कादंबरी

मोरपिसे -- २

पंधरा ऑगस्ट आला आणि गेला.. जास्त फरक काही पडला नाही. तसा तो दरवर्षीच येतो. पण यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे सरबानी प्रितमची चांगली मैत्रीण बनून गेली. दोघीजणी रेहानचा विषय बोलताना थकायच्या नाहीत.

वारी - भाग ४ -

दरवर्षी पांडवपंचमीला पहाटे भाउ मला घेउन तासगाववेशीच्या मारुतीला यायचे. वारीला पोचवायला. सकाळी मस्त थंडी असायची आणि मी छान स्वेटर आणि कानटोपी घालायचो आणि भाउंनी गळ्याभोवती मफलर गुंडाळलेला असायचा.

वारी - भाग ३ (पुर्वार्ध अंतिम)

सगळे फुसके फटाके, पुठ्ठे, कागद वगैरे जाळुन झाल्यावर मी घरात आत आलो. व्हरांड्यात ह्या वर्षीचे न उडवलेले फटाके प्लास्टिकच्या पिशव्यात पडून होते. आई आजारी असल्याने मी आवाज करणारे फटाके उडवले नव्हते.

नियती

रस्त्यावरून जाणारी एक एशियाड बस. रस्त्याच्या दुतर्फा सुंदर हिरवीगार शेतं, बहरलेली झाडं आणि एकदम पावसाळी वातावरण. खिडकीच्या कडेला बसून हे बघण्याची मजा काही औरच असते ना. शोना अशीच खिडकीबाहेर पहात होती.

वारी (पुर्वार्ध-भाग २)

सहा वाजुन गेले होते. आई अजुन घरी परतली नव्हती. ती मला सांगायची की मी लहान असताना, ती जोपर्यंत ऑफिसमध्ये आहे तोपर्यंत छान खेळत असायचो. आणि ज्याक्षणी ती घरात यायची त्याक्षणी रडायला सुरुवात करायचो. आणि कशावरुनही रडायचो.

वारी (पुर्वार्ध-भाग १)

दिवाळी संपली. न फुटलेले, अर्धवट जळालेले फटाके, त्यांच्या सुरनळ्या, फटाक्याच्या पुडक्यांचे पुठ्ठे आणी जळु शकेल अशी कुठलीही गोष्ट मी ध्यान लावून जाळायला सुरुवात केली. आता हे सगळे जाळणे ही एक कलाच आहे.

मोरपिसे.. थोडी सापडलेली.. थोडी हरवलेली.

बर्याच दिवसानी लिहितेय. खरंतर विषय आधीपासून डोक्यात आहे. पण वेळ मिळेल की नाही ते माहीत नव्हतं.