|
रात्रीचे बारा वाजून गेलेले. मी अर्थातच स्वप्नात हरवलेली. कर्कशपणे मोबाईल वाजायला लागला. पाहिलं तर एकदम ओळखीचा नंबर. ज्या ऑफ़िसमधे दोन वर्षं काम केली तो नंबर कुणी फोनबूकमधे ठेवत नाही पण लक्षात तर राहतोच ना? मी फोन घेतला. "हेलो... " पलीकडून एकदम दमलेला आवाज आला. "हाय.. किती दिवसानी फोन केलास.." माझी झोप पारच उडाली. रित्विकचा फोन म्हटल्यावर मला बरं वाटतं. एक तर नवीन नवीन गॉसिप ऐकायला मिळतं शिवाय दुसर्या दिवशी छापून येणार्या बातम्या आता लगेच समजतात. तो शांत होता, "रित्विक... आहेस ना.." "हो" "मग बोल ना.. असा काय घुम्यासारखा." "नंदु. मला वैताग आलाय." काही नवीन नाही. दिवसातून पंचवीस वेळा तरी हे वाक्य तो सगळ्याना ऐकवत असतोच. पण आज त्याचा मूड अजिबात चांगला नव्हता. आवाजातूनच ते जाणवत होतं. "काय झालं?" "मालाडमधे. नऊ वर्षाच्या मुलगा. त्याचा गळा दाबून मारलं. तीन दिवस बॉडी घरात लपवली. It was like hell.. smelling, I saw it..." तो एका दमात बोलून गेला. मी आता काय ते समजले. मी किंवा रित्विक दोघंही या असल्या assignments कधीच नीट केल्या नाहीत. माझी तर पहिलीच assighnment होती २६ जुलै. आठवडाभर मेलेल्या म्हशी. वाहणारी प्रेतं, कुजलेली मुलं हेच सगळं पाहत होते. त्या आधी पण रत्नागिरीत असताना पहिल्याच दिवशी आत्महत्या केलेल्या बाईच फोटो काढायला पाठवलं होतं. रक्त, मांस हाडं प्रेत हे सगळं पाहायला धाडस लागतं. जे माझ्यात नाही. काम केलं ते करायचं म्हणुन केलं. हॉस्टेलवर परतल्यावर सुद्धा असलीच दृश्य डोळ्यासमोर दिसायची. ताटातला घास नकोसा व्हायचा. "रित्विक,,तू का गेलास?" "नंदु, ज्याने मारलं तो १६ वर्षाचा होता. अत्यंत चंगल्या घरातला मुलगा. and you know something.. he was an adopted child " "त्याने थंड डोक्याने हे सगळा खून केला आणि नंतर त्या मुलाला शोधायचं नाटक पण केलं." "रिट्स,, कम ऑन, तू स्टोरी केलीस ना मग आता का विचार करतो. विसर ना. घरी जा आणि मस्त जेवुन झोप. " "मी कसं विसरू? मला तर ते सगळं बघवत सुद्धा नव्हतं ते फोटो. ती बॉडी. त्याचे रडणारे घरवाले. का मेला तो मुलगा? त्याची काय चूक होती?" बाप रे. रित्विक फ़ारच विचार करत होता. प्रत्येक क्राईम स्टोरीचा असा विचार केला तर लवकरच नरिमन पॉइंटला धोंडे मारताना दिसेल. "हे बघ, चूक कुणाचीही नसते. न आपली न त्याची. पण अशा गोष्टी जगात घडत असतात. त्यामुळे..." "पण का घडतात?" त्याने माझं वाक्य तोडलं. "मला नाही माहीत. मी कधी असं केलं नाही. मला कुणी असं काही केलं नाही. मग मी कसं बोलणार? पण ज्याच्या बाबतीत घडतं ते मात्र दुर्दैवी ठरतात. आपण काहीच करु शकत नाही." मी शांतपणे सांगितलं, "पण मग लोक का मारतात? बाकीचा कुठलाही प्राणी माण्साइतका हुशार नाही म्हणे. मग ते का असा एकमेकाचा खून करत नाही. कधी कधी आपली "जनावर" म्हणायची सुद्धा लायकी नसते. छोट्या छोट्या कारणासाठी गळे चिरणारे आपण. आपयाच बायका मुलाना विष घालून मारणारे आपणच. एक बॉम्बने अख्खं शहर बरबाद करणारे आपणच. काय फ़ायदा आपल्या हुशारीचा?" "हे बघ, मला इतकं काही समजत नाही. म्हणून मी इतका विचार करत नाही. ज्या गोष्टीचा मला त्रास होतो मी त्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करते. जे थांबवणं माझ्या हातात नाही मी का त्याचा विचार करु?" "तुला नाही वाटत तू खूप स्वार्थीपणे विचार करत आहेस?" "नाही. कारण जिथे मी contribute करू शकते तिथे