आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ बोकलत,
आयपीएलमध्ये दर्जा वगैरे भानगड नसते.
काल धोनीला हिरो बनवायचे होते. म्हणून रबाडाला बॉलिंग दिली नाही. आवेश आणि करनला दिली. करननेही आधीच्या ओवरला टाकलेली चांगली बॉलिंग विसरून आणि १९ व्या ओवरला आवेशनेही आधीच्या दोन सामन्यात धोनीला बाद केलेले विसरून छान एकाच पट्ट्यात बॉल टाकले. धोनी बॅट फिरवत गेला. आठात चार बसले. धोनी हिरो झाला. कुठलाही प्रयोग करून धोनीला त्यांनी त्रास दिला नाही. लोकं उगाच पंतला नावे ठेवताहेत की रबाडाची ओवर फुकट घालवली. पण ते त्याच्या हातात नव्हते.
अन्यथा आधीच्याच सामन्यात २७ बॉल १८ खेळलेला. आणि पुर्ण मालिका मोठ्या फटक्यांसाठी झगडत असलेला धोनी फलंदाजीला जडेजा आणि ब्राव्होच्याही आधी त्या परीस्थितीत आलाच नसता.

"असे बॉल मिळतील तर मी सुद्धा मारले असते" - स्वतःचा (कुठलाही पुरावा नसलेला) मुद्दा पुढे ढकलण्यासाठी एका मोठ्या प्लेयर च्या स्किलसेट ला सुद्धा कमी लेखणं योग्य ठरावं ही अधःपतनाची कितवी पायरी?

सुनिल नरैन ने कमाल बॉलिंग केली आज. आता बँगलोर कसं डिफेंड करतात ते बघायचं. ह्या विकेटवर चेंज ऑफ पेस / पेस ऑफ- बॉलिंग खूप महत्वाची ठरेल असं वाटतंय.

सुनिल नरीन नि एकंदर फिरकी त्रिकूटाने चांगली बॉलिंग केली आहे. मॅक्सवेल ने ती ओव्हर सिंगल्स खेळून पेसर्स च्या ओव्हर्स ची वाट बघायला हवी होती असे वाटले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 October, 2021 - 21:34>>> +११११११ मी आता आयपीएल बघायची सोडून दिली. खूपच हास्यास्पद होत चालली आहे आयपीएल. लोकांच्या लक्षात येईल एव्हडी फिक्सिंग असते. मागे एकदा वकार भारतात आला होता तेव्हा त्याला येडा ऍक्टर गुलशन ग्रोवरने विचारलं होत की क्रिकेटर चाळीशीजवळ पोहचल्यावर रिटायर्ड का होतात? पिक्चरमधल्या लोकांप्रमाणे सत्तर ऐंशी वर्षाचे होईपर्यंत का नाही खेळत? असले येड्या डोक्याची लोकं भारतात असल्यावर फिक्सिंग करावीच लागत असेल.

कोहली आणि आरसीबी सालाबादाप्रमाणे मनं जिंकून बाहेर पडले..

आय्पीएल ला तरी कर्णधाराने काहिही लक वापरल नाही. जी काय जमवलेली पुण्याई असेल ती तशीच राहिली. निदान वर्ल्ड कपला तरी कामास येवो व मह्त्वाच्या मॅचेसला निदान टोस तरी जिंको.
काल सुनिल नारयणचा ड्रीम डे होता.

*काल सुनिल नारयणचा ड्रीम डे होता.* - त्याला सगळेच दिवस सारखेच असतात ! इतकं आत्यंतिक स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असूनही चेहरा इतका निर्विकार कसा काय ठेवूं शकतो हा ? आमच्या विराटकडून थोडं तरी कांहीं शिकावसंही वाटतच नाहीं का ह्याला ! Wink

#Fixerkings
मागच्या सामन्यानंतर हेच चालू आहे.
आयपीएलने आता आपली विश्वासार्हता जपायची वेळ आली आहे.

