पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जरा बँकेत जाऊन बघा कि किती कॅश भेटते आधार कार्ड लिंक नसलेल्या अकाउंट मधून मग कळेल कि किती सोपं झालाय ते ?

न-मते कोणत्या जगात वावरता आपण..?
नोटबंदी झाल्यावर हव्या तेवढ्या नोटा बँकेतुन बदलुन घेतल्या लोकांनी. गैरसोय फक्त कष्ट्करी समाजाची झाली. हातावर पोट असणार्‍यांचे आणि वॄद्ध लोकांचे अतोनात हाल झाले (काहिंचे जीवही गेले). बाकी सोफिस्टिकेटेड लोक बँक मॅनेजर/कर्मचर्‍यांना चिरीमिरी देऊन लाखों रुपये किमतीची नवीखट्ट २००० च्या नोटांची बंडलं घेऊन येत होती तिथे मोठ्या कोट्याधिशांचे काय घेऊन बसलात आपण. बँक मॅनेजर अशा लोकांना घरपोच खोकी पोचवत होते आणि हजारोंचा सर्वीस चार्ज घेत होते. हे तर काहीच नाही.. भाजप चेच कार्यकर्ते टक्केवारीने जुन्या नोटा नवीन करुन देत होते.

ऑ... लोकसत्ताच गावला का??>>>> अहो मला हाच पेपर आवडतो. माझ्या जन्माच्या आधीपासुन हा घरी येतो.

अहो मला हाच पेपर आवडतो. माझ्या जन्माच्या आधीपासुन हा घरी येतो.>> तरिही अजुन मोदी-मोदी करता..? Biggrin

ज्या पद्धतिने गुटका बंदी नंतर गुटका खाणाऱ्यांची पंचायत झाली आहे, कि खायचा तर असतो पण ५ रुपयाचा ५० रुपयाला भेटतो तो पण गुपचूप तसच झाला आहे आता नोटबंदी नंतर हवाला वाल्यांचा, मग उगच असे बुडबुडे सोडायचे कि फायदा झाला म्हणून पण आतून त्यांची काय अवस्था आहे तपासून बघा ..

कष्टकरी लोकांचे हाल झाले का तर त्यांना जे पैसे देणारे मुकादम होते ते सगळे व्यवहार कॅश ने करत होते ? त्यांना पैसे कुठून आले ? त्यावर टॅक्स भरलं का ? मुळातच जो व्यवहार चुकीचं आहे तो तुम्ही जस्टीफाय करत आहेत, गरिबांना काय माहित कि आपल्याला जे पैसे दिले जातात ते कुठून आलेत? त्यांची अवस्था हि कोणी केली ह्याला का नाही जा विचाराला आता पर्यंत? बिल्डर लोकांकडून कॅश घेऊन फ्लॅट ची किंमत कमी दाखवतो कारण त्याला ती कॅश अशी कामगारांना देता येते आणि लोकांना फ्लॅट ची किंमत कमी दाखवून स्टॅम्प ड्युटी कमी लागते ? नेमकी हीच कॅश बँकेत भरायला लावली कि मग कामगार वर्गाची अवस्था वाईट होणारच, कारण आता त्यावर टॅक्स द्या , कुठून आली त्याचा पुरावा द्या कसे जमणार हे? पण त्याच्या मुळे कामगार वर्गाला त्रास झाला तरी दोष कोणाचा तर ज्याने नोटबंदी केली त्याचा .. भारी आहे हा तुमचा लॉजिक..

आधी दहा - विस कोटी रुपये इकडून -तिकडे न्यायचे म्हटल्यावर किती थप्पी च्या थप्पी न्यावी लागायची >> आता काळी ट्रंक पुरते, तीपण हेलीकॉप्टरमधुन न्यायची आणि हेलीकॉप्टर चेक केलं की त्या अधिकार्‍याला सस्पेंड करायचं Wink

नोटाबंदीचे अजुनही गोडए गाणार्‍या मोदीचाटांनो, एकूण १००० कोटिच्या वर रोख सध्या पकडली आहे, त्याहून कितीतरी अधिक पचवली गेली, ते कसे काय??

कुठल्याही कामगार ला बेसिक सुरक्षा असावी, पगार वेळेत असावा , विमा सुरक्षा असावी , महागाई भत्ता असावा , त्यांच्या मुलांना साईट जवळच पाळणाघर असावे , ह्या साठी काँग्रेस ने काय केले आहे ते जरा सांगावे आणि ते कितपत पाळले जाते ते पण सांगावे ?