मी करतेच ना? पण जिथे मी काहीच करू शकत नाही तिथे माझं contribution काय कामाचं?" "पण मग या घटना घडतच रहाव्यात का?" "मी असं कुठे म्हटलं आहे? पण या घटना थांबवण्यासाठी मी काहीच करु शकत नाही हे ही तितकंच खरं. " पलीकडे शांतता होती. "हा... मी एक करू शकते. असं कुठलही कृत्य मी करणार नाही यासाठी मी प्रयत्न करू शकते. रित्विक हसला. "तू करणार नाहीस याची मला खात्री आहे. तुला तर चाकूसुद्धा धड वापरता येत नाही." "बघ, इथेच चुकलास तू. मी कशी वागेन एखाद्या परिस्थितीमधे ते मीही सांगू शकत नाही. आपण बरेचदा आपल्या आजु बाजुच्याना इतकं गृहित धरतो की त्याचं काहीतरी बिनसलय. आईवडील, शिक्षक, मित्र मैत्रीणी कुणीच या भावनिक परिस्थितीचा विचार करत नाही," "म्हणजे सगळा दोष बाकीच्याचा... स्वत्:चा काहीच नाही." "तू वकीलासारखी माझी उलट तपासणी घेऊ नकोस. अशा घटना एका दिवसात घडत नहीत, त्याला तशी पार्श्वभूमी असते. ती पार्श्वभूमी समजावून घेणं फ़ार गरजेचं असतं. स्पेशली टीन एजर्सच्या बाबतीत. कारण शारिरीक आणि मानसिक दोन्हीकडे त्याहंचं एक युद्ध स्वत्:cशीच चालू असतं. मला मानसशास्त्र वगैरे समजत नाही. पण या वयातल्या मुलाशी मुलीशी कायम interaction होत राहतं आणि त्यातून एक गोष्ट जाणवत राहते ही मुलं कुठे तरी काहीतरी शोधत आहेत. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आपणही केव्हातरी त्याच्या वयाचे होतोच ना. तेव्हा आपण आपल्याला कसं सांभाळलं.." "पण नंदु, तुला नाही वाटत हा सगळा कुठेतरी मीडीयाचा दोष आहे," "हे बघ, दोषारोप करायचेच आहेत तर कितीतरी कारणं आहेत. पण ती सगळी कारणं इथे जरूरीची ठरतत का? जो मरतो तो माणूस असतो, जो मारतो तोही माणूसच असतो.. कारण नसतं." रित्विक परत शांत झाला. खरंतर मी त्याच्याबरोबर दुसर्या कसल्यातर्र विषयावर गप्पा मारुन त्याचा मूड हलका करायला हवा होता. पण मीही जरा झोपेतच होते. त्यामुळे धडाधड लेक्चर देत सुटले. "हे बघ, रित्विक,आपण विचार करतो म्हणून आपल्याला त्रास होतो. त्यापेक्षा जर या गोष्टीचा विचारच केला नाही तर बरं... तुला ती गेट वे ची केस आठवस्ते, कुठला तरी एक मुलगा आला आणि त्या मुलीला भोसकून गेला. मी त्या स्पॉटवर चार मिनिटात पोचले होते. गेटवेच्या एका फोटोग्राफरने या घटनेचे फोटो काढले होते. अजूनही ते आठवलं की माझ्या अंगावर शहारे येतात. पण लोक आज त्या घटनेला विसरून पण गेले. We are shock absorbers आपण हे सगळे शॉक सहन करतो म्हणून आपणच जास्त विचार करतो. तेव्हा इतका विचार करू नकोस. विसर... हे असं घडतं आणि घडतच असणार. तू किंवा मी यात काहीही करू शकत नाही. त्यामुळे आपण हे करू शकत नाही म्हणून त्रास करवून घ्यायचा की जे शक्य आहे ते करायचं हा आपला चॉईस आहे." रित्विक बराच वेळ शांत बसला. "अजून काही बातमी?" मी विषय बदलायचा प्रयत्न केला. "काही नाही..." "तुझी ऐश्वर्या हनीमूनवरून परत आली ना.." ऐश्वर्या हा रित्विकचा स्वतंत्र "बीट" होता. "तिचं लग्न झालं याची आठवण करून द्यायची गरज आहे का?" जवळ जवळ तासभर आम्ही बोलत होतो. त्याचा मूड बर्यापैकी सावरला होता. दुसर्या दिवशी सवयीने पेपर वाचायला घेतले. पंचवीसच्या पंचवीस पेपरमधे तीच बातमी. तोच गोंडस मुलगा जो आपल्या आजूबाजूला खेळत असतो. फ़क्त त्याच्या फोटोला हार घातला होता. टप्कन डोळ्यात एक आश्रू आला. काल रित्विकला मी समजावलं होतं. आता मीच स्वत्:ला समजावत होते. हे घडतच असतं हे असं घडतच असतं.