पण सीमोल्लंघनासाठी मला माहेरीं जायचा इतका आग्रह कां ? शमीच्या झाडावर चढून निवांतपणे तुम्हाला आयपीएल फायनल बघायचीय म्हणून !! 20190715_131637_0_4.jpg

बीसीसीआयला टीम इंडियाच्या अंतिम खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत वेळ आहे. आयसीसीने सुपर-१२ मध्ये सहभागी होणाऱ्या संघांची अंतिम मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. सुपर-१२ टप्प्यात ज्या संघांचा समावेश आहे, ते संघ त्यांच्या सामन्याच्या ७ दिवस आधी संघ बदलू शकतात.

आपण अशी टीम घेऊन जाऊआ आयपील फेज २ मधल्या कामगिरीवरून

जैस्वाल, अय्यर, राहुल, किशन, पंत, मयांक, जाडेजा, वरुण, सकारिया, आवेश खान, बुमरा Happy

असामी Happy
आवेश आणि वेंकटेश अय्यर ना उम्रान मलिक च्या बरोबर नेट बॉलर म्हणून इंडियन टीमबरोबर ठेवणार आहेत.

दिल्लीचा पंत हा तेरावा कॅप्टन आहे. Happy . अर्थात सलग कित्येक वर्षे एक कॅप्टन (व एकापेक्षा एक भारी प्लेयर ) असूनही काहीच न जमल्यावीही उदाहरणे आहेत.

पण दिल्ली जिंकावी. मॅच लो स्कोअरिंग पण चांगली व चुरशीची होइल. वरूण आणि नारायणला कसे तोंड देतात ते पहायला मजा येइल.

"मॅच लो स्कोअरिंग पण चांगली व चुरशीची होइल" विकेट किती लो अँड स्लो असावी ह्याला काहीतरी निकष असावे असं वाटतं कधीकधी. काही काही बॉल्स ऑलमोस्ट सरपटी येताहेत.

दिल्ली १३५
खेळपट्टीचा नूर असाच राहिला तर, कोणीतरी थोडेसे दव आहे बोलत होते, अन्यथा सामना लास्ट ओवर फिनिश आहे..

वर्ल्ड कप च्या खेळपट्ट्या अशाच असतील तर धमाल येईल. जनरल विंडीज, ऑस्ट्रेलिया नि साउथ आफ्रिका वगळता बाकीच्या देशांचे बॅट्समन खेळले नाहियेत. त्यांना अ‍ॅडजस्ट करायला मेहनत लागेल.

अरे बाबांनो किती हसवता Lol आयपीएलच्या परफॉर्मन्सवर प्लेयर टीममध्ये येऊ शकत नाही. इथे प्रत्येक बॉल फिक्स असतो. आयपीएल परफॉर्मन्सला इथे काहीच व्हॅल्यू नाही.

नरेन सोडून सगळेच खेळणार आहेत ना ? शाकीब, रेहमान, हेटमायर, पोलार्ड, लूइस, ब्राव्हो, रसेल, होल्डर, पूरान, अली, स्टोनिस, रॉय, नॉकिये, डिकॉक, रबाडा बहुतेक सगळ्यांनी वेळ घेतलाय त्यांना किमान अनुभवाचा उपयोग होईल.

केके आर फायनल ला गेली तर शेवटच्या ंअ‍ॅच चे पिच असेच ठेवले तर धमाल येईल. दोन्ही संघ स्लो पिचेस चा पुरेपूर फायदा ऊठवतात.

२२ बॉल ११ हवे होते. ८ विकेट हातात.
आता १२ बॉल १० हवे आहेत ६ विकेट हातात.
१० बॉल मध्ये २ विकेट टाकून फक्त १ रन घेतला.
उगाच माहौल करत आहेत.. आयपीएलची हिच मजा आहे Lol

मॉर्गन बाद
लास्ट ओवर ७ रन्स.. अय्यरने मिसफिल्डचे २ देऊनही..

आश्विनचा कधी नव्हे ते डॉट बॉल,, उगाच शाकीबचे हवेत बेट फिरवणे..
आणि आता शाकीब आ ऊ ट Lol

३ बॉल ६ धावा Lol

Pages