<< तुम्ही अगदी सराईत असल्यासारखाच बोलताय पण तुम्हाला हे माहीतच नाही कि आता एवढी कॅश बँकेतून काढणं सोपं राहिला नाही . नाही तर अश्या निवडणूक रद्द होण्याची वेळ आलीच नसती वेल्लोर वर.. >
------ कॅश काढली... गाडीत टाकली... पकडल्या गेले... सहकारी अजुन पैसे काढत होते अशी बातमीची लिंक येथेच डकवली होती. माझ्यासाठी पक्ष महत्वाचा नाही आहे... घटना घडत आहेत. मी सोय कुणाची झाली ते लिहीले आहे, सोय कुणी केली हे आपणा सर्वांनाच माहित आहे.
अगदी ताजी बातमी आहे,
https://economictimes.indiatimes.com/news/elections/lok-sabha/india/it-r...

अशाच घटना काँग्रेस/ इतर पक्षांबाबत येतील. मला आष्चर्य वाटणार नाही.

<< जरा बँकेत जाऊन बघा कि किती कॅश भेटते आधार कार्ड लिंक नसलेल्या अकाउंट मधून मग कळेल कि किती सोपं झालाय ते ? >>
------- किती तरी कोटीची कॅश पकडल्याची बातमी परवा आली होती. मग हे कसे शक्य आहे ? काय हजारो लोक बँकेत जातात आणि कॅश पैसे आणुन गाडीत टाकतात का ?

एकूण १०कोटिच्या वर रोख सध्या पकडली आहे>>
ते सहकारी बँकांमधून काढले होते. आणि हो, वेल्लोर वा सौथला सहकारी बँकांचे प्रमाण अधिक आहे हो. Wink

कुठल्याही कामगार ला बेसिक सुरक्षा असावी, पगार वेळेत असावा , विमा सुरक्षा असावी , महागाई भत्ता असावा , त्यांच्या मुलांना साईट जवळच पाळणाघर असावे , ह्या साठी काँग्रेस ने काय केले आहे ते जरा सांगावे आणि ते कितपत पाळले जाते ते पण सांगावे ?>> म्हणुन तर मोदीला आणले.. त्याने काय केले तर प्रश्न फिरवुन विचारायला ४० पैसे प्रती कॉमेंट वाले बसवले Proud

हो का मोदी ला आणले आणि मोदी ने जादू ची कांडी फिरवायची आणि ह्यांचे ७० वर्षाचे पाप धुवून टाकायचे ते पण फक्त ५ वर्षात .. भारीच लॉजिक आहे चापलुसी मंडळींचं

मोदी ने जादू ची कांडी फिरवायची आणि ह्यांचे ७० वर्षाचे पाप धुवून टाकायचे ते पण फक्त ५ वर्षात >> दिवसाला २० तास काम ( Uhoh ) करतो म्हणे मोदी.. मग ५ वर्षांत सगळं धुणं अपेक्षीत होतं... एकतर मोदीने सांगितल्याप्रमाणे धुणं मळकट नव्हतं किंवा ते धुवायची पात्रता नाही हे दोनच अर्थ निघतात.. मग आता धोबी बदलुन पंप्र आणावा म्हणतोय... Biggrin

दिवसाला २० तास काम ( Uhoh ) करतो म्हणे मोदी.. मग ५ वर्षांत सगळं धुणं अपेक्षीत होतं- अरे बापरे , एवढ्या अपेक्षा तुम्हाला तर पप्पू कडून पण नसतील नाही का

दिवसाला २० तास काम करतो>>
म्हणून आराम देणार आहे जनता आता.- असा बोलणारे थकले , गुजरात मध्ये १२ वर्ष आणि भारतात ५ वर्ष सगळे विरोधक हेच म्हणतात कि जनता त्यांना आराम देईल, पण जनता त्यांनाच निवडून देते आणि देणार, तुम्ही फक्त ठरवून घ्या कि ह्या वेळेस विरोधी पक्षनेते पद द्यायचे कोणाला , खूप भांडण असणानार आहेत.

गुजरात म्हणजे पूर्ण देश नाही. ते USK लॉजिक सगळीकडे वापरणे बंद करा. हरले गेले तर आटा पीसिंग आहेच आणि काठावर पास झाले तर अडवणीसोबत भजन करायला पाठवेल नागपूरची गादी Wink

मंडळी, जे मुद्द्यावर बोलू शकतात, त्यांच्याशी चर्चा करावी.
वरच्या महाभागांच्या प्रतिसादांत दात कराकरा चावण्याचा आणि भांडी आपटण्याचा आवाज ऐकू येतो. त्याची फक्त मौज पहावी.