|
Supermom
| |
| Wednesday, June 20, 2007 - 2:03 am: |
| 
|
नंदिनी, कालच मी ही बातमी वाचली होती ग. आणि खूप खूप अस्वस्थ झाले होते. हे सारं काय घडतय आपल्या आजूबाजूला? देशा, परदेशात कुठेही. ही घटना काय, किंवा अमेरिकेत व्हर्जिनिया मधे एका मुलाने केलेला अंधाधुंद गोळीबार काय, याची कारणंच कळत नाहीत. आपणही शाळा कॉलेजमधे जात होतो, आपल्या सभोवती इतक्या नाही, पण थोड्या प्रमाणात हे घडत होतंच. पण त्याचा भाग व्हावंसं आपल्याला कधी स्वप्नातही वाटलं नाही. बरं आईवडिलांचे संस्कार याला कारणीभूत असंही नाही म्हणता येत. आईवडील बिचारे आपल्या परीनं चांगलेच संस्कार देतात. काही अपवाद वगळता. मग ह्या मुलांना हे का करावसं वाटतं हे एक मोठं कोडंच म्हणायला हवं. वडील दारुडे, आई असहाय, अशा परिस्थितीत सुद्धा चांगली निघालेली मुलं मी बघितली आहेत. अगदी वाईट्ट बालपण वाट्याला येऊनही कोळशाच्या खाणीतल्या हिर्यासारखी मोठेपणी अतीव चांगली निघालेली मुलं बघितली आहेत. म्हणजे या अशांची कमकुवत, दुबळी मनं हेच कारण म्हणायचं का या सार्याला? काहीच कळत नाही. मन अगदी बधीर होतं हे असं काही वाचून. असं वाटतं की सगळीकडेच एक मोठ्ठा ज्वालामुखी उसळतोय. फ़क्त त्याचं मुख आपल्या घरात उघडू नये येवढीच प्रार्थना त्या ईश्वराजवळ करायची. माफ़ कर, तुझ्या लेखावर मोठंच पुराण लिहिलं. पण इतका विचार त्यावर करावासा वाटला यातच तुझ्या लेखनाची पावती आहे. नाही का?
|
Daad
| |
| Wednesday, June 20, 2007 - 3:40 am: |
| 
|
नंदिनी, एका अनादी-अनंत विषयाला हात घातलास. सुपर्मॉम म्हणतेय तसं हे कोडच आहे. का घडतात काही गोष्टी, काही माणसांच्या बाबतीत का घडतात? त्याच वेळी का घडतात,.... अनेक प्रश्न पण उत्तर नाही. त्यातही आपण काय करू शकलो असतो... हा एक प्रश्न तर सदैव छळतो.... हा संघर्ष, चलबिचल दोघांच्या संवादातून किती सुंदर उलगडलयस! तुझी सरळ, सहज लिहिण्याची शैली आवडते मला, लिहीत रहा. (खूपच लिहिलं मी)
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 20, 2007 - 3:53 am: |
| 
|
अच्छा म्हणजे परवा तुझा मुड अजिबात नव्हता ते हे होत का? बरं झाल इथे लिहिलस ते थोड तरी हलक वाटेल. हे असे प्रश्न मेंदुत फ़ेर करुन नाचु लागले की फ़ार त्रास होतो मला. माझ मनोगत लिहिल्यासारख वाटल अगदी.
|
Mankya
| |
| Wednesday, June 20, 2007 - 4:27 am: |
| 
|
नंदिनी .. कमीत कमी या ओघाने तरी एका पत्रकाराला काय वाटत असेल हे सगळं Cover करताना त्याचा अंदाज तरी आला. तस सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे वरचे प्रश्न कधीच न संपणारे आहेत. " आपण बरेचदा आपल्या आजु बाजुच्याना इतकं गृहित धरतो की त्याचं काहीतरी बिनसलय. आईवडील, शिक्षक, मित्र मैत्रीणी कुणीच या भावनिक परिस्थितीचा विचार करत नाही ....." १००% खरय ! माणिक !
|
Manjud
| |
| Wednesday, June 20, 2007 - 5:54 am: |
| 
|
हा कोणा एकाला अस मी उद्देशून नाही लिहीत आहे. पण परवापासूनच मला प्रश्न भेडसावत आहेत की जर त्या १६ वर्षाच्या मुलावर psychological treatment चालू होती तर त्याचे आई-वडील त्याला एकट्याला सोडून गेले कसे? आणि ह्या असल्या गोष्टी तर शेजार्याना न सांगता सुद्धा माहीत असतात तर त्या लहान मुलाला त्याच्या आईने त्या १६ वर्षाच्या मुलाकडे एकटे खेळायला पाठवले कसे? मी बहुतेक विषयांतर केले आहे पण नंदिनीकडून ही बातमी ऐकल्यापासून सतत मी हा विचार करते आहे.
