निसर्ग foolproof नाहि असं मला वाटतं त्याला बरीच कारणं आहेत .. त्यातलं एक आज लिहायचा प्रयत्न करते ..
Natural calamities .. दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, भूकंप, tornados, typhoons, tsunamis etc., का घडतात? मी बर्याच वेळा ऐकलं आहे की ही निसर्गाची स्वतःचा balance राखण्याची तर्हा आहे .. माणसाने ज्या प्रकारे निसर्ग exploit केलाय आणि ह्यामुळे जो imbalance निर्माण झालाय तो control करण्यासाठी ह्या calamities घडतात .. पण मग ह्यात प्राण मात्र किती निष्पाप लोकांचेही जातात ना? त्यात बळी जाणार्या सर्वांनीच निसर्गाचा अवमान केलेला नसतो .. ओल्याबरोबर सुकंही जळतं, असंच काहितरी होतं .. पण जर निसर्ग किंवा पर्यायाने देव almighty आहे, just आहे, foolproof आहे, तर ज्यांच्या हातून चूक घडलीये त्यांनाच आणि फ़क्त त्यांनाच शिक्षा व्हायला हवी .. निसर्गाचा असा न्याय चुकीचा नाहि का?