इतक्या उड्या मारमारुन आणि इतकी गाणी म्हणुन चुकत कस नाही??????
मला तर ते आधी रेकॉर्डिंग करुन नंतर टॅप लावली आहे असच वाटल.


Sameerdesh
Monday, October 15, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झी मराठी वर मराठी सा रे ग म प चे तिसर्‍या पर्वाची अंतिम फेरी सुरु होइल.

दर सोमवारी व मंगळवारी मराठी सा रे ग म प चा एक भाग असतो. पल्लवी जोशी संचालन करते. नेहमीचे परीक्षक म्हणून अवधूत गुप्ते व देवकी पंडित असतात. पाहुणे परीक्षक म्हणून एखाद्या प्रसिद्ध कलाकाराला बोलावतात. यात अरुण दाते, आशा खाडिलकर इ. बरेच मोठे कलाकार येऊन गेले.

पहिल्या पर्वात मंगेश बोरगावकर चांगला गात होता. पण केवळ sms च्या आधारे निकाल ठरवल्याने मागे पडला.

दुसर्‍या पर्वात सर्व पडद्यावरचेच कलावंत - सिने - नाट्य - मालिका इ. - असल्याने काही खास मजा आली नाही.

सध्याच्या पर्वातील अंतिम फेरीतील गायक - गायिका चांगले वाटतात. अंतिम फेरी आधी एक call-back episode घेतला होता. आधीच्या फेरीत बाद झालेल्यांना एक शेवटची संधी असा प्रकार होता. पाहुणे परीक्षक म्हनून पद्मजा फेणाणी - जोगळेकर होत्या. त्या छान माहिती देत होत्या. मागील सोमवारी व मंगळवारी किशो अगडे चे गाणे चांगले झाले. त्यामुळे तो अपेक्षेप्रमाणेच अंतिम फेरीत पोहोचला. पण मंगळवारी बाजी मारली ती अनिरुद्ध जोशी आणि सुमीत अय्यर यांनी.

हे तिसरे पर्व एकूणच चांगले चालले आहे असे वाटते. स्पर्धक गायक - गायिकांचा दर्जा पहिल्या पर्वापेक्षा चांगला वाटतो. स्पर्धेत काही themes पण चांगल्या होत्या. उदाः एकाच कलाकाराची गाणी ( हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे इ. ) , एखाद्या विषयावरील गाणी ( स्वप्ने इ. ) . यात एक चांगला प्रकार ऐकायला मिळाला - गाण्याचा बदललेला ताल ओळखून बदललेल्या तालात गाणे म्हणणे. म्हणजे एखाद्या गाण्यात झपताल प्रामुख्याने असेल तर ते गाणे त्रितालात म्हणणे.

आता आजपासून अंतिम फेरी सुरु होत आहे. बघू कोण जिंकते ते.


Ajai
Monday, October 15, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sameerdesh - aadhichyaa pherit bahutek sagalyaa mulich nivadalyaa gelyaane call back che naatak karun 3 mulaanaa final laa pochavale ase mhatale tar?

Prajaktad
Monday, October 15, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक सगळे लिप्-सिन्क वाटत होते
इतक्या उड्या मारमारुन आणि इतकी गाणी म्हणुन चुकत कस नाही??????
>>>येस! live (चा)फ़क़्त शो असतो... contestant ची गाणी prerecorded असतात त्यांनी फ़क़्त लिप्-सिन्क करायचे असते.... मोठ्या शो मधे नविन गायकांवर एवढी रिस्क कुणी घेत नाही... जजेसचे performance live होते... विशाल्-शेखर चा मस्त झाला otherwise सगळीच बोंब होती. हिमेशचा आवाज कसला फ़ाटत होता!!

Sameerdesh
Monday, October 15, 2007 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय , मला तर काही वावगे वाटले नाही. call back episode मध्ये किशोर अगडे, अनिरुद्ध जोशी, सुमीत अय्यर यांची मंगळवारची गाणी खरोखरच मस्त झाली.