|
Psg
| |
| Wednesday, June 20, 2007 - 6:05 am: |
| 
|
नंदिनी, चांगलं लिहिलं आहेस.
|
Gs1
| |
| Wednesday, June 20, 2007 - 7:16 am: |
| 
|
नंदिनी, सर्व वाहिन्यांवर ही घटना ज्या चवीने वारंवार जास्तीत जास्त तपशीलासह दाखवण्याची जी चढाओढ चालू होती त्या पार्श्वभूमीवर एका पत्रकारातला माणूस थोडा शिल्लक आहे हे बघून बरं वाटल. नाहीतर एखादे कुजलेले प्रेत बघितल्यावर ज्याला गिधाडापेक्षाही अधिक आनंद होतो असा प्राणी म्हणजे हे पत्रकार असेच चित्र हल्ली सगळीकडे दिसते.
|
नंदिनी हे वाचल्यापासून मी विचार करतेय. खरंच फार डिप्रेसिंग आहे हे. अगदी व्यवस्थित मांडली आहेस तू एका जागरूक नागरिकाची तगमग आणि असहायता.
|
Zelam
| |
| Wednesday, June 20, 2007 - 12:41 pm: |
| 
|
नंदिनी चांगलं मांडलं आहेस. खरोखरीच प्रचंड डिप्रेसिंग आहे. सुमॉचे विचारही पटले.
|
धन्यवाद मंडळी. असे कितीतरी विचार मनात येत असतात. पण उत्तरे मिळत नाहीत, अशाच एका प्रश्नाचा मागोवा घ्यायचा हा प्रयत्न.
|
Asami
| |
| Wednesday, June 20, 2007 - 3:39 pm: |
| 
|
I guess हि बातमी वाचल्यावर प्रत्येकाचेच directly/indirectly असे discussion झाले असेल त्याला योग्य शब्दांमधे पकडले आहेस.
|
Saurabh
| |
| Wednesday, June 20, 2007 - 5:03 pm: |
| 
|
We are shock absorbers ! मुश्कील जॉब आहे! आजकाल 'न्युज' हा एक रिऍलिटी शो झाला आहे. एखादी घटना ही 'बातमी' का असते? संबंधितांव्यतिरिक्त इतरांना समजली काय किंवा नाही काय? केवळ ती कव्हर करायला माणसे आणि साधने आहेत म्हणुन त्याची बातमी होते?
|
Disha013
| |
| Wednesday, June 20, 2007 - 7:40 pm: |
| 
|
नंदिनी,अस्वस्थ करणारं लिहीलस. ती बातमी खरच भयानक आहे. मी तर वाचलयं की आपण दत्तक घेतलेला मुलगा असल्याचे समजल्यापासुन त्या मुलाची मनस्थिती ठीक न्हवती. पालकांचे कुठे चुकते? सुमॉचेही लिखाण छान आहे. कोवळीक,निरागसता हल्ली दिसुनही येत नाही. आजकाल मुलांना फ़ार लवकर मोठे व्हावे लाग्तेय. हजार गोष्टीतुन येणारं फ़्रश्ट्रेशन नि ताण. कठीण आहे सगळं.
|
Bee
| |
| Thursday, June 21, 2007 - 2:03 am: |
| 
|
नंदीनी, वाचून मन सुन्न झालं. तुझ्या लेखनीत प्राण आहे खरचं..
|
Yog
| |
| Thursday, June 21, 2007 - 2:31 am: |
| 
|
hhmm... .. .. ..
|
नंदिनी,मन खूप अस्वस्थ झालं गं हे वाचुन
|
Srk
| |
| Thursday, June 21, 2007 - 12:58 pm: |
| 
|
खरच shok absorbers! सुन्न झालेय गं!
|
Jaijuee
| |
| Thursday, June 21, 2007 - 1:04 pm: |
| 
|
पूर्वी लहान मुलांना दत्तक मुलं कुठून येतात हे माहित नसायचे. आज सगळ्यांना मिडियातून सगळं कळतं. त्या मुलाच्या मनावर केवळ नकरार्थी भावच उमटले असतील आणि त्यातूनही हे कृत्य झालं असेल. ओरखडा उठतो खरा आपल्या बर्या-वाईटाच्या कल्पनांवर! अगदी असुरक्षितपण वाटतं, आपली मुलं खेळायला सोडताना.
|
Sneha21
| |
| Thursday, June 21, 2007 - 1:48 pm: |
| 
|
काय प्रितिक्रिया द्यावी समजेना पन तु नेहमी विचार करयला लवनार लिहितेस..
|
|
|