वरच्या महाभागांच्या प्रतिसादांत दात कराकरा चावण्याचा आणि भांडी आपटण्याचा आवाज ऐकू येतो. त्याची फक्त मौज पहावी.

~ वल्लाह! खतरनाक खतरनाक. अगदि असेच वाटते.. इग्नोर मारण्यासाठी एक आणखी आयडी आहे हा

, तुम्ही फक्त ठरवून घ्या कि ह्या वेळेस विरोधी पक्षनेते पद द्यायचे कोणाला , खूप भांडण असणाना

सहा सहा महिने प्रतेक पक्षाला विरोधी पक्षनेतेपद द्यावे अशी सूचना करावी असे वाटते .
बघा पटत असेल तर

RBI DATA

In the 14 days before November 8, 2016 -- when demonetisation was announced -- cash worth Rs 17.01 lakh crore was in circulation in India.
In the 14 days before today, i.e. November 8, 2018, cash worth Rs 18.76 lakh crore was in circulation in India, according to RBI data.
The data also shows that while in 2016, the currency in circulation was growing at 17.7 per cent year on year, in 2018 it has registered a higher 22.2 per cent year on year growth.

नोटा बंदीचा उद्देश हाच होता का? ज्या समस्येसाठी २००० ची नोट छापली होती ती समस्या अजून दूर झाली नाही का? सरकारकडून अजूनतरी अधिकृतपणे खुलासा केला गेला नाही. नोटा बंदी समर्थकांना ही गोष्ट खटकत नाही का? ठामपणे ह्याचे उत्तर का देऊ शकत नाही?
जनता सच जानना चाहती है। ...

मार्मिक भाऊ, युपीए सरकारच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या धाग्यात मी rbi च्याच रिपोर्टसचा दाखला देऊन परिस्थिती किती बिकट बनली होती ते सांगितलंय.

https://www.maayboli.com/node/48349?page=16

ShashankP भाऊ, मला अधिकृत माहिती हवीय २००० च्या नोटेबद्दल.
In response to a RTI query back in November 2018, the Currency Note Press in Nashik had said that it has not received any order to print Rs 2,000 denomination notes. The government, however, had denied any plans to withdraw the Rs 2,000 notes yet.

नक्की तुमचा २००० बद्दल चा प्रॉब्लेम काय आहे ते समजले नाही , हवाला करण्यासाठी सोपं आहे हे एकमेव कारण आहे का कि तुम्हाला सुट्टे मिळत नाही हा प्रॉब्लेम आहे , तुम्हाला हे पटत नाही कि सरकारने नोटबंदी केल्याने काय फायदा झाला ते तर मग २००० च्या नोटेच्या महत्व पण कळणार नाही हे सरळ आहे . तुम्हाला हे पण पटणार नाही कि २०१३-१४ साली ३.७९ करोड लोक टॅक्स भरत होते ते २०१८ ला ६.८४ करोड झाले आहेत, नोटबंदी नंतर हे प्रमाण वर्षाला १ कोटी लोकांनी वाढल्याचे समोर आले आहे , एका बाजूला विरोधक म्हणतात कि नोकऱ्या गेल्यात आणि नोटबंदी मुळे काही फायदाच नाही झाला मग हे नवीन टॅक्स भरणारे नक्की कोण आहेत हे सांगू शकता का ?

२०१३-१४ मध्ये भारताची आर्थिक अवस्था काय होती ह्या बद्दल खालील बातम्या..
https://www.theguardian.com/business/economics-blog/2013/aug/19/india-fi...
India's financial woes are rapidly approaching the critical stage. The rupee has depreciated by 44% in the past two years and hit a record low against the US dollar on Monday. The stock market is plunging, bond yields are nudging 10% and capital is flooding out of the country
किंव्हा हि बातमी https://www.bbc.com/news/business-23612146
Economic growth has also dropped to 5%, the slowest pace in a decade, down from the heights of 9% reached during the mid-2000s, and back to the 4-5% rate that characterised the slow pace of growth before the 1980 reforms.
पण नोटबंदी ने हि परिस्थिती बदलली , आरबीआय कडे सरप्लस कॅश आली, बँकांना पैसे मिळाल्याने त्या वाचल्या , इंटरेस्ट कमी झाले, शेअर मार्केट वाढले, महागाई कमी झाली , फॉर्मल इकॉनॉमी कडे आपली वाटचाल झाली ..
तरीही चापलुसी मंडळी मौनी बाबाचे गुणगान गात नोटबंदी कशी वाईट होती हे सांगत बसतील.

Pages