अनिरुद्ध जोशी चे गाणे मी आधी दूरदर्शन वरील महाराष्ट्र संगीतरत्न मध्ये ऐकले होते आणि प्रत्यक्षात पण ऐकले होते. त्याचे गाणे चांगलेच आहे. आधीच्या भागात केवळ गाण्याची निवड चुकल्याने तो बाहेर गेला असे वाटते.


Chinya1985
Monday, October 15, 2007 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी सारेगामापा काही पटल नाही इतक. गायक खास नव्हते. ती जजबाई तर सर्वच गाण्यात चुका काढते. आणि स्वत्: फ़ार चांगल गाण म्हणते असही वाटल नाहि.

विशाल शेखर आणि लाडु बप्पि चांगले जज होते हिंदित. हिम्या मी शो पहायचो तेंव्हा ठीक होता पण सगळ्यात डोक्यात जायचा तो इस्माईल दरबार. एकदा तर कोणीतरी मेट्रोचे अलविदा गाणे म्हतले. गायकाने काही बरोबर म्हटले नव्हते पण दरबार म्हणाला 'यार ये गाना बहुत अजिब है' . वास्तविक पहाता अतिशय सुंदर गाणे आहे ते. पण ते गाण दरबारला समजलच नसेल बहुतेक. आणि हे म्हणे जज???


Tiu
Monday, October 15, 2007 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जजबाई = देवकी पंडीत

चुका काढणारच ती. क्लासिकल शिकलेल्या माणसाला गाण्यातल्या छोट्या चुकासुद्धा लगेच समजतात. ज्या तुमच्या-आमच्यासारख्यांना लक्षातही येत नाहीत!


आणि स्वत्: फ़ार चांगल गाण म्हणते असही वाटल नाहि.
>>
हे काही पटलं नाही! कुठल्या गाण्याबद्दल बोलतोयेस तु?

पण ते गाण दरबारला समजलच नसेल बहुतेक. आणि हे म्हणे जज???
>>
हे पटलं! :-)

Ajai
Tuesday, October 16, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय , मला तर काही वावगे वाटले नाही.>>
Sameerdesh
कॉलबॅक आधि ७ मुलि आणि १ मुलगा अशि situation होती. अशात तो कार्यक्रम so called महाअंतीम फेरि पर्यंत सर्वसामान्य प्रेक्षकानी (म्हणजे माझ्या सारख्या)पाहिला असता का याचि शन्का आहे.
आता तर काय judges मधे पण स्पर्धक विभागलेत म्हणजे अजुन आण्ख़्हि SMS आणि TRP


Deepanjali
Tuesday, October 16, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पहा सारेगमप community वर आलेली news,
इस्माईल ने अनीक ला media समोर not deserving म्हंटल्यानी बरेच वादळ उठलय .
http://www.chhotikashi.com/largephoto.asp?id=754

Mepunekar
Tuesday, October 16, 2007 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे rediff.com वर आलेल article about HR :-)
http://www.rediff.com/movies/2007/oct/16aneek.htm

Deepanjali
Tuesday, October 16, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HR sucks :-)
काय तो ड्रामा , उगीच काय तर म्हणे राजा मोठा आहे etc...
शिवाय अनीकने राजाच्या पाया पडण्याचा ड्रामा काय मधेच ..sooooo fake !! .
अनीक पण येडाच ... प्रत्येक actress बरोबर मजनुगिरी आणि HR ला जिंकल्यावर म्हणे , I love u sir


Chinya1985
Tuesday, October 16, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि स्वत्: फ़ार चांगल गाण म्हणते असही वाटल नाहि.
>>
हे काही पटलं नाही! कुठल्या गाण्याबद्दल बोलतोयेस तु?
टीउ,तिचा आवाज कर्कश्य आहे अस नाही का वाटत तुला. मी जेव्हढ्या लोकांशी बोललो त्या सर्वांना तर असेच वाटत होते.

Deepanjali
Tuesday, October 16, 2007 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पहा ,
इस्माईल ने star news ला दिलेली मुलाखत !!
इस्माईल irritating आहे पण त्याचा मुद्दा एकदम बरोब्बर आहे

Anyways, अता next year इस्माईल star voice of india मधे घुसणार हे नक्की !
http://www.saregamapachallenge2007.com/controversy-revolving-around-aneek-dhars-victory.html/2


Anagha_vw
Tuesday, October 16, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी सारेगमप चा कालचा भाग (सोमवारचा) कुठे बघायल मिळेल? आजचा भाग बघितला का कोणी? मला एक विचारायच होत, यात सगळ्यान्चाच मेक ओव्ह्र करतात कि काय? सुरेश वाडकरान्चा पण?? आणि काय ते गायकान्चे कपडे? मुलि तर फ़ारच हास्यास्पद वाटत होत्या.

Nandini2911
Wednesday, October 17, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर कुणीतरी गजेंद्र सिंग नसल्यामुळे सोनु परत सारेगामापा मधे आलाय असं लिहिलं आहे.
सोनु निगम आणि गजेंद्र सिंग अजूनही चांगले मित्र आहेत. गजेंद्रसिंगने दुसरं लग्न केल्यावर त्याला फ़क्त सोनु आणि अनु कपूरनेच मदत केली.
सारेगामा (जुना) हा सुंदर प्रोग्रॅम होता. त्यामधल्याच आयडीया आता झी टीव्ही वापरत आहे. नवीन काही नाही.
संगीत का प्रथम विश्वयुद्ध असं नाव देण्या आधी oversees च्या स्पर्धकाची एक स्पर्धा झाली होती. ज्यामधे UK चा एक मुलगा जिंकला होता.
सोनुने सारेगामा सोडले त्याचे मुख्य कारण त्याची चरसीगिरी होती. सुदैवाने तो यात जास्त वहावला नाही आणि लव्करच बाहेर आला. याचकाळात त्याची बायको पण त्याला सोडून गेली होती.
सोनु आणि शान दोघंही जितक्या easily निवेदन करतात. तितकं आदित्यला जमत नाही. आणि तो प्रयत्नही करत नाही. सतत किंचाळल्यासारखा बोलतो.
परवाच्या live प्रोग्रॅममधे सर्वचजण confuse असल्यासारखे वागत होते. स्पर्धक पाठी जजेस पुढे.. एकदातर अनिक बोलत असताना आदित्यने त्याच्या हातून माईक घेतला. :-)
राजाला धड बोलायलाच दिले नाही. जरी कार्यक्रम लाईव्ह होता तरी सूत्रसंचालक आणि जजेसनी याची तयारी करायला हवी होती.


Sayonara
Wednesday, October 17, 2007 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ते finale बघितल्यावर जाणवलं की final results आधी इतके तास बडबड करत वाया घालवतात आणि एकदा का रिझल्ट्स डिक्लेअर झाले की घाईघाईने सगळं wind up करुन मोकळे होतात. तो अनिका शेवटी जे काय गाणं म्हणात होता त्यात कुणालाही interest नव्हता. पुढच्या वेळेपासून झी ने mentors म्हणून हिमेश आणि इस्माईलला बाद करुन कुणीतरी sensible आणावं हे बरं.

Mansmi18
Wednesday, October 17, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी सारेगमप मधे मजा आलि नाही. एकदम impressive वाटावे असे कोणीच नाही.

मला अजुनही वाटते कि judges मधुवंती बोरगावकर आणि सायली पानसे(आरती अंकलीकर ची शिष्या) याना झुकते माप देत आहेत.

आतपर्यंत फ़क्त "वैशाली" consistent आहे असे मला वाटते.

माझ्या मते बाहेर जाणारे:
immediate
१. चैतन्य
२. मधुरा कुम्भार

after 2/3 episodes
३. करम्बेळकर - (ही फ़क्त शोभा गुर्टुची गाणी नीट म्हणते).
४.किशोर-(दुसरा ज्ञानेश्वर)
६.मधुवंती बोरगावकर(जायला हवी पण जाणार नाही कारण judges चे झुकते माप)
७.सायली पानसे
८. जाइ-(चान्गली म्हणते पण कालसारखे performance दिल्यास बाहेर).

finals
वैशाली
अनिरुद्ध
अय्यर


Tiu
Wednesday, October 17, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेश वाडकरांच्या डोक्यावर अचानक इतके केस कसे काय आले